मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.
दोसतार
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा.
मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे.
http://www.misalpav.com/node/47099
या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.
दोसतार
किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा.
आज वटपौर्णिमा सण,फेरे,पातिव्रत्य ,जीवनसाथी वैग्रे वैग्रे वर्ती खूपच चर्वितचर्वण सुरू असणार! आज ह्या भारतीय सणाच्या निमित्ताने मला एक कथा वाचण्यात आलेली होती ती तुम्हा सगळ्यांसमोर मांडावी असं मला वाटतं.
आपली ती तुम्ही नेमी नेमी ऐकता ती सत्यवान सावित्रीची कथा नाहीये ही !
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्यांदा आणि बर्याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही.
'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..!
उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..! हे बरं नाही..
हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय..
अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश.
उदयपूरच्या राणासोबत मुघल सत्ता पुढे अनेक वर्षे लढली. या युद्धात, बर्याच वर्षांनंतर मुघल साम्राज्य पराजयी ठरले. त्यावेळेस पादशहा अकबर मृत होऊन आणि जहाँगिर सत्तेवर येऊन अनेक वर्षे लोटली होती. पराजयाची नैतिक जबाबदारी घेत खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान सेनापती पदावरुन निवृत्त झाले. निवृत्त जीवनात त्यांनी पुष्कळ लिखाण केले. हिंदू महाकाव्य, विशेषतः रामायण हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी “रहिम” नावाखाली भरपूर साहित्यरचना केली. ब्रिजभाषेत सामन्यजनांना सहजगत्या समजतील असे दोहे त्यांनी रचले. संस्कृतमध्ये सुद्धा त्यांनी काही ग्रंथ रचले.
गवताच्या सळसळीतून आणि घोड्यांच्या टापांनी चुरडल्या जाणार्या पाचोळ्याच्या आवाजामधून सुद्धा अली कुलीला वाघाच्या गुरकावण्याचा आवाज आला. त्याने हाताची मूठ दाखवून सोबतच्या गावकर्यांना सावध होण्याचा ईशारा केला.
काही पावलांनंतर हरणाच्या धडावर पाय रोवलेला प्राणी अली कुलीला दिसला. रक्ताळलेले दात दाखवत वाघाने आपल्या शिकारीपुढे बचावात्मक पवित्रा घेतला.
नंतर, अली कुलीने विचार केला. एकूण सहा तलवार आणि भाला घेतलेली माणसे, एवढ्या ताकदीशी त्या वाघाने का झुंज द्यावी ? एका हरणासाठी ?