Skip to main content

विचार

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 26/04/2018 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. प्रसंग पहिला. एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ? प्रसंग दुसरा. एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला.

माझं आजोळ बेळगाव

लेखक स्वप्निल रेडकर यांनी रविवार, 22/04/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .

"शिळा"लेख....

लेखक ss_sameer यांनी शुक्रवार, 20/04/2018 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही. कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही. आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो. अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे. आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल.

रामानुजम आणि रेमन झीटा

लेखक साहना यांनी शुक्रवार, 20/04/2018 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ ....... = -१/१२ समजा वरील समीकरण कुणी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काय वाटेल ? कि ह्या माणसाला गणित अजिबात येत नाही. सर्व पॉसिटीव्ह अंकाची बेरीज निगेटिव्ह कशी असू शकते ? पण गणिताचे मूलभूत सिद्धांत ज्यांना चांगले समजतात त्यांनी जर वरील समीकरणाला पहिले तर कदाचित त्यांना त्यांत थोडे तथ्य दिसू शकते. रामानुजम ह्यांनी हार्डीना जे पात्र पाठविले त्यात हे समीकरण होते. हार्डी ह्यांनी रामानुजमची प्रतिभा ओळखून त्यांना लंडन ला बोलावले. भारताच्या गुलामगिरीच्या काळांत जे काही थोडे चांगले साहेब होते त्यांत हार्डीचा नंबर फार वरचा आहे.

उन्माद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/04/2018 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात! जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात.

तुमच्या देशात....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 13/04/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते.

गाणे कसे बनते?

लेखक arunjoshi123 यांनी बुधवार, 11/04/2018 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो. ------------- कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय? कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी.

तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 11/04/2018 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी तमाशा म्हणजे अनेक गोष्टींची सरमिसळ असते. मात्र गवळणीतल्या मावशीने किंवा नाच्याने केलेले कंबरेखालचे विनोद किंवा सिनेमातली उडती गाणी आणि त्यावरील नृत्य असणारा तमाशा खऱ्या लावणी रसिकांना फारसा भावत नाही. एखादी अर्थपूर्ण आणि अदाकारीपूर्ण लावणी असली तर नक्कीच तो संपूर्ण तमाशा खास दाद मिळवून जातो. त्यामुळे लावणी हा तमाशाचा आत्मा आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे तमाशात लावणी असलीच पाहिजे. पण अनेकदा तमाशामध्ये जी लावणी सादर केली जाते ती केवळ शृंगारिक लावणी असते.

निष्ठा आणि लोणी

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 10/04/2018 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका जंगलात त्या जंगलाचा राजा सिंह रहात होता, त्याला काही उंदरांनी सतावून सोडले होते. ते उंदीर तो झोपलेला असताना त्याची आयाळ कुरतडत, त्याला त्रास देत. इतका मोठा सिंह पण उंदरांचा बंदोबस्त करू शकत नसे. म्हणून मग त्याने एक मांजर नोकरीवर ठेवले. मांजर सिंहाला त्रास देणाऱ्या उंदरांना खात असे. त्यामुळे सिंहाची झोपही नीटपणे व्हायला लागली. याबदल्यात सिंह मांजराला रोज दूध देत असे.

होत अस कधी कधी

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 07/04/2018 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
होत अस कधीतरी कधीतरी काहीतरी राहून जात. निवांत वेळी अचानक आठवत रहात. ऑफीस मध्ये कुठल्यातरी विषयावर प्रेझेंटेशन चालू आसत.तुम्ही त्यात असता आणि नसताही. कधी तरी अस होतेही किंवा होतही नाही. समोरच्या सफेद पडद्या वर अचानक तुमच्या आयुष्यातील क्षण चित्रे नव्हे स्थिर चित्रे दिसायला लागतात. तुम्ही दचकता इतराना तुमच्या मनातले पडद्यावर दिसतेय म्हणोन.