Skip to main content

विरंगुळा

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

लेखक दशानन यांनी मंगळवार, 17/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे. मी- कारे असं का वाटलं तुला ? तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे. मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ? तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला. मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते. तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन. मी- काय झालं व्यवस्थीत सांग. तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच. मी- मग, तु काय केलं. तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत..

एक संवाद !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/02/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
सर, नमस्कार ! ओळखलं का ? असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो. आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले. पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते! सर, तुमच्या लक्षात कसे राहील?

भेट तुझी-माझी स्मरते...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 16/02/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्‍या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील. मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे. कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्‍स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली.

लागण व्हॅलेंटाईनची!

लेखक रेवती यांनी रविवार, 15/02/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्‍यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल. तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते. आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्‍यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते.

ठकीचा संसार

लेखक प्राची यांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार. मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती. मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.

वाळणताई डे

लेखक त्रास यांनी शनिवार, 14/02/2009 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
[एका चीनी प्रवाशाच्या डायरीतले संदर्भ- त्याने २० व्या शतकात भारतखंडाचा प्रवास केला होता- त्यातील एका प्रसंगाचे हे मराठी भाषांतर] दुनिया झुकती है, झुकानावाला पाहिजे असे संत लखोबा लोखंडे ह्यानी म्हंटले आहेच. मल्टीनॅशनल कंपन्यांनी वात्सायनाच्या भारतदेशाला प्रेम करायला शिकवले. आम्ही *सांस्कृतिक आक्रमण* वगैरे म्हणतात ते हेच असे बरेचदा लोकांना सांगुन पाहिले पण फुकटचे सल्ले लोकांना नको असतात असे सिद्ध झाल्यामुळे ते थांबवले. त्यांनी आम्हाला मोराल पोलिसींग करतोस असे म्हणून एक बेक्कार लूक दिला.

माय व्हॅलंटाईन

लेखक दशानन यांनी गुरुवार, 12/02/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
माय लास्ट व्हॅलंटाईन ! कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... ! कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं..

कोकणवारी - आंजर्ले आणि केळशी

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 12/02/2009 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/5614 आंजर्ले - केळशी च्या या धागावर दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. त्याचाच पुढचा भाग आज इथे देत आहे. दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी लौकरच डॉल्फिन बघायला जाणार होतो.... हर्णे, कर्दे आणि आजुबाजुच्या परिसरात भरपुर डॉल्फिनस बघायला मिळतात. पण त्यासाठी सकाळी लौकर जावं लागतं...आम्ही जिथे थांबलो होतो मुक्कामासाठी त्याच गृहस्थांना आम्ही डॉल्फिन सफारीसाठी बोट ठरवायला सांगितली.

ब्रम्हकमळ

लेखक रश्मी यांनी गुरुवार, 12/02/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात की ब्रम्हकमळ वर्षात फक्त एकदाच फुलते. पण आमच्याकडे मागच्यावर्षी पावसाळ्यात ५ ते ६ वेळा ब्रम्हकमळ फुलले. एकूण २७ फुले आली.

ठेवणीतले आवाज ..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्‍याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही.