Skip to main content

विरंगुळा

जगी सर्व सुखी असा कोण आहे .....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी रविवार, 23/11/2008 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरेच आज कोण सुखी आहे ह्या जगात ? कितीही मोठी, उच्च पदावरील व्यक्ती असो, दुख: , चिंता काय पाठ सोडायला तयार नसतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळेच आज श्री. सत्य आईबाबा ह्यांचे शहरात आगमन होणार आहे हे कळताच, मोठ मोठ्या लोकांची दर्शनाला नुसती झुंबड उडाली होती. आम्ही सुद्धा मोठ्या हिकमतीने खास दरबारात प्रवेश मिळवला. (पेशव्यांचे रक्त खेळतय नसा नसात) हे वाक्य एकदा आम्ही एकाला ऐकवले होते, त्याने आम्हाला "मग तुम्हाला 'पेशवाई' मध्ये सगळे फ्री असेल ना?" असे विचारुन तप्त डांबरी रस्त्यावर चितपट केले होते. असो, खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्‍या विराजमान झाल्या होत्या.

""कालचक्र""

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 22/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य एक संध्या कोमल गंधार, कुसुंबी किनार क्षितिजाला... तेजस्वी रवीची किरणे सोनेरी, लाली गालावरी संध्येच्या का !?! मुग्ध प्रियतमा संध्या ती आरक्त, का 'रवी' आसक्त 'निशे'वरी ! दुखावली 'संध्या' हळवा गंधार, का क्षितिजापार गेला सखा..... हवेत गारवा नभी चंद्र तारे, मादक इशारे निशेचेही... आसुसला 'रवी' निशेच्या छायेला, कौमुदी कायेला चंद्र साक्ष... मिठीत 'रवी'च्या 'निशा'ही उन्मुक्त, प्रकाश अव्यक्त अंधारला... मेघाचा मल्हार, कित्येक प्रहर, प्रणय कहर, आसमंत..... पहाट भैरवी तिमिर छेदून, गगन भेदून, झंकारली.

सासुरवाशीण

लेखक अनंत छंदी यांनी शनिवार, 22/11/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या रणरणत्या उन्हात, पागोळीच्या सावलीत एक गाय येऊन बसली निवारा शोधीत ओटीवरती सासूबाई, डाळिंब्या निवडत होत्या. जपमाळ घेऊन माजघरात बसली होती नलूआत्त्या सैपाकघरात आवराआवर, सूनबाई करते खोचून पदर मन मात्र झुलत असते, माहेरच्या झोपाळ्यावर आई, भाऊच्या आठवणीने डोळ्यामध्ये अश्रुधारा आत्ताच का आठवते आहे, भातुकली अन चिमणचारा गायीला पाहून मायेची सय तिला येते आहे. गायीशी गळामिठी घालून सासुरवाशीण रडते आहे. गाय आणि माय दोन्ही आहेत एकच बाळे वात्सल्याशिवाय वेगळे काही बोलतात का दोघींचे डोळे?
Taxonomy upgrade extras

भुक

लेखक जयेश माधव यांनी शनिवार, 22/11/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
देवाकडे काही मागणे| हीच खरीतर चुक आहे| सर्व काही तोच देतो| मझी फक्त भुक आहे||
Taxonomy upgrade extras

संक्रांतीच्या शुभेच्छा

लेखक नंदन यांनी शनिवार, 22/11/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू!
Taxonomy upgrade extras

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 22/11/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.
Taxonomy upgrade extras

कर्णधारांची दैनंदिनी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 21/11/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि.प. करांना धाडसी गुप्तहेराचा नमस्कार. पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्‍याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया , फ़क्त मि.पा. सभासदांसाठि. बिशन सिंग बेदी :- ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्‍याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले.

एका `अभिनयसम्राटा'चा अंत!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 20/11/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.indiaprwire.com/downloads/200711295895-3.jpg नि षेध! त्रिवार निषेध!! "देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटलेला नाही, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटला आहे. एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे... "इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्‍यूँ?

प्रतिसाद वाद विवाद संवाद

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 19/11/2008 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
या काव्यासाठी प्रेरणा {आधीच अवांतरः}हे विडंबन नाही{अवांतर संपलं} हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे (विसोबा) खेचर आयई असो वा फाफॉ क्लिक मिपालाच मिळत असते लेखाकडून प्रतिसादाची वाट चालत असते प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात मगच त्यातून संवाद आकार घेत जातात आता मिसळ हापसण्यातच वैराग्य माझे संपले पण अवांतराचे बीज डोक्यात माझ्या उरले आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.