Skip to main content

विचार

मराठी दिन २०१८: मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

लेखक सूड यांनी सोमवार, 05/03/2018 11:26 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

इथे मिपावर मराठी भाषादिनानिमित्त लिहायचं निघालं आणि कधी नव्हे तो माझ्या मेंदूने बंद पुकारला. का विचारावं तर कारणं सतराशे साठ आहेत. पण याआधी असं कधी झालेलं आठवत नाही. आता पण लिहायला बसलोय खरा पण शेवट कसा होणाराय माहित नाही. त्यात इथे पुण्यात राहणं म्हणजे सगळीकडे एकतर साजूक तुपातलं शुद्ध पुणेरी मराठी किंवा मावळी बोली! अध्ये मध्ये काहीच नाही. इथे प्रत्यक्ष विचारल्याशिवाय फक्त लग्नपत्रिकेतल्या मुक्काम पोस्टावरून कळतं माणूस कुठल्या गावचा आहे. एरवी भाषा वर म्हटल्यासारखी दोन टोकाची.

अन्नदाता सुखी भव भाग ८ (पूर्ण): तोतयांच्या शोधांत

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 05/03/2018 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

अन्नदाता सुखी भव भाग ८ (अपूर्ण): तोतयांच्या शोधांत

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 02/03/2018 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 01/03/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २ भाग १ संस्कृत सुभाषितांच्या क्षेत्रात निश्चित उगम सांगता येईल असे थोडेच आहे. बहुतेक नीतिपर, व्यवहारज्ञान सांगणारे आणि बोलणार्‍यांच्या मुखामध्ये प्रत्यही असणारे असे श्लोक कोणातरी (आता अज्ञात) कवीची रचना असते. एकदा ती सर्वमान्य झाली की ती सुभाषितांच्या एका संग्रहातून दुसर्‍यात अशी फिरू लागते. ह्यातल्या बहुतेक संग्रहांचे पौर्वापर्य ठरविणे दुस्तर असते आणि मूळचा कोण आणि नक्कल कोणती हेहि ठरवता येत नाही. एक वचन लोकप्रिय झाले की ते वापरून दुसरा कोणी कवि त्याच्याभोवती नवा श्लोक निर्माण करतो.

२०१९ - लोकसभा निवडणूक

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 27/02/2018 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
.डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत.

प्रिय मायमराठी

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 27/02/2018 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

मला भेटलेले रूग्ण - १२

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 22/02/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41320 ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.

नोकरी आणि पकोडे

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 20/02/2018 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना तुम्ही सांगताय- नोकरी नाही, तर रोजगार करा मुद्रा योजनेतून कर्ज घ्या आणि 'पकोडे' तळा! ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत! त्यांच्या पदव्या हव्या तर डोळ्यांनी बघा त्या खऱ्या असल्याबद्दल खात्री करून घ्या या त्या पदव्या नाहीत की ज्यांवर कोर्टात केसेस चालू आहेत वा ज्या संशयास्पद आहेत ज्यांबद्दल माहितीच्या अधिकारातही माहिती दिली जात नाही! ज्या मुळात आहेत का नाही तेच माहित नाही! हे तेच लोक आहेत जे खऱ्या शाळेत गेलेत

धोकेबाज

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/02/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं.

बाप रे बाप..

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 12/02/2018 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!" विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले. हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील. पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.