Skip to main content

प्रकटन

विळखा -३

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 27/07/2019 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -३ शनिवारी या डॉक्टरांना भेटून घरी आलो. यानंतर मी माझ्या कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांशी बरीच चर्चा केली. तेंव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे आईची शल्यक्रिया करायची आहे. ते प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. कारण केवळ मानेतच नव्हे तर हा रोग छातीत पण पसरला आहे. एकंदर हा तिसऱ्या स्टेजला आहे हे मला सुरुवातीलाच समजलेले होते.

विळखा -२

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 26/07/2019 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
विळखा -२ मी शेजारीच असलेल्या माझ्या बायकोच्या दवाखान्यात आईला घेऊन गेलो. बायकोला आईची ती मानेची गाठ दाखवली आणि पुढे तपासणी करायची आहे असे सांगितले. पाच मिनिटे बोलून आई परत घरी गेली. तेंव्हा मी बायकोला म्हणालो कि तिला आता तरी क्षयरोग असण्याची शक्यता बोलून दाखवले आहे पण मला तर हा कर्करोगच आहे याची १०० % खात्री आहे. उद्या सिटी स्कॅन मध्ये काय निघतंय ते पाहू. एवढे बोलून मी परत दवाखान्यात आलो. आपली [पुस्तके काढून पाहीली आणि मनात एक शंका होती कि हा तिसऱ्या तर्हेचा म्हणजे MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) पण असण्याची शक्यता आहे.

विळखा

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 26/07/2019 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझा दवाखाना ज्या इमारतीत आहे त्यातच वरच्या मजल्यावर आमचे आई वडील राहतात. आमच्या वसाहतीचा पुनर्विकास झाला त्यात मी दवाखान्याची जागा घेतली आहे आणि वरच्या मजल्यावरचेच घर वडिलांना मिळाले. आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला होता आणि त्याचा इलाज चालू होता आणि ते सुधारत होते. १९ जून २०१९ रोजी संध्याकाळी ८ वाजता दवाखान्यात कुणी नव्हते म्हणून मी त्यांना पाहायला गेलो. तेंव्हा आईने सांगितले कि अरे आज मी चेहऱ्याला पावडर लावायला गेले तर मला मानेला डावीकडे थोडं सुजल्यासारखं वाटतंय. आमच्या आईला मानेचा आणि कंबरेच्या स्पॉनडायलॉसिस चा त्रास ८-१० वर्षे तरी आहे.

चांगुलपणा !

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/07/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात. थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’ हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’! शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले.

पाण्याची शेती कशी कराल ? पाणी पेरलंत, तरंच उगवेल !

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 24/07/2019 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष *पाण्याचीच शेती* करण्याची वेळ आली आहे. 'पेरलंत तरंच उगवेल' हा पारंपरिक शेतीचा मंत्रच ह्या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. *"पाण्याची शेती"*, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल हे संगण्यासाठीच हे *"पागोळी वाचवा अभियान".* आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या *"पागोळी वाचवा अभियानाला"* लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी

लेखक srahul यांनी मंगळवार, 23/07/2019 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी १)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते. २) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले.

हिमा दास... भारताची 'ट्रॅक अँड अ‍ॅथलेटिक्स' सुवर्णकन्या

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 21/07/2019 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट म्हटले म्हणजे भारतीय वेडे होतात... आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे तर बेभान होऊन इतर सर्व विसरण्याची वेळ. मात्र, या वेडामुळे भारतात इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडून गेले आहे. उणेपुरे १९ वे वर्षे चालू असलेल्या (जन्म ९ जानेवारी २०००) असलेली हिमा दास ही आसाममधील एका सामान्य शेतकर्‍याची मुलगी आहे. डाळ-भात असे सर्वसामान्य जेवण, कोणतीही न्युट्रिशन किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स परवडणारी नव्हती. स्वस्तातले बूट वापरून ती भाताच्या शेतात धावण्याचा सराव करत असे.

वाई-मंत्र

लेखक मी_आहे_ना यांनी शुक्रवार, 19/07/2019 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
(चेपुवर पूर्वप्रकाशित. सातारा जिल्ह्यातल्या वाई सारख्या टुमदार गावात गेलेलं बालपण शब्दांकित करण्याचा छोटासा प्रयत्न.) मंडळी , "वाईमंत्र" ही लेखमाला माझ्या आवाक्यातील आठवणींनुसार लिहिली आहे. आमच्या बालवाडी ते ४थीच्या शाळेचा व्हॉट्सअ‍ॅप गृप निमित्त ठरला आणि आठवणींची एक मालिकाच बनत गेली. ती एकत्र करुन इथे पोस्ट करतोय. कदाचित इतरांनाही त्यांच्या लहानपणीचा प्रवास आठवेल. वाईमंत्र-१ 'वाई' - हा शब्दच जणू एखाद्या मंत्रासारखा. आणि आपण सगळे भाग्यवान की आपल्याला कोणाला तो वेगळा शिकायची गरजच नाही, तो आपल्याला जन्मत:च येतो :) तर अश्या ह्या वाई मधलं १९८० चं दशक.

युगांतर- आरंभ अंताचा!

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 19/07/2019 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?