Skip to main content

प्रतिक्रिया

पार्थीव

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 12/03/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
येते एक बांग मशिदीतून चीरुन शांतीचा पडदा.. अन देवूळी, गोड भुपाळी दंग उठविण्या दगडा...!! अन इथे... परि माणुसकीचे पार्थिव येथे पडले हो बेवारस... कुत्रे एक परि,करुनी तंगडी वरी मुतले त्यावरी, फस..फस..! पंचम्रुतं स्नानं करिश्ये... पुरोहितांचा मंत्र गजर देवळातल्या मुर्ती वरती दह्या दुधाची संतत धार.. इथे.. घोंगवती प्रेतावरती असंख्य माशा किती अंग चोरुनी उभी माणसे. दुरुनच जरा बघती... तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान.. मंदिरात चाले किर्तन... आली आली पोलीसाची, गाडी आली कुठुन करुनी पंचनामा, माणुसकीचा नेले प्रेता उचलुन...!! मंदिरातले संत श
Taxonomy upgrade extras

(प्रातःध्वनि)

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 09/03/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर अंथरूणातून आरश्यासमोर तोंड धुताना ब्रश मला म्हणाला "घास रे मेल्या घास, लवकर घास" आळस देताना अंग मोकळं करताना चुकून पोट म्हणालं ढम ढम ढम... ट्रेनच्या बाकड्यावर शेजारच्या भय्याचा घामट दर्प घेताना चष्मा म्हणाला "तरी मी तुला सांगत होतो भलतीकडे बघू नको"
Taxonomy upgrade extras

मातिच्या मुंग्या

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... जाता जाता वेळ गेला कळले नाही कधी सरले बालपण... उचलली जीभ लावली टाळ्याला बोलू नका तूम्ही काहीपण... मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली हाती उरले फक्त वेडेपण... का म सु (काही महत्त्वाच्या सुचना) १. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्‍याने चोरली आहे असे समजावे. २. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. ३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी. ४.

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

लेखक वाचक यांनी गुरुवार, 05/03/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते. एवढे काय आहे ह्या पुस्तकात ?

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)

पैशे महत्वाचे की, मित्र.

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा स्व-अनुभव आहे. क्रुपया वाचण्याठी वेळ द्यावा. ही. नम्र विनंती. मि. पा. करांनी / करींनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.ही. (दुसरी )नम्र विनंती. माझ्या जवळ्च्या काही मित्रांना मी काहि रुपये उधार दिले आहेत. मागतांना अत्यंत गरज आहे, महत्वाचे काम आहे, असे काहिजण म्हणाले होते, मी पण मित्राला मदत म्हणुन रुपये दिले. सगळेजण २-३ महीन्याच्या आत परत करु असे म्हणाले होते. पण आज पर्यत्न कोणी सुध्दा परत केले नाहि. काहिना मी तर क्रेडीट काड वरुन रुपये काडुन दिलेले आहेत. (प्रोसेसिग फी, व्याज मीच भरले, भरत आहे) माझ्या मते, जसे रुपये मागायला हे आले होते, तसेच परत करण्यासाठी सुध्दा त्यांनिच यायला हवे.

यालाकमो हिदा श्यादि

लेखक दशानन यांनी सोमवार, 02/03/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
लेतेसनि रसु नतुलिन्जओ ते लम तव्निकु हेआ सवशा त्तोघे लेकमो की मी त्ताअ तरुविनि हेआ कुए द्या जम रिसबा त्य्य न्च्याबुबा तुताबे नी न्धगदुम्रु कहमो क्दाए द्याउरभ लाम नितुसवशा च्यत्रिर मरमिति तिहो लीलधा जी वेसआ न्दुबिवद नौहो लितभे जम त्यामलत्या वेसश्पापु नतुलाफुनापा नतुरर्झनि चीश्तिश्रु ही नेन्दस्प न्गतुउ ताला रावानरा तीदे जम ही नेन्त्रमआ च्गलूह ते गध निम्बचु तीजा चेलाफु वेतता थओऔ ल्याओअ चेल्याकपा न्दधु नअउहो वेराथरथ लेरव्हेअ ते ख्यसौ मी की चेरीकनो शपा तेहो हीसजातिक्शि झ्ह्यामा चेनाम सेदवक कौथा तेहो मयनि नीआ च्यानासशानुअ नतुतीकचौ क्तमु लोझा लेहअओस चेतुक्रु याघाब हा हाप मी लोलचा शकाआ लेझा नेन्गथे नअ

सन्मान! एका रानातल्या कवीचा..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 28/02/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक अतिशय आनंदाची बातमी..! शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते.. महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..! कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..! -- तात्या अभ्यंकर.

वळण !!

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 25/02/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?