विचार
पांडेकर आजी..
लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.
"वयनी..... " अशी किनर्या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.
बदल तर घडतोय...
टीक-टॉक
टीक-टॉक
टीक-टॉक
ठांग!
लोलक,
जागच्या जागी फिरतोय!
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
ठक्काक!
मानव,
जागच्या जागीच चालतोय!
ठांग!.
ठांग!!..
ठांग!!!...
तरी ..बदल तर घडतोय...
मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं!
अखंड,
अविरत...
अथक!!
बदल तर घडतोच आहे...
क्षणा क्षणाला..कणा कणाने,
वाढणार्या एव्हरेस्ट प्रमाणे!
क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने,
वितळणार्या हिमाद्री प्रमाणे!
एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे,
दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे!
एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे...
पुढे..
मागे..
जिथल्या तिथे!
जिथल्या तिथे..
मागे..
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २
(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.)
पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण
(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन)
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला.
छचोर
पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!
एका सागरात....
एका सागरात एक जन्मा आली लाट,
जीवनाच्या प्रवासाची केली तिने सुरुवात.
तिच्या सवे होत्या तिच्या सख्या अन्य लाटा,
या सागरातून त्या सागरात ती राहिली फिरत.
एका सागरात एक जन्मा आली लाट.
कधी चंद्र सुर्याची लाभे तिला साथ,
कधी अवसेचा काळोख पदरी येत.
तरीही नाही भ्याली राहिली चालत.
एका सागरात एक जन्मा आली लाट.
चालता चालता तिला दिसला किनारा,
मॄत्यु पुढे पाहून तिचा जीव घाबरा झाला.
डोळ्यात उभे राहिले अश्रु तिच्या नकळत.
एका सागरात एक जन्मा आली लाट.
तिला रडताना पाहून सोबतीन म्हणाली,
"रडू नको गडे ही सुवर्णसंधी आली,
ज्याने जन्म दिला होने त्यात सामाविष्ट,
याहुन मोठे सुख नाही या जगतात."
एका सागरात एक जन्मा आली
Taxonomy upgrade extras
छंदोमयीतील भावनर्तन!
'वादळवेल' या कुसुमाग्रजांच्या कविता छंदोमयी या काव्यसंग्रहात १९८२ मध्ये प्रसिद्ध झाल्या. यातील ८१ कविता नाशिकच्या परिसरातील पुण्यसलिला गोदावरीला त्यांनी अर्पण केल्या आहेत. रचनेच्या दृष्टीने या संग्रहात वैविध्यपूर्णता आली आहे, पण विषयाच्या दृष्टीने मात्र आधीच्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या वळणापेक्षा वेगळे वळण या कवितेने घेतले आहे अस मात्र दिसत नाही असे डॉ उषा देशमुख ह्यांनी म्हटले आहे.
परंतु माझ्या मते येथे आत्ममग्न वृत्तीचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. कसाला लागला आहे येथे अंतस्थ वीणेचा विषण्ण सूर!
आकाश व माती यांच्या नात्याचा शोध हा कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला लागलेला छंद.
कंहाभारत आणि सरकार राज
मी मिसळपाववर नवा आहे आणि थोडाफार लिहायचा प्रयत्न करणार आहे. काही चुका झाल्या तर निदर्शनास आणून देऊन योग्य मार्गदर्शन करावे.
काल देवदत्त यांनी लिहिलेला पौराणिक कथांवरील लेख वाचला आणि youtube वर नव्याने सुरू झालेलं महाभारत (की कंहाभारत म्हणावं? ) पाहिलं. या मालिकेच्या दिग्दर्शकानं सरकार राजच्या रामूकडून ट्रेनिंग घेतलेलं दिसतंय. तसेच शिवाजी नागरे हे दररोज नवी लुंगी वापरत असल्याने त्यांच्या वापरलेल्या काळ्या लुंग्यांपासून कंहाभारतातल्या सगळ्याच पात्रांचे कपडे बनवलेत असा माझा ठाम विश्वास आहे. सगळ्यांना काळे कपडे घालायला लावण्यामागे दुसरे काही कारण असू शकते असं मला वाटत नाही.
पुण्यात लव्हर्स पार्क!! मीमराठी
कही दिवसंपुर्वी TV वर एक चर्चा पाहिली... नाव होते "पुण्यात लव्हर्स पार्क! - असावी कि नसावी".
अनेक लोक प्रतिक्रिया देत होते परंतु ज्या चैनल वर हा कार्यक्रम होता तो चैनल एवढा प्रसिद्ध नाही, त्यामुळे चर्चा एकाच भागात संपली... !! माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. ( सामाजिक द्रुष्ट्या.. ) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिले तर थोड्या अधिक सुधारणा आवश्यक असतील.. ! आता खरचं विचार करण्याची वेळ आलेली आहे... कारण तर सुज्ञांना माहितच आहे !!
कृपया आपले मत नोंदवा... ह्या लेखांच्या प्रतिक्रियांवर मी रोज नजर ठेवून असेन.. !
शर्यत
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ...
कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो
कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो
कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार
कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार
काही चिकटवत, काही झटकत,
अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत.
धावणारे, धापा टाकणारे,
पाय ओढीत चालणारे,
विजयोन्माद करीत सुसाटणारे,
धक्काबुक्की करीत माजणारे,
स्वत: पडून रस्ता अडवणारे,
दुसर्याला पाडून रस्ता मिळवणारे,
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
कोणाकडेच वेळ नाही
ना पडलेल्याला सावरायला
ना कोणाकडे बघायला
समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही
वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही
सर्वातून
मिसळपाव