आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम !
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about आज काय घडले ... पौष शु. ८ पानपतचा अखेरचा संग्राम !
- Log in or register to post comments
आज काय घडले ...
पौष शु. ८
पानपतचा अखेरचा संग्राम !
शके १६८३ च्या पौष शु. ८ या दिवशी पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा अंत झाला व लढाई थांबली.
या दिवशी सूर्योदयापूर्वी मरूं वा मारूं या भावनेने मराठ्यांची सेना वीरश्रीने मैदानावर आली. श्रीमंत भाऊसाहेब व विश्वासराव घोड्यावर बसून निशाणाकडे निघाले. सर्वांच्या अंगांत त्वेष संचारत होता. लढाईचे तोंड भारी लागून मारामारी, खणाखणी, एक प्रहरपर्यंत चालू होती. भाऊसाहेब व विश्वासराव बारा वाजण्याच्या सुमारास घोड्यावर स्वार होऊन स्वतः हल्ल्यात पुढे झाले.
प्रस्तुती - शशिकांत ओक.