Skip to main content

विरंगुळा

पावसाळ्यातली नरसोबाची वाडी

लेखक श्रीमंत दामोदर पंत यांनी बुधवार, 22/07/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो.... माझा मिपावर काहीतरी लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे चुकभुल दे.घे. :) नरसोबाची वाडी !!!! सांगलीपासुन साधारणतः ३० किमी अंतरावर वसलेलं एक छोटसं गाव... गावापेक्षाही नावाप्रमाणेच वाडी आहे... पण अतिशय प्रसिद्धीला आलं ते दत्त महाराजांच्या तिथल्या वास्तव्यामुळं.... तसा मी नेहमी वाडीला जाणारा... पण पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही ( अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ) इतरवेळी संथ वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात मात्र रुद्र रुप धारण करुन वाहते. वाडीचं मंदिर अगदी नदीकाठी असल्यानी दरवर्षीच्या पुरात पाण्याखाली जातं.

पुणे - शिवथरघळ - पुणे

लेखक सातारकर यांनी बुधवार, 22/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार रिकामाच होता म्हणून शिवथरघळीला जाउन यायच ठरवल. आमच्या रीतीप्रमाणे ऐनवेळेला लढाईच्या आधीच दोन मावळे गारद. शेवटी पाचाच्या तिथ तिघच निघालो आणि स्वर्गात जाउन आलो. पाउस फार नव्हता पण तरीही जे काही समोर आल त्यांन डोळ्याच पारण फेडल.

वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 17/07/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो. रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्‍हेचे लिखाण केलेले असते. अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते. मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे.

माझे जगावेगळे? छंद

लेखक पाऊसवेडी यांनी बुधवार, 15/07/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
साप पकडायला आणि त्यांना हाताळायला शिकायचे आहे असे मी म्हणल्यानंतर घरात महाभारत,रामायण आणि पानिपत सगळे एकत्रच झाले होते आणि मीच त्याला कारणीभूत होते >:) कारण मुळातच मागच्या दहा पिढ्यान मध्ये कोणीही असेले काहीतरी छंद (आईच्या भाषेत नसते उद्योग) केलेले नव्हते. आणि मुळातच अशा काही गोष्टी करून काय सध्या होणार त्यापेक्षा साप जंगलात आणि मी घरी सुखी राहू शकते ना ? ;) असे आईचे म्हणणे होते. खूप दिवसांपासून माझी साप पकडायला शिकायची इच्छा होतीच 8> आणि आवश्यक तेवढ शिकूनही झाले होते :?

काही क्षण...

लेखक दशानन यांनी सोमवार, 13/07/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण... तुझा स्पर्श.. तुझा गंध... व कोठे तरी तुला देखील.. * हे असेच असते माहीत असून देखील अनोळखी मार्गावर मी नेहमीच पाऊल टाकतो काय मिळते मला काय माहीत पण सुखाच्या काही क्षणासाठी मी माझे प्राण देखील टाकतो.. वाटेवर.. सरळ चालणे मला जमतच नाही.. काय करु जन्माची खोड.. आता सुटेल लवकरच.. असाच कुठला तरी क्षण मला ही घेऊन जाईल बरोबर जशी तु गेलीस.. कळत नकळत. * कधी तरी असाच ... ग्लास हाती घेऊन बसतो मी.. कुठले तरी गाणे पीसीवर चालू असते... व कळत न कळत आश्रु डोळ्यातून. सवय आहे आजकाल मला त्याची.. सुखाची सावली असो वा दुखःची झळ... माझ्यासाठी तूच..

विरंगुळा !!

लेखक अनिल हटेला यांनी सोमवार, 13/07/2009 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! चित्रपट हा साधारण सर्वाच्या विरंगुळ्याचं ,मनोरंजनाचं साधन आहे,(असावं) मग तो चित्रपट मराठी भाषेत असो अगर हींदी ! ईंग्रजी असो वा इतर कुठल्याही प्रादेशीक भाषेत.. आज काल तर अगदी जपानी,चीनीतसेच इतरही अनेक विदेशी भाषेतील चांगल्या कलाकॄती आपणास उपलब्ध आहेत. तर मंडळी चित्रपटाच्या नावांकडे कधी आपण लक्ष दिलय का?

आठवणी पावसाळ्याच्या

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 11/07/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती. आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा.

(( आजचीच गोष्ट ))

लेखक दशानन यांनी शनिवार, 11/07/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजचीच गोष्ट. दोन दोन पेग झालेले. आतल्या बातम्या बाहेर निघण्याची वेळ. मित्रः तो परत आला आहे, नाव बदलून आला आहे म्हणे. मी: मग काय प्रॉब्लेम आहे ? मित्रः तु असे कधी केले आहेस का ? तेथे तर पळापळ होत आहे सर्वत्र. मी: तुझ्या बाने कधी केले होते का ? लोकांना काय झाले पळायला ? अमेरिकेतुन काय हिममानव आला कि काय ? मित्रः ते जाऊ दे. पण हे आपल्याला कसे जमायचे ? मी पण असे करु काय ? जरा गम्मंत- जम्मत, काय म्हणातोस. मी: भाड्या, न जमायला काय झाले ? आणी तो काय तुझी परवानगी घेऊन येईल का ? . आता आला तो आला परत दंगा घालेले येथे. मित्रः चार वर्षात तुझीही वेळ येईलच. मी त्याचे परत येण्याचे मनावर घेतले आहे आता.