Skip to main content

विचार

देवाची मुलाखत

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 23/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नात साक्षात ईश्वर दिसला म्हणला माग काय मागायचे तुला देवा एक मुलाखत द्या मला का कलीयुगात जगाला विसरला? तुम्हीच तर वचन दिले गीतेतून दुष्टांच्या विनाशा याल परतून काय मिळाले ह्या विश्वासातून? धर्म रसातळाला चालला जगातून
अजाण आहेस तू, ईश्वर हसला अरे माझे बोल आठवतात मला धर्माची ग्लानी कुठे झाली म्हणायला? पुन्हा मी धरतीवर अवतरायला
संकटात का होइना, लोक हात जोडतात धर्माच्या नावाने दान करतात चर्च, मशीदी, मंदीरात ध्यान करतात तरीही धर्म बुडतोय का म्हणतात?
Taxonomy upgrade extras

"रौशनी "

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 23/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बी रोमन इन रोम असे कुणीसे म्हंटले आहे. त्याचा अर्थ प्रत्येकजण आपआपल्या मकदुराप्रमाणे घेतो.माझ्या पुरता तरी तो आपले गाव सोडले की थोडे शिष्ठाचार बाजुला ठेवुन द्यावे. थोडे मोकळेढाकळे वागावे असा आहे. नव्या गावात जेथे कोणी आपल्याला ओळखत नाही तिथे थोडे वेगळे कपडे वापरले नेहमीचा कपड्यातला ईस्त्रीचा कडकपणा बाजुला ठेवुन झब्बा सलवार सारखा मोकळेपणा वागण्यात येतोच. अन्यथा एरव्ही अंबाडा दोनवेण्या तेल लावुन चापुनचोपुन असणारी काकुबाई हील स्टेशनला जीन्स घालुन बागडताना दिसली नसती. ही सगळी गणीते पुण्याला लागु होत नाहीत.

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

लेखक चिन्या१९८५ यांनी मंगळवार, 22/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्. समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ त

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता...वाचता.......कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ....दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे.

"गाण्यातली लय!" - तात्या उवाच! (भाग १)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, माझ्या "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ या लेखाला प्रतिसाद देताना पक्या यांनी ताल व लय यात फरक काय आहे? हा प्रश्न विचारला आहे. याचे ढोबळ मानाने उत्तर द्यायचे झाले तर प्रथम ताल म्हणजे काय हे ढोबळमानाने पाहावे लागेल. ताल म्हणजे लयीला बांधून ठेवणारी गोष्ट! एखाद्या गाण्याच्या चालीनुसार जी लय असते त्या लयीला अतिशय सुरेख रितीने व सुसुत्रततेने बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे ताल. मग तो कधी एकताल असेल, कधी त्रिताल असेल तर कधी केरवा असेल. हे सगळे तालाचे विविध प्रकार आहेत.

विठू सांगे...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ?

गुरु- एक मार्गदर्षक

लेखक राधा यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरुपौर्णिमा........... तेव्हा प्रथम माझ्या गुरुंना आणि श्रध्दा स्थनांना मी नमन करते. प्रत्येक झण आपल्या जिवनात कोणाला तरी आदर्श मानुन पुढे चालत असतो. कोणी देवाला, कोणी गुरुला, कोणी एखद्या महान व्यक्तिला तर कोणि स्वतालाच. पण जीवनात सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असतेच. माझे आई-वडिलच माझे खरे गुरु आहेत . ज्यांनी मला या जगात 'जगण ' शिकवला.

बैल

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच बैल असतो कोणीतरी फटके टाकत असतो आणि आपण पळत असतो फक्त दोनवेळा अन्न आणिउतम निवार्‍यावर खुष असतो मालकाच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो. आपण सगळेच बैल असतो मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी त्यानी आपली पाठ झाकावी कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो आपण सगळेच बैल असतो आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते ती जाणीवच थिजलेली असते उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो
Taxonomy upgrade extras