Skip to main content

विचार

आपला मानुसच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/02/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
'आपला मानुस'च्या निमित्ताने आजच आपला मानुस प्रेक्षागृहात झळकला. सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अभिनित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितलाच पाहिजे हे मी कधीच ठरवलं होत. अर्थात त्याच कारण अगदीच स्पष्ट आहे. सतीश राजवाडे सारखा सशक्त दिग्दर्शक साक्षात नाना पाटेकर सारख्या 'नटसम्राट' व्यक्तीला पडद्यावर कसं दाखवतो ही उत्सुकता तर होतीच. पण सोबत तेवढाच सशक्त अभिनय करणारा सुमित राघवन आणि स्वतःच वेगळेपण कायम सिद्ध करत आलेली इरावती हर्षे असे सशक्त कलाकार होते. खरच चित्रपट अप्रतिम जमून आला आहे यात वादच नाही. नानांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार?

हुंडीव्यवहार

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 06/02/2018 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले. तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे. अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय. हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो. हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती.

पेशवाईची अखेर आणि दुसरा बाजीराव

लेखक मनो यांनी मंगळवार, 06/02/2018 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती.

Sheet Anchor of Indian Chronology

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 02/02/2018 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही.

ऑस्ट्रेलियन ओपन चा अंतिम सामना आणि शैलीदार फेडरर...

लेखक ss_sameer यांनी बुधवार, 31/01/2018 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसे कायम चिरतरुण राहावीत अन त्यांच्या कलाकृती सतत येत राहाव्यात अस वाटत राहतं. ज्यांचं मन चिरतरुण असत अशा रसिकांची ही भावना देखील तितकीच चिरतरुण. ऑस्ट्रेलियन ओपन चा २०१८ चा अंतिम सामना संपल्यावर रडणारा फेडरर पाहून ही रसिक मंडळी अशीच पुटपुटली. सर्वकालीन महान खेळाडूंत ज्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर राहील आणि शेवटपर्यंत लोकप्रियतेच्या शिगेला असलेला हा खेळाडू. वयामुळे खेळाला मर्यादा येतात खऱ्या. जुन्यांनी ते ओळखून नव्यांना संधी द्याव्यात. परंतु ही व्याख्या सांघिक खेळाची. वैयक्तिक खेळात निवृत्तीचे वय जो तो ठरवतो.

मानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी मंगळवार, 30/01/2018 22:49 या दिवशी प्रकाशित केले.

उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग

१९५० ते १९७२ या काळात अमेरिकन संशोधक जॉन कोलनने लोकसंख्या वाढीचे परिणाम जाणून घेण्यासाठी उंदरांवर काही प्रयोग केले. या प्रयोगा अंतर्गत त्याने उंदरांना राहण्यासाठी सुमारे ३००० उंदरांना पुरेल असा मोठा पिंजरा तयार केला. पिंजऱ्यात अन्न, पाणी इत्यादीचा मुबलक पुरवठा होता. राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी परिस्थिती तयार करण्यात आली होती. त्यावरुन या प्रयोगाला ‘माऊस युटोपिया एक्सपेरीमेंट’ अर्थात ‘उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग’ असे नाव पडले. यात सर्व काही मुबलक असून बंधन फक्त एकच होते ते म्हणजे जागेचे.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

गीताई माऊली माझी...

लेखक विकास यांनी सोमवार, 22/01/2018 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 21/01/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love..) कथा - १ संक्रांत.. (प्रेमाचे उत्तरायण..) आज तिचा आरशासमोर नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता. दररोज ती स्वतःसाठी सजत होती पण आजचा तिचा साजश्रुंगार दुसऱ्या कोणासाठी तरी.. ज्याला तिला आपला करायचं होतं, त्याच्यासाठी होता. आज ऑफिसमध्ये संक्रात स्पेशल सर्व महिला वर्ग साडी नेसून येणार होता. हीच संधी होती तिला त्याला आकर्षित करण्यासाठी..! त्यासाठी काल तिने तिचा पूर्ण रविवार खर्ची केला होता. हवी तशी साडी शोधता शोधता तीचे अविरत श्रम झाले होते.

चलत-चित्र पद्मावतीची (रड)कथा आणि वर"करणी" स्वातंत्र्य...!

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 15/01/2018 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
तसे या विषयावर लिहिणारच नव्हतोत, परंतु मि पा वर चर्चा भीमा कोरेगाव वर लेख वाचले, मांदियाळीत चर्चा बहुत होते जाणवले, ततपश्चात "लिहून पाहू" ने झपाटले, आणि शेवटी टंकले...! तसे ऐतिहासिक संदर्भ पाहता आमच्या भूतकाळात आम्ही सदर ईसमाचे चित्रपट पाहिलेले नाहीत. (किंबहुना थेटरात जाऊन पाहिलेले नाहीत म्हणणे जास्त उचित). बाजीराव मस्तानी वा रामलीला चा एकही प्रसंग आमुच्या डोळ्यांसमोरून गेल्याचे आम्हास स्मरत नाही. हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट.