Skip to main content

विचार

यश आणि अपयश

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 01/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. " प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं. भेटल्यावर मला म्हणाले, " थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या. गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली.

सुरेखा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 30/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?" साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी. मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो.

यु मी और 'हम'............

लेखक राधा यांनी मंगळवार, 29/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचक मंडळीना नमस्कार. 'व्यक्ती आणि व्यक्ती'(२ भाग) व 'वाघ्या' या लिखाणानंतर आता थोडा काही वेगळ लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. आधीच्या प्रतिक्रिया वाचुनच हे लिखण करते आहे , म्हणुनच पुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियांची साथ हवी आहे. इतक्यातच काजोल आणि अजय देवगण यांचा ' यु मी और हम' पिक्चर बघीतला. तो कसा बनला आहे किंवा अभिनयाबद्दल मला नाही लिहायच हा पण त्याची 'कथा' मात्र मनात घर करुन गेली. 'alzimer'हा रोग झालेल्या एका स्त्री ला तिचा नवरा नव्हे ' जीवनसाथी' कसा आधार देतो ते यात दाखवले आहे.

किती सत्य आहे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 28/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दाचा उद्दा नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार." त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.

गणेशोत्सव

लेखक ऐका दाजीबा यांनी रविवार, 27/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं? गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात. अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!

आमचे मधुभाई...!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 25/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो.

'वाघ्या'

लेखक राधा यांनी शुक्रवार, 25/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वाघ्या नावातच कस दमदार व्यक्तिमत्व झळकत ना. अहो .....होताही तो तसाच दमदार, भरभक्कम , निधड्या छातीचा. तो दिसला की कोणाची बिशाद नव्हती त्याच्यासमोरुन चालण्याची. नावाप्रमाणेच अंगावर वघासारखे कातडे, झुबकेदार शेपुट, तिक्ष्ण नजर अन भुंकला तरी वाघाने डरकाळी फोडावी तसा आवाज. हो असाच होता आमचा इमानी कुत्रा 'वाघ्या'. वाघ्या ची आमच्या घरात entry तशी मजेशीरच झाली. माझ्या बाबांना प्राण्याविष्ई खुप प्रेम, खास करुन कुत्रा अन मांजर अगदी उंदीर सुध्दा.

काव्यकर्तनालय बंद होते तेव्हा..!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 23/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
'मिसळपाव' उघडलं आणि केशवसुमाराचे विडंबन नाही असे दिवस माझे तरी फार थोडे गेले. पान उघडल्यावर 'काव्या'च्या विभागात केसुशेठचे एखादे फर्मास विडंबन वाचायचे आणि पुढच्या उद्योगाला लागायचे हा माझा शिरस्ताच झाला होता म्हणा ना. परवा केसु ने निवृत्तीची घोषणा केली आणि विनंत्या, आर्जवे, कविता, विडंबने, प्रतिविडंबने यांचा पाऊस पडला. केसु आणि निवृत्त? असं काय झालं? मलाही थोडे बावचळल्यासारखे झालं खरं आणि मी ही एक विडंबन करण्यास उद्युक्त झालो.

शाळा

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 23/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा अथांग सागर यांच्या आठवणी या कवितेमुळे आम्हाला ही शाळेची आठवण झाली ------------------------------------------------------------------------- शाळे समोरुन जाताना बालपण मनात गवसत वर्गात डोकाऊन पहाताना आठवणींनी मन भरतं मागे वळुन पहाताना वाटत तिथेच आहोत आज तेच सर्व मित्र अन् तोच बसायचा बाक आठवणी असतात अभ्यासाच्या मार दिलेल्या गुरु़जींच्या मधल्या सुट्टीत गंमत भारी होती शाळा माझी न्यारी. माझ्याही आहेत अनेक आठवणी शाळे मधल्या गमतीच्या खेळामधल्या मस्तीच्या सहलीतल्या सफरीच्या ह्रदयात त्या रुजल्या आहेत कायमच्या घर करुन बसल्या आहेत
Taxonomy upgrade extras