Skip to main content

प्रकटन

वासांसि जीर्णानि यथा विहाय

लेखक अवलिया यांनी सोमवार, 21/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि | तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२ ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो. सांख्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानानुसार त्या तत्वज्ञानाचे स्वरुप विशद करुन सांगतांना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे संवादातुन सांगितले त्यातले एक महत्वाचे वाक्य असे या श्लोकाला म्हणता येईल. जुन्या वस्त्रांच्या त्यागानंतर नवीन वस्त्रं धारण करणे हा दाखला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण नेहमी पहात असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही.

(आता करितो भरपाई...)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 19/03/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल... सोडले जुने रागलोभ...राहिलो मिपानगरीचे ठायी... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... हा तो विसोबाचा गाव.... अवघे चंट, थोडके राव... पिचकारीच्या रंगामध्ये.. अवघा आसमंत न्हाही... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... स्वसंपादनाचा घोळ... हा तर बालिश पोरखेळ... उठली बंदी जर काही.....ती तो नीलकांताची पुण्याई... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... ते बंधन सुटता वेगे... पहा झाली नवीन पहाट.... विसरूनी शून्य चर्‍हाट...

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

नेहमीचीच संध्याकाळ

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 18/03/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५.३० वाजतात. सगळेच पीसी बंद करुन उठतात. वर्गात काही लोक सोडून कुणालाच बसायची इच्छा नसते; तरीपण लॅब मध्ये काहीतरी काम करतोय असे मॅडमना दाखवावे लागते. त्याला पर्याय नाही. प्रत्येक शुक्रवारचा हाच दिनक्रम! मॅडमचा शाब्दिक मार, धमक्या सहन होत नाहीयेत, खर्‍या करुन दाखवल्या तर धडगत नाही. त्यातच मंगळवारच्या सेमिनारचे टेंशन. एक ना दोन, हजार लचांडे मागे लावून प्रोफेसर लोक मात्र निवांत चहा आणि सिगरेट प्यायला शहीद भवनात किंवा टिक्कावर! सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.

"पुष्पक "

लेखक VINODBANKHELE यांनी सोमवार, 14/03/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

फुकट ते पौष्टिक?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/03/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...' लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा. "क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं.