Skip to main content

विचार

पुन्हा सालं 'वैचारिक'

लेखक यकु यांनी मंगळवार, 13/03/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.

सुरस दिल्ली आणि चमत्कारिक आग्रा.

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 11/03/2012 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
तर या डिसेम्बरात दिल्ली-आग्रा भागात गेलो होतो.उत्तर भारतात जाण्याची ही अस्मादिकांची पहिलीच वेळ. काम होते एका दिवसाचे परंतु जरा जिवाची दिल्ली करावी म्हणून ठरवले जरा रजा टाकू आणि इकडे तिकडे चोहीकडे फिरू. मग फिरलो. भोज्ज्याला शिवून परत येण्याइतका वेळ असलेले पर्यटक दिल्ली-आग्र्यात जिथे जिथे म्हणून जातात तिथे तिथे गेलो-बरीच ठिकाणे पहायची राहून सुद्धा गेली पण त्याला नाइलाज होता.म्हणजे वेळेपुढे, थंडीपुढे आणि अस्मादिकांच्या सनातन आळसापुढे. एखादा गेंडा मारून त्याच्या कातड्याचे केलेले असावे असे वाटायला लावणारे एक जाडजूड जॅकेट इथे भीमथडीवरच खरीदून गेलो म्हणून निभाव लागला.

झुंई...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 09/03/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्विल आणि विल्बर या दोन राईट ब्रदर्सनी १७ डिसेंबर १९०३ या दिवशी पहिलं विमान उड्डाण केलं.. असं आपण सर्वांनीच ढोबळपणे ऐकलेलं असतं..तारीखवार कदाचित माहीत नसेल, पण राईट ब्रदर्सचं नाव विमानांशी जोडलं गेलंय हे आपल्याला माहीत आहे. तसं पाहिलं तर राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्‍या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधीच जमलेली होती. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं..

" वांझ .."

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 08/03/2012 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरच्या सर्व स्त्री सभासदाना ' जागतिक महिलादिना ' च्या हार्दिक शुभेछा ..!! __________________________________________________ " वांझ .....!!" लागतो ना हा शब्द? तोडतो कुठेतरी आत ,अस काहीतरी करून जातो ,कि परत उभारी घेण कदाचितशक्यच होत नाही. दोन अक्षर एका अनुस्वराला घेवून दिमाखात समोर येतात ,एका असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना ह्यांच्यावर जोरदार वार करतो ,तोही एका फटक्यात .मागचा पुढचा विचार न करता . तिला काय वाटेल? तिच्या मनाला लागेल का?? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का एका इवल्याश्या शरीराची उब .?

एकात एक...

लेखक गवि यांनी बुधवार, 07/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
भात लावायचाच ना भांड्यात.. मूठभर डाळ त्यातच टाकू.. होऊन जाईल एकात एक.. भेकरटाप्रमाणे चहाच्या कपावर धरलेलं ओलंगिच्च बिस्कीट.. लपलपत पत्तकन चहात पडण्याची वाट पाहताना पुन्हा चटका मिळणार म्हणून शहारलेलं.. ते पडल्यानंतरही इकडे पेपरात रुतलेली बुबुळं तिथेच भिरभिरत राहतात.. चहासोबत पेपरही संपवू.. होऊन जाईल एकात एक.. आईची एकसष्ट पूर्ण झाली.. विधीबिधीवर विश्वास नाही पण सगळ्यांना बोलवायला हवंय एकदा....गेट टुगेदर.. रविवार बघून एकदाच एकत्र..बाहेरच कुठेतरी थाळी घालू सगळ्यांना..थाळी म्हणजे फिक्स बिल.. नव्या फ्लॅटची पार्टी, गाडीचीही मागताहेत साले कधीचे... आणि एकसष्टीपण..

समलिंगी संबंध.....

लेखक अमितसांगली यांनी बुधवार, 07/03/2012 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
लैंगिकता हि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचे काही लैंगिक अग्रक्रम असतात. पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारे आकर्षण व स्त्रीला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण(भिन्नलिंगी आकर्षण) हे समाजाच्या सर्व घटकाद्वारे नैसर्गिक मानण्यात आले आहे. समान लिंग असणाऱ्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधाना समलिंगी म्हणतात. पुरुषांचे पुरुषांशी संबंध असतील तर त्यांना गे म्हणतात व स्त्रीचे स्त्रीशी संबंध असतील तर त्यांना लेस्बिअन म्हणतात. समलिंगी संबंधातून मुल जन्माला घालता येत नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानण्यात आले आहेत.

आशियाड बसेसबद्दल काही

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/03/2012 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
रामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो. राज्य परिवहन महामंडळ सार्‍या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र नाही. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो.

वाट चुकलेली बस - एशियाड

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 02/03/2012 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा १९७० पासून आजपर्यंतचा प्रवास म्हणजे सामाजीक स्थित्यंतराच्या व्यवस्थापनाच्या फसलेल्या प्रयोगाचे एक नेमके उदाहरण आहे. सार्वजनीक व्यवस्थेवर पडणारा ताणामुळे सत्तरीच्या दशकात या शहराची शिवण उसवायला सुरुवात झाली होती. नव्या बदलाला जनता वेगवेगळ्या मार्गानी सामोरी जात होती. गिरगावातून इतर उपनगराकडे स्थलांतराला वेग आला होता . बॅकबेचा भराव संपत आला होता. नरीमन पॉइंटच्या बहुमजली इमारती उभ्या रहायला सुरुवात झाली होती. एका बाजूस अशी परीस्थिती तर दुसर्‍या बाजूस आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी भरभराटीला आली होती . १९७१ पर्यंत अनधिकृत झोपड्यांना विजेचा पुरवठा होत नव्हता.

बोंबाबोंब...

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 02/03/2012 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20863 हा धागा.. खरं तर ह्यावर प्रतिक्रीया देवून थांबणार होतो, पण "अंगापेक्षा बोंगा जड" होईल म्हणून म्हटलं वेगळा धागाच काढूया.. (त्यातल्या रणजितजींच्या प्रतिसादावरुन शिर्षक सुचलंय. "अभ्यासु" टायपातलं आणि विषयाशी फारसं निगडीत नाही, त्यासाठी सॉरी बॉस.. ;-)) ************************************************************** माझ्या मेघालयावरच्या लेखावर प्रतिक्रीया देणार्‍या काही जणांनी इथल्या जेवण-खाणाबद्दल विचारलं होतं. आसामप्रमाणेच इथेही मुख्य खाद्य म्हणजे भात.. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे नसतात.

डेली सोप मालिका कशी बनते .

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 02/03/2012 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली टीव्ही वर लागणाऱ्या मालिका लागतात त्या पाहून त्या कशा तयार होत असतील याचे चित्र मनात उभे राहिले. १ ) प्रथम मालिका चालण्याकरिता कलाकार शोधले जातात..इतर मालिकांमध्ये ज्यांची कामे संपली आहेत किंवा त्यांना काढून टाकले आहे , किंवा त्यांचे पत्र परत जिवंत होवू शकत नाही ( सास भी.. मधील मिहीर सारखे ) अश्या कलाकारांची यादी बनवली जाते .