Skip to main content

प्रकटन

<तो>

Published on मंगळवार, 03/03/2009
टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............ (आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो. आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते. मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो' सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.

सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया |

Published on मंगळवार, 03/03/2009
सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया | अंतरीचा ठेवा | पाहसी ना || जगी या मांडल्या | सुखाचिया पेठा | सुख घेता ओठा | नष्ट शून्य || दया करोनिया | संते दिले गुज | रामनाम बीज | उच्चारी तू || नामे उद्धरिल्या | पापियांच्या व्यथा | तुझी काय कथा | सांगसी तू || सागर लहरी | अनंत उठती | शमवुनी चित्ती| शांत व्हावे || - सागरलहरी
Taxonomy upgrade extras

मंदी

Published on सोमवार, 02/03/2009
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय? हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा.

यालाकमो हिदा श्यादि

लेखक दशानन
Published on सोमवार, 02/03/2009
लेतेसनि रसु नतुलिन्जओ ते लम तव्निकु हेआ सवशा त्तोघे लेकमो की मी त्ताअ तरुविनि हेआ कुए द्या जम रिसबा त्य्य न्च्याबुबा तुताबे नी न्धगदुम्रु कहमो क्दाए द्याउरभ लाम नितुसवशा च्यत्रिर मरमिति तिहो लीलधा जी वेसआ न्दुबिवद नौहो लितभे जम त्यामलत्या वेसश्पापु नतुलाफुनापा नतुरर्झनि चीश्तिश्रु ही नेन्दस्प न्गतुउ ताला रावानरा तीदे जम ही नेन्त्रमआ च्गलूह ते गध निम्बचु तीजा चेलाफु वेतता थओऔ ल्याओअ चेल्याकपा न्दधु नअउहो वेराथरथ लेरव्हेअ ते ख्यसौ मी की चेरीकनो शपा तेहो हीसजातिक्शि झ्ह्यामा चेनाम सेदवक कौथा तेहो मयनि नीआ च्यानासशानुअ नतुतीकचौ क्तमु लोझा लेहअओस चेतुक्रु याघाब हा हाप मी लोलचा शकाआ लेझा नेन्गथे नअ

हुरहुर

Published on रवीवार, 01/03/2009
मी २००४ साली ह्रुदयविकार शस्त्रक्रियेसाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी सुचलेले काव्य..... जसलोक---१३०४ मनामध्ये कुठेतरी भिती ही भासते क्षणात आहे क्षणात नाही हुरहुर हि दाटते अंगारे,धुपारे,संत ,साधू ,बापूही यांची साथ संगत आज खरी ना वाटते जगू किंवा मरु हेच एक सत्य आहे याविणा सारे जग आज मला मिथ्य आहे सर्व नाती ,सर्व गोती ,आज भोवती नाचती सुख दु:खाचा एकेक धागा जिवन माझे विणती या क्षणी मनात माझ्या निशब्द भाव तरंगती ओहोटी..... भरती मधील अंतराय जाणती.......... प्रमोद अष्टपुत्रे ०४/०५/२००४
Taxonomy upgrade extras

अस्तित्व

लेखक दशानन
Published on रवीवार, 01/03/2009
आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी.

आनंदाची बातमी..! :)

Published on रवीवार, 01/03/2009
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

निमित्त ८ मार्च ...

लेखक मनीषा
Published on शनीवार, 28/02/2009
( मार्च महिन्यातील ८ तारखेला विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे . ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो. अर्थात ३र्‍या जगातील देशातील महिलांना त्याची माहिती आणि महती किती असेल हा एक प्रश्नच आहे . पण आता वर्षातील ३६५ दिवसां मधील एक दिवस महिलांना देण्यात आला आहे . भारताचाच नाही तर जगातील प्रगत अशा युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेचा इतिहास पाहिला तर सगळीकडे महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खूप मोठा लढा द्यायला लागलेला दिसतो ... अर्थात त्याला काही अपवाद आहेत . पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापुरतेच..

लग्नाच्या "बाजार'गप्पा!

Published on शनीवार, 28/02/2009
लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः! (किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!) --- "हॅलो' ""हां. बोला.'' ""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.'' ""बरं.'' ""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.'' ""बरं.