Skip to main content

विचार

नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/04/2018 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ सुमारे ३० वर्षे आधी नाशिक (गांधीनगर) येथून विमानांचे घरगुती (डोमेस्टीक) उड्डाणे होत होती. मी लहान असतांना एनडीसीसी बँकेच्या जुन्या इमारतीत (सीबीएस जवळील) इंडीअन एअरलाईन्स चे बुकींग काउंटर बघीतले होते. गांधीनगर धावपट्टी ही इंडीयन आर्मीच्या ताब्यात होती आणि अजूनही (२०१८) वापरात आहे. मी स्वतः कंपनीच्या कामानिमीत्त तेथे भेटी दिलेल्या आहेत. ही धावपट्टी कमी आसनी विमान उतरण्यायोग्य आहे. गांधीनगर विमानतळ हा नाशिक शहरातच आहे. त्यासाठी फार लांब जावे लागत नाही. अगदी शेअर रिक्षानेदेखील जाता येथे. गांधीनगर हे नाशिक पुणे रस्त्यालगतच आहे.

सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 06/04/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत ! असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता का? “Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ? या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ? नक्की कसले चेटूक आहे हे ?

अधिजनुकशास्त्र - समारोप

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 06/04/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्तापर्यंत जे काही किडुकमिडुक शिक्षण घेतले त्यात "असंबद्ध विचारांचा प्रतिवाद" या विषयाचा समावेश नव्हता त्यामुळे माझ्यामध्ये एक फार मोठे न्यून राहीले आहे याची मला जाणीव आहे. माझे अनेक हितचिंतक व नातेवाईक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी कधीच मला माझ्या "delusions of grandeur " विषयी सांगितले नाही याचे मला आश्चर्य वाटते आणि आता तर राग आला आहे. त्यांच्यावर कोणत्या कायद्या अंतर्गत दावा दाखल करता येईल का, याचा शोध घेत आहे. नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले.

गरिबीचा विळखा

लेखक परशुराम सोंडगे यांनी गुरुवार, 05/04/2018 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.

गरिबीचा विळखा

लेखक परशुराम सोंडगे यांनी गुरुवार, 05/04/2018 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.

बिथरलेले हिंदूत्व

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 03/04/2018 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले.

अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 03/04/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, काही दिवसांपूर्वी मी या ठिकाणी अधिजनुकशास्त्रावरील लेखावर बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी डॉ० जगन्नाथ दीक्षितांचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेचा दूवा डॉ० दीक्षिताना पाठवला होता (ते या समूहाचे सदस्य नाहीत). ही चर्चा वाचल्यावर त्यांच्याकडून आलेले विस्तृत उत्तर मी जसेच्या तसे पुढे देत आहे. मला आणखी काही गैरसोईची सत्ये सांगायची होती पण ती नंतर कधीतरी... -- युयुत्सु ON MY EPIGENETICS POST COMMENTS RECEIVED FROM J.K.Dixit, M.D: Rajeev Upadhye, asked me to look into his write up for this forum on epigenetics.

बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

लेखक साहना यांनी मंगळवार, 03/04/2018 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही. "Education in India - Scope for Reforms and Right to Education" A talk and discussion with Prof.

"लग्नातल्या फोटोंच्या गंमती जंमती"

लेखक फुटूवाला यांनी सोमवार, 26/03/2018 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल लग्नातले विधी हे फोटोव्हिडीओ मध्ये दिसले पाहिजे म्हणुनच केले जात असल्याचे पाहायला मिळतय. हात देवघरासमोर जोडतात पण पाहतात फोटोग्राफरकडे ते ठीकय पण व्हिडीओकडेही तसेच. या निमीत्त मी लग्नाची जी फोटोशुट केलेली आहेत त्याचे काही किस्से मि.पा.

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/03/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप). आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही.