Skip to main content

प्रकटन

शक्ती दे! युक्ती दे! (बुद्धीही दे!!)

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 30/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली.

जर - तर

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 30/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापुर्वी दुसर्‍या नोकरीतल्या हापिसात बसुन संगणकाशी जुंपलेलो असताना योगेश नि आवाज दिला, "अरे तुझा फोन आहे" मोबाइल असताना मला हापिसात कोन फोन करेल विचार करत मि फोन उचलला.. "हेलो" "मिल्या, शिवा बोलतोय" "*** तु मोबाइलवर फोन का नाही केलास?" "अरे सहज, बघत होतो कि तु नक्की ऑफिसमधेच असतोस कि इकडे तिकडे टवाळक्या करतोस" "झाली का खात्रि? बोल आता" "चल येतोस का घरी, मि निघत आहे आता" "अरे नाही यार, आज थोडा उशीरच होइल, तु हो पुढे" "चल ठीक आहे.. सॉरी यार" "कशाबद्द्ल?" "काही नाही.. सॉरी " "ये येड**, नीट बोलशील का?" " काही नाही रे, सोड.. बर तुला एक मेल केली आहे..

एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 29/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला. लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअ‍ॅलिटी शो"... मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे..... खूप मजेदार आहे. लेखातले काही मुद्दे असे, १.स्टेज शो करणार्‍या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा....

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

मिपाचे वैभव...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

आनंदी आनंद गडे

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 27/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले. हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही. कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही. कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते. खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती. कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते. तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला. तेवढाच विचार करायला वेळ. तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता..

तांदूळगड - तांदूळवाडी

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 27/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टच्या एका विकांताला आमच्या क्लब पटनीने एक ट्रेक करायचा ठरवला. तो होता तांदूळवाडीचा, पलघर जवळ. तशी ह्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल मध्यम आहे, त्यामुळे तसा काही हा जिवघेणा ट्रेक नव्हता. पण ह्या ट्रेक मधे दोन पॅच असे आहेत जे पुर्ण दगडी आहेत. नेहमी ट्रेक करणारा ते नीट पार करु शकतो पण कधितरी करणार्‍याला दोरखंडाचे सहाय्य लागेल. काही भाग हा फक्त पायवाटेचा आहे.डाव्या हाताला डोंगर उजव्या हाताला दरी. मधे दोन पाय ठेवता येईल इतकी जागा. डव्या बाजूला आधार धरायला झाडं पण नाहीत फक्त माजलेले गवत.आणी अशाच एका ठिकाणी आमच्या आधीच्या विकांती क्लबचा एक सदस्य उतरताना पाय घसरून पडला होता.

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक प्रभो यांनी रविवार, 25/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी. ही रांगोळी आईने काढली.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 24/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?