Skip to main content

प्रकटन

काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक

लेखक तमराज किल्विष यांनी शुक्रवार, 09/08/2019 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल. पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो. काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे.

डोक्याला शॉट [द्वितीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 06/08/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ) रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च.

रक्षाबंधन - भाग १

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
' रक्षाबंधन ' भाग १ भारतीय समाज केव्हा बरं अडचणीत सापडतो, असा विचार केल्यावर काय काय सुचेल? आकाशात जेवढे ग्रह तारे एवढी उत्तरे आठवली तरी एक उत्तर नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखे असणार. 'सण आले की..'हेच ते तेजस्वी उत्तर असे वाटते. वरवर पाहता हे पटणार नाही किंवा लिहिणारा गोंधळात पडलेला आहे असे वाटेल कदाचित, पण आता असे वाटतंय तर लिहून तर बघू. आपल्या देशात महिनाभर सुट्ट्या सणांमुळे असतात, त्यामुळे मुख्य पंचाईत अशी की कोणत्या सणाचा गोंधळ साजरा करायचा?

निवेदन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/08/2019 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रो गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा च अर्धवट लेखन झाले

विळखा -५

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -५ आज आमच्या आईला अति दक्षता विभागातून तिच्यासाठी खास खोलीत (स्पेशल रुम) आणण्यात आले. तिच्या शल्यक्रियेत आणि शल्यक्रियेच्या नंतर काय काय गुंतागुंती होऊ शकतील याची मला पूर्ण कल्पना होती. यामुळे काल रात्री सुद्धा मी शांतपणे झोपू शकलो नव्हतो. गेले काही दिवस चिंतेमुळे झोप सुद्धा पहाटे लवकर मोडत असे.आज पहाटे सुद्धा पाच वीस ला जाग आली आणि नंतर झोप लागली नाही ( अन्यथा मी सकाळी साडे सातला फार कष्टाने उठणारा माणूस आहे) सुदैवाने यातील कोणतीही गंभीर गुंतागुंत होता शल्यक्रिया सुरळीत झाली आणि तिची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे हे पाहून आज मी जास्त शांत पणे हे लिहू शकतो आहे.

दिव्यांची कहाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/08/2019 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

जगजीतसिंग ... Face to Face

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 01/08/2019 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
जगजीतसिंग ... Face to Face काल जगजीतचा Face to Face हा अल्बम ऐकला . हल्लीच्या स्मार्ट जमान्यात (फोन वगैरे ... ) प्ले लिस्ट वगैरे प्रकार जोरात असल्यामुळे बरेचदा एखादा अल्बम सलग असा ऐकलाच जात नाही. पूर्वी कॅसेट असताना सलग ऐकावेच लागायचे .... तर हा Face to Face अल्बम. त्याकाळी जगजीतच्या अल्बमची नावे इंग्लिश असायची. InSearch , Insight, Cry वगैरे .... हा त्यातलाच एक अल्बम. १९९४ सलाला ... २४ वर्षांपूर्वीचा ... एकूण आठ गज़ल (त्यातल्या काही खर तर नज्म) अल्बमची सुरवात होते सबीर दत्त यांच्या नज्म ने .

एक राजकीय सूड : बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष : दूरगामी वाताहत

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 01/08/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
Nationalisation Of banks 29 जुलै 1969 रोजी केलेल्या लोकसभेतल्या आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची भलामण करताना सांगितले की शेती, निर्यात आणि लघु उद्योगांना चालना देण्याच्या भव्य उद्देशाने हे पाऊल त्यांनी उचलले आहे. स्वातंत्र्यानंतर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण हा आजवर घेतलेला सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असावा किंवा कदाचित सर्वात मोठा आर्थिक आघात. प्रत्यक्षात या तीनही क्षेत्रात कितना तीर मारा ?

मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

लेखक इरामयी यांनी बुधवार, 31/07/2019 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे! आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का?

विळखा -४

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 29/07/2019 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -४ डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात येऊन सकाळी आठ वाजताच दाखल झालो.माझा एक वर्ग मित्र टाटा मध्ये विभागप्रमुख आहे त्याला फोनकरून सांगून ठेवले होते कि डॉ. पै यांच्याशी बोलून ठेव. नऊ वाजेपर्यंत तेथे १०० एक रुग्णांची गर्दी झाली. यथावकाश त्यांचे सहाय्यक तेथे आले आणि रुग्ण पाहायला सुरुवात केली. आमचा नंबर लवकर आल्यामुळे बराच लवकर लागला.