Skip to main content

प्रश्नोत्तरे

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/05/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

संवाद

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोधपर व मनोरंजक संवाद
: - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - प्रवेश घ्यायला : - मिळाला ? : - नाही. : - का ? : - कोटा आडवा आला : - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या! : - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'. : - भटो भटो : - ओ : - कधी आला ? : - परवाच : - काय आणलं ? : - चॉकलेटं : - उभी कापू का आडवी ? : - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत. : - मजा आहे ना तिकडे ? : - मजा नाहीये, पण सजा पण नाही. : - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - 'तिकडे', मुलाकडे. : - काय केलेत तिकडे ? : - नेहेमीचेच, आराम

तुमचा पासवर्ड चेंज करा ....

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 24/04/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्‍या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ... आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ... किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी.

शेअर बाजारात फेरफटका.

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, नाना चेंगट, शरूबाबा यांच्याप्रमाणे आज जरा आम्हालाही शेअर बाजारात फेरफटका मारायचा मूड आला म्हणून हे चार शब्द! तांत्रिक विश्लेषण - कालचा बंद १५६००. वरची पातळी साधारण १८२०० च्या आसपास आणि खाली साधारण पहिली पातळी १५३०० (कालच्या बंदच्या जवळ) व दुसरी १४७०० च्या आसपास निर्देशांक फिरतो आहे असे दिसते. ही रेंज गेल्या महिन्या सव्वा महिन्यांच्या कालावधीतील आहे. म्हणजे साधारण ३२०० ची उलथापालथ!

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 24/02/2008 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत.

चर्चिलची "शापवाणी"

लेखक तळेकर यांनी मंगळवार, 29/01/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती . "स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील.