Skip to main content

विचार

प्रेयर्स फॉर बॉबी

लेखक प्रसाद प्रसाद यांनी बुधवार, 29/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती.

'सचिन'चे महाशतक : आमचाही धागा

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 29/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताची क्रिकेटमधे श्री लंकेबरोबर गाठ पडली. भारतीय क्रिकेट टीमची सध्याची स्थिती आणि गती पाहता कुठल्याही आशा नव्हत्याच. अपेक्षा नाहीत त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:खही नाही. असा सुज्ञ विचार भारतीय क्रिकेटरसिक करू लागलाय.

ईशान्य भारत ...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....?? आक्रोक्ष माझ्या जगण्याचा....कोणी जाणून घेता का....?? कुणाचा असेल हा जीवघेणा आकांत..?? चिमुकल्या स्त्री गर्भाचा कि दंगलीत होरपळलेल्या कुटुंबाचा..?? सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा कि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा..?? अपयशी विद्यार्थाचा कि महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्याचा....कुणाचा...?? भारतीयच परंतु प्रगत रस्ते, वेगवान मोटारी, हवे तेवढे मॉल्स, सुसज्ज दवाखाने, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व सुख सोयीपासून वंचित असलेल्या ईशान्य राज्यांकडील लोकांचा हा आवाज आहे . मागासलेपणा, दळणवळणाची अपुरी साधने, उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी, जबरदस्तीने होणारे ख्र

तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन खालील कथन प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ या ग्रंथातील संदर्भ टीप क्रमांक 2 वरून उद्धृत केले आहे. येथे ‘चमत्कारां’ना ‘तथाकथित’ हे विशेषण लावण्याचे कारण ‘चमत्कार’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे आहे.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

Social Networking वरील निर्बंध....

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 27/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार.... इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी.

कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही .

चाळीशी ……… गद्धे पंचविशी

लेखक यशोधन वर्तक यांनी शनिवार, 25/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात अनेक वाढ दिवस साजरे झाले . चाळीशीत गेलेल्या सोबत्यांचे अभीनंदन सार्वजन मिळून करत आहेत.खरच चाळीशी झाली की आपला या जगाकडे बघायचा नजरियाच बदलतो नाही ! जन्माला आल्या पासून ते शाळेत जायला लागे पर्यंत आपण तसे सर्व दृष्टीने तसे परावलंबीच असतो. शाळेत जरा इतर मुलां मध्ये मिसळल्यावर आपल्याला थोडीशी मतांची शिंगे फुटायला लागतात . मैत्री भांडण राग लोभ अशी भावनांची आंदोलने याच वयात सुरु होतात ती अगदी कॉलेज मध्ये जाई पर्यंत पुरतात. साधारणतः शाळेत असताना आपले आयडॉल्स क्रिकेटपटू सैनिक , लेखक होते. चार्ली चाप्लीन , लॉरेल हार्डी , मिकी माउस , आपल्या आवडी होत्या .

कालाय तस्मै नम:

लेखक यकु यांनी शुक्रवार, 24/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही.

शि द फडणीस

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 22/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.