Skip to main content

विचार

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 23/03/2018 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना. आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे. माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम.

Dear Camera

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 23/03/2018 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
Dear Camera, देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे. तू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो.

सोबत आणि सोबतीचे परिणाम 

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 20/03/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झाल असावं अस मला वाटत. मग हळूहळू पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं.

माझे अपहरण

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 15/03/2018 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अपहरण ... मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे.. मी वाट पहात, दबा धरून बसलेय. मला माझेच अपहरण करायचे आहे.. कुत्रा माग काढणार नाही, भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही, गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही, शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही, नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही, कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही, .......

३५ रियाल

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 09/03/2018 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला. दुपारच्या टळटळीत उन्हात रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं.... मागे पडण्याऱ्या दुतर्फा खजुराच्या झाडांबरोबर त्याचे विचारही पळू लागले. ‘..... काये त्याला अक्कल? मी आलो आणि लेबर प्रॉब्लेम मिटवला. कामं मार्गी लागली. मी कागदावर काय आहे, काय नाही, ते जाऊ दे यांच्या उंटाच्या ***. पण प्रोजेक्ट मार्गी लागला ना!

सामाजिक उपक्रम -२०१८

लेखक निशदे यांनी शुक्रवार, 09/03/2018 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही.

मला भेटलेले रुग्ण - १४

लेखक डॉ श्रीहास यांनी बुधवार, 07/03/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42101 “आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात ....

"चव नै न ढंव नै सोंगाडी"

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 06/03/2018 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चव नै न ढंव नै सोंगाडी" - २०१६च्या युनिक फिचर्सच्या 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली अस्मादिकांची अहिराणी कथा ******** शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां. पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.

मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 05/03/2018 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
धुयानी होयी नि धुयवड लोकेसहो! धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस. मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद.

मराठी भाषा दिन विशेषांकातील माझा लेख

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 05/03/2018 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 'झी युवा' ह्या साप्ताहिकाने विशेषांक काढला होता. त्यात सोशल मिडिया आणि युवा पिढीची मराठी ह्या विषयावर लेख लिहायची मला संधी मिळाली. तो लेख इथे देत आहे. कार्यबाहुल्यामुळे लेख टाकायला उशीरच झाला आहे. तरी, ह्या विषयाची जाण येण्यासाठी माझा मराठी ब्लॉग्स, संस्थाळं, फेसबुक कट्टे ह्यावरील वावर आणि प्रामुख्याने मिपावरील आमचे सुवर्णदिन फार्फार महत्वाचे ठरले आहेत.