Skip to main content

विचार

आवाहन

लेखक राघव यांनी गुरुवार, 14/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जयालागी ध्यास, नामाची आस, कोण श्रीमंत दास, तयावीण. भावाची प्रचीती, राम स्वयें सांगाती, प्रेमाची महती, वर्णावी किती!! रामाचे पायी, जया चारी धाम, विचारांचे काम, तयासी कैसे. मोजावे कशास उरलेले दिन, नामी समाधान, आनंदी असावे. राम ठेवी जोवर, त्याचे असावे तोवर, अन् निघावे सत्त्वर, हाक येता! नामी राहावे मन, नाम असावे प्राण, मुमुक्षूचे आवाहन, सगळ्यांसी. मुमुक्षू [टिप: ही कविता आधी दुसरीकडे याच नावाने प्रकाशीत केलेली आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

दृष्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 14/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टी वर्तमानाच्या खांध्यावर बसून भविष्याकडे पाहीले. धुक्यातून काहीच दिसेना पण ऐकू आले अस्पष्ट नाद. बोलावणारे, भुरळ पाडणारे. त्या नादाचे बोट पकडुन सुखाच्या शोधात जावे म्हटले. पण ठेच लागण्याच्या भितीने पाउल पुढेच पडेना! भुरळ पाडणारे नाद येतच होते. नंतर तेही धुक्यात विरून गेले. धुके आणखिनच दाट. मी मुके धुके ऐकत तिथेच थिजलेला. .............. वर्तमानाच्या खांद्यावर बसून मागच्या दिशेला भूत पाहीले. स्वच्छ प्रकाशात उजळलेल्या वाटा फ़ुले काटे खड्डे रस्ते महाल झोपड्या स्पष्ट ऐकू येणारे नाद, संगीत, सूर, बेसूर. अगदी डोळे मिटून, कोणाचेही बोट न पकडता जाऊ शकेल मी त्या दिशेला. पण फक्त
Taxonomy upgrade extras

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 13/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 13/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे. स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं? गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.

विचाराच्या पलिकडले.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 12/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.मझी त्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही. मी त्यांच्या भावाला सहजच म्हणालो, "कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा" थोडासाचा विचार करून ते म्हणाले, "मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो. एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं. माझा

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 11/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
एका विद्वान माणसाने मला सांगितलं, "तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे." कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही. तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्या दारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता. ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत

हे मि.पा. वर काय चालले आहे?

लेखक गमत्या यांनी शुक्रवार, 08/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मि.पा. संकेतस्थळा चे भारताच्या लोकसभेमध्ये रुपांतर झाल्याचा भास मला क्षणभर झाला. खरे तर मि.पा. ला निखळ आनंद देणारे संकेतस्थळ म्हणुन माझ्यासारखे हजारो, लाखो वाचक भेट देत असतात पण मागील काही दिवसां पासुन कोणत्या हि लेखाच्या प्रतिक्रियांमध्ये जी काही चिखल फेक होते आहे ति बघुन असे वाटते काहि तरी चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत. मि मि.पा. च्या एकाहि सदस्याला व्यक्तिगतरीत्या ओळखत नाही याची कृपया नोंद घ्यावी. आणि मि.पा. मध्ये चाललेल्या अंतरगत राजकारणामध्ये हि मला काडीमात्र रस नाहि. मला फक्त येवधेच सांगावे वाटते कि मि.पा.

वृत्ती-प्रवृत्ती..

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 08/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली. वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.