Skip to main content

प्रकटन

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 30/03/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.

अंतर ठेवा...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 29/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

भारत विरुद्ध पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव

लेखक नि३ यांनी सोमवार, 28/03/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय... हे आस्ट्रेलीया आणि ईंग्लंड वाले ऊगाचच ashes ला most celebrated rivalry in international cricket म्हणतात ..अरे त्यांना म्हणाव तुमच्या दोन देशांमधे एक तरी युद्ध झाले आहे का??

....आणि तरीही मी!

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 23/03/2011 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
....आणि तरीही मी! खरे तर सौमित्र यांच्या कवितांचे आकर्षण फार पुर्वी पासुनच आहे. म्हणजे जेव्हापासुन गारवा ऐकले होते तेव्हापासुन त्यांचा पंखा (गारव्यामुळे पंखा झालो ;) ) झालोच होतो. गारवा प्रकाशित झाला तेव्हा नुकतेच मिसरुडे फुटुन महाविद्यालयात दाखल झालो होतो, आणि त्यात असा सुंदर प्रेमकाव्य असलेला अल्बम म्हणजे काही विचारालाच नको. ;) असो. सौमित्र यांचा '....आणि तरीही मी!' कविता संग्रह काही दिवसांपुर्वी वाचनात आला. आत्तापर्यंत त्याची बरीच पारायणे झाली. यातील प्रत्येक रचना ही खुप तरल आणि स्वाभाविक वाटते. या सर्व कवितांनी मनात घर केले.

हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/03/2011 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह.

बातमी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 22/03/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.