Skip to main content

प्रकटन

मराठी चित्रपट

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 03/03/2011 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळी मराठी मानसाने (मान्सांनी) केली. तरी आज मराठी चित्रपट किंवा वाहिन्या पाहतांना हसावे का रडावे तेच कळत नाही. काही काही चित्रपट पाहतांना वाट्ते की मराठी चित्रपट हॉलिवुड पेक्शा सरस आहे (कथेत बर्का तंत्रज्ञानात नाही) उदा श्वास , चेकमेट . परंतु कधी कधी वाट्ते का चित्रपट तयार करतात हे लोक? ना बजेट ना कथा ! उदाहरण द्यायच तर नाथा पुरे आता , जाउ तिथं खाउ . मराठी चित्रपट वाहिन्याही सारखे सारखे तेच चित्रपट टाकुन बोर करतात. यांच्या जवळ सिड्या नसतात का? मराठीत एकही सुपरस्टार का नसावा ? सर्व मराठी कलाकारात तोचतोचपणा का?

अल्बम

लेखक टारझन यांनी बुधवार, 02/03/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
णमर्स्कार्स फोक्स , "अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो-विडियो अल्बम येत असतील तर .. तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? ) प्रत्येकाला बर्‍याचदा असं वाटत असावं , हा काळ जर इथेच थांबवता आला तर ? ही वेळ सरु च नये ! अर्थात ह्या आपल्या सुखी काळातल्या इच्छा असतात.

बिलोरी आरसा

लेखक sneharani यांनी मंगळवार, 01/03/2011 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी वेळ असाच बसून राहिलोय..! काय करावं? झोपावं म्हंटल तर झोप येत नाही अन् नुसत रिकामं बसूनही वेळ जात नाही. जावं का नदीच्या घाटावर फिरत फिरत...पण सांजकाळी कोणी फिरकत नाही तिकडं! कातरवेळ! तशातही तो एकटाच...सोबतीला स्वत:च मन! बस! आणखीन कशाची गरज होती भुतकाळ जगायला? सुर्याची किरणं कमी कमी होत होती.पाखर परतत होती त्यांच्या घरट्यांकड..! घरट्याकडं परतायची एवढी गडबड? माझ घर...! घर म्हणाव का त्याला? "म्हण ना घर!का ते घर नाही...घरात कोणी नाही म्हणून?

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 01/03/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची. भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.) या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.

विदारक अनुभव

लेखक अप्पा जोगळेकर यांनी सोमवार, 28/02/2011 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारची गोष्ट. चार-साडेचार वाजले असतील. तेंडुलकर मस्तपैकी धुलाई करत होता. मॅच अगदी रंगात आली होती. बॅकग्राउंडला आमच्या तीर्थरूपांची कॉमेंट्रीसुद्धा चालू होती. मी चहा टाकायच्या विचारात होतो. म्हणजे भांड्यात पाणी घेतलं आणि बाहेरुन सिक्सर असा आवाज आला की धाव बाहेरच्या खोलीत. पाण्यात साखर घातली आणि 'अरेरे! जस्ट मिस झाला' असं ऐकलं की पळ बाहेर असा प्रकार चालू होता.तेवढ्यात बेल वाजली. मी जाउन दार उघडलं तर बाहेर एक उंच काळसर वर्णाचा तरुण मुलगा उभा होता. त्याला पाहिलंय असं वाटत होतं पण चटकन नाव आठवेना. 'अ....अ.... अ....अनुराधा आहे का ?' बोलताना त्याची जीभ अडखळत होती.

रविवारी भल्या सकाळी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/02/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : सकाळी ७:०० वाजता स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप वार : रविवार काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्‍या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्‍यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!

गीर - सिंहांच्या देशात

लेखक Manish Mohile यांनी शनिवार, 26/02/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात पर्यटन विभागाची रेडीयो मिर्ची वरील अमिताभ बच्चन च्या धीर गंभीर आवाजातील गीर ची जाहीरात ऐकून माझ्या पुण्याच्या मेव्हण्याने कल्पना पुढे मांडली - गीरला जाण्याची. ताबडतोब फोनाफोनी झाली आणि संक्रांतीला जोडून आलेल्या रविवार आणि सोमवारी जाण्याचे नक्की झाले. नेटवर हॉटेल बुकिंग झालं, लायन सफारी बुकिंग झालं. गीर पासून जवळ ४० कि,मी. वर आहे सोमनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ६० कि. मी वर आहे दीऊ. आम्ही दीऊला आधी जाऊन आलो होतो म्हणून या वेळी फक्त गीरला जायचं ठरलं.

मुंब्रा देवी आणि परिसर

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 26/02/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंब्रा देवी मंदिर पायर्‍या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला.

वि दा सावरकर

लेखक अवलिया यांनी शनिवार, 26/02/2011 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेकांचे योगदान लाभले त्यातील एक अग्रणी नाव. या नावाचा उल्लेख केल्याखेरीज भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची कथा पूर्ण सांगितली जाणार नाही. राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी जवळपास सर्वच क्षेत्रात सावरकरांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला आहे यात शंका नाही. दूरदृष्टी असलेला द्रष्टा नेता हे बिरुद ज्या थोड्या लोकांना शोभुन दिसते अशांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.