श्रध्दा
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
माणसामधले माणुसपण जाते
जगण्यामधले जीवन जाते
माणसाविना माणसाचे
खरचं का कुठे काही अडते ?
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
मनाची कवाडे भकास होतात
श्रध्देच मन निराश होते
प्रेमाला माणुस पारखा होतो
पण कुणाला असा किती फरक पडतो ?
श्रध्दा कुणावरही असु शकते,
देवावर मानवावर अथवा भावनांवर
पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
देव , माणुस भावना
सगळेच निषिध्द होते .
मला कुणी सांगेल का
श्रध्देच्याच वाट्याला हे का येते ?
वाचने
3050
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
मस्त
श्रध्दा
छान
आवडली