Skip to main content

प्रतिक्रिया

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा... भाग २

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 16/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/1844 भाग १... काही सिनेमे असतात त्यांवर अवांतर गप्पा ठोकता येतात.. त्यासाठी हा धागा काढला होता, आधीच्या धाग्याचे पान भरल्याने नवीन भाग २ काढला आहे.... ______________________________ रब ने बना दी जोडी हा आदि चोप्राचा सिनेमा मी पाहिला ... नवरा मिशी काढून केस फेंदारून टाईट टी शर्टमध्ये आला म्हणून बायको त्याला ओळखत नाही असे एक गृहितक मान्य केले तर सिनेमा पाहता ये ईल.... त्या नव्या माणसाच्या भूमिकेची शाहरूखने अत्यंत ओव्हरऍक्टिंग करून वाट लावली आहे... पण आधीचा सुरिंदर साहनी त्याने अप्रतिम उभा केलाय....

-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल निवेदन

लेखक ईसकाळ यांनी शनिवार, 13/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्‌ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल.

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 09/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 02/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते.. माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे! महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे! तात्या.

केवळ आधुनिक शस्त्रास्त्रांनी भागणार नाही....

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांकडे केवळ शस्त्रेच कमी आहेत असं नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी जागांचीही कमतरता आहे असं दिसतंय, firing ranges (आवश्यक असल्यास खाजगी देखील) मिळायला हवीत.

अनाम वीरा ...

लेखक मैत्र यांनी मंगळवार, 02/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

कसं काय पाटील बरं हाय का

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 01/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... सातार्‍याचे तुमी, तासगावचे तुमी, ते न्हाय न्हाय न्हाय लातूरचे तुमी सांगा आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. काल म्हनं तुमी मीटिंगला गेला. मॅडमना राजीनामा देऊन आला. केली कुनी खोडी, गेली लाल गाडी. आज काय शिल्लक र्‍हायलंय का..! आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... दिल्लीमधे जवा बाँबस्फोट झाला. तीन तासात तीन सूट बदलून आला. हाय काय कोडं, सांगा तरी थोडं. खाली नका बगू आता लाजताय का..! काल काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का.. काल काय ऐकलं

एक जुनी कविता: सहज आठवली म्हणून

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 30/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा वारे युद्धाचे वाहती जवान नाहती कौतुकात शत्रूच्या भयाने होतो थरकाप मुखी आपोआप राष्ट्रगीत थंडी नि वार्‍यात झुंजती जवान शब्दांचेच दान त्यांना द्यावे आणि कोणी वेडे हुतात्मेही होती त्यांची देशभक्ती गौरवावी संपताची युद्ध त्यांना विस्मरावे आपण रमावे आपल्यात रात्रंदिन त्यांना युद्धाचा प्रसंग नेते सारे दंग स्वार्थामाजी
Taxonomy upgrade extras

माझ्या मनातले!

लेखक अनामिका यांनी शुक्रवार, 28/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे!!!!!!!!!! अजुन संपले नाही असे समजते आहे? ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे. काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का?