Skip to main content

प्रकटन

श्रध्दा

लेखक भावना यांनी बुधवार, 30/04/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, माणसामधले माणुसपण जाते जगण्यामधले जीवन जाते माणसाविना माणसाचे खरचं का कुठे काही अडते ? श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, मनाची कवाडे भकास होतात श्रध्देच मन निराश होते प्रेमाला माणुस पारखा होतो पण कुणाला असा किती फरक पडतो ? श्रध्दा कुणावरही असु शकते, देवावर मानवावर अथवा भावनांवर पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, देव , माणुस भावना सगळेच

अंतर

लेखक जयवी यांनी बुधवार, 30/04/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक हळवे…. कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.

शनी - समज गैरसमज

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 29/04/2008 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनीग्रहाबद्दलच्या या लेखमालेत या लेखात सप्तमातल्या शनीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. पंचमातील शनी आणि संततीसौख्य याबद्दल पूर्वी एका लेखात सविस्तर लिहिलेले आहे. जिज्ञासूंना तो लेख आमच्या ब्लॉगावरील Blog Archieves मध्ये सापडेल. शनी संततीसौख्यावर काय परिणाम करतो हे तेथे समजेल. या लेखात मानवी जीवनातील अत्यंत महत्वाच्या म्हणजे विवाहसौख्याच्या बाबतीत शनी काय फले देतो हा विषय आहे. सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे.

संवाद

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोधपर व मनोरंजक संवाद
: - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - प्रवेश घ्यायला : - मिळाला ? : - नाही. : - का ? : - कोटा आडवा आला : - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या! : - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'. : - भटो भटो : - ओ : - कधी आला ? : - परवाच : - काय आणलं ? : - चॉकलेटं : - उभी कापू का आडवी ? : - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत. : - मजा आहे ना तिकडे ? : - मजा नाहीये, पण सजा पण नाही. : - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - 'तिकडे', मुलाकडे. : - काय केलेत तिकडे ? : - नेहेमीचेच, आराम

जीए

लेखक हेरंब यांनी शनिवार, 26/04/2008 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.
Taxonomy upgrade extras

संवयी

लेखक हेरंब यांनी शुक्रवार, 25/04/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल. सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर.

वर्तुळाचा कोन

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 25/04/2008 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन एक कोडं, न सुटलेलं एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं आयुष्य सरतं याच धडपडीत असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत वाट तीच...
Taxonomy upgrade extras

एका उपक्रमाची ओळख

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 24/04/2008 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीच्या हितसंवर्धनासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पातळींवर काम करतांना दिसत आहेत. कुणी संस्था काढतं, तर कुणी व्यक्तीगत पातळीवर काम करतं. आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना सोबतच हे मराठीचं काम करणारे हे लोक. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता मौन साधकासारखे यांचे काम आहे. अश्या लोकांपैकी काही लोकांना एक त्यांच्या कामाची दखल घेतल्याची जाणीव करून देण्यासाठी मराठीसाठी काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री द्वारकानाथ कलंत्री यांनी अश्या लोकांना मानपत्र देण्याचे ठरवले. मानपत्र सोबतच इतरही अश्याच वेगवेगळ्या उपक्रमी लोकांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणे करून अश्या लोकांची माहिती समाजाला व्हावी.

भाषा आणि प्रमाण

लेखक नीलकांत यांनी रविवार, 20/04/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

स्वप्नातलं गाव ... !

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 16/04/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! लाकडी घर, टेकडीवर गाव उतरतं छत .. काचेचा ताव गुलाबी थंडी धवल वर्षाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! न्हाली दव, ऊबदार सकाळ नेसूनि रंग ये….संध्याकाळ चंदेरी उधळण चांदण्या वाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! जगती कोण, चुकला धाव? मनी आपलं.. एक जपावं गाव स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
Taxonomy upgrade extras