Skip to main content

विरंगुळा

संत

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 06/12/2008 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेकडो वर्षांपूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करणा-या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं... ... आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! (वरील विनोद मी म.टा. वर वाचला व मि. पा. वर अनेक सद्द्स्य संगणक अभियंते असल्यामूळे येथे चिकटवण्याचा मोह आवरला नाही. संपादक महोदय योग्य तो न्याय करतीलच. )

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

लेखक कपिल काळे यांनी शुक्रवार, 05/12/2008 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरविते सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. पदावर मुख्य नव्हता पोलिसांना मंत्री नव्हता मनी त्याचा सल नव्हता पित्त्या बसवायचा होता गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. जन्तेला फाट्या मारिले नवे नायक नाही दिले पायांना कितीक खेचले पछाड धोबी टाकले डाव कुटील किती मी खेळते........ सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते.

व्यायाम हराम आहे!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 05/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला. "लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?'' मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना! "बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही.

भटकंती - हरिहरेश्वर (३)

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 04/12/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/4761 http://www.misalpav.com/node/4794 समुद्राच्या फेसाळत्या लाटा खुणावत होत्या.......त्या फेसाळत्या लाटांमधे खेळण्यासाठी आम्ही मर्गस्थ झालो.... ( क्रमशः) हरिहरेश्वर समुद्राला खुप ओढ आहे आणि भरतीची वेळ आहे असं कळल्यामुळे जास्त पाण्यात जाण्याचं धाडस नाही केलं....लांबुनच त्या फेसाळत्या लाटांचा आनंद घेतला आणि थोडंफार पाण्यात खेळुन परतीच्या मार्गाला लागलो.........

हसरा चंद्र

लेखक पांथस्थ यांनी सोमवार, 01/12/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधुन घरी येतांना इमारतीबाहेर काही मंडळी कुतुहलाने आकाशाकडे बघतांना दिसली. काय म्हणुन बघावे ते हि हसरी मुद्रा आकाशात झळकत होती.... हे काय आहे याचा तज्ञ मंडळींनी खुलासा करावा!

(कधीच का नाही?)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 27/11/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न) http://misalpav.com/node/4738 का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही सलवार ही फुलांची मद झुलवीत येते मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्‍याच सार्‍या का भाव तू दिलेले वठले कधीच नाही पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते का सोडणे तुला मज जमले क

(काही कविता)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 26/11/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल रामदासांच्या 'काही कविता' वाचल्यापासून अस्वस्थ होतो, दोन समजल्या नाहीत म्हणून आणि दोन समजल्या म्हणूनही! आज त्यांच्या कवितेवरची त्यांची स्वतःची टिप्पणी आणि मुक्तरावांचे विवेचन बघून कविता समजल्याचा हर्ष झाला.

भटकंती - हरिहरेश्वर (२)

लेखक मिंटी यांनी बुधवार, 26/11/2008 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/4761 नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी. (क्रमशः ) पण आभाळात फारच ढगांची गर्दी व्हायला लागली आणि आम्ही परत रूमवर आलो.

भटकंती - हरिहरेश्वर (१)

लेखक मिंटी यांनी सोमवार, 24/11/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं. ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं.

श्रद्धा आणि सबुरी!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 24/11/2008 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते. "कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती.