Skip to main content

प्रकटन

महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 03/06/2014 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे ! राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का....

नि व ड नु क

लेखक जयनीत यांनी शनिवार, 31/05/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाले नवीन शाळा बांधून देनार हायेत दोन मजल्याची! अन धाव्वी नंतरच्या पोरांसाठी कॉलेज पन उघडनार अजून काय काय होणार हाय सांगू? दवाखाना, धरन! नाल्या गटारं आता सार्खी उघडी वागडी नाय -हानार सा-या रस्ते सडका पक्क्या होनार हायत एकदम चकाचक!! सा-याईले पक्के मकान अन प्रत्येकाले काम काय पन भारी अस्ते नाय का? निवडनुक!!!

अजित डोवाल : बस नाम हि काफी है

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 31/05/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted." President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961 गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो.

सेकंड होम...

लेखक saumitrasalunke यांनी गुरुवार, 29/05/2014 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे... मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

बर मग?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 29/05/2014 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
"अभिनंदन.." धन्यवाद "पार्टी पाहीजे" कसली? "कसली म्हणजे काय. ५८ चे ८५ ची पार्टी मिळालीच पाहीजे" अरे ़ज्याला मिळाले तो म्हणतो "सो व्हॉट" तर मी उगाच कशाला नाचु गावभर. "़कमाल आहे. बोर्डावर अधोरेखीत नोंद आहे शाळेत. मॅड्मनी ़़खास उल्लेख केला. तुला बोलला नाही" नाय बॉ. "़कमाल आहे.पुढे काय? सायन्स?" बघु. अजुन काय ठरले नाही. "तू काय ठरवलयस"? ठरवणारा मी कोण? "९० हुकल्याचे फ्रस्ट्रेशन वाट्तेय मला" अरे हट बे. ९५ आले असते तरी धिरुभाई बोलवणार होता का असे मी नाही तो म्हणतोय. "ंमग प्रश्नच खुंटला. माझ्याने घराण्याचे नाव ़काढले. ९२.३५. दोन मार्काने शाळेतला पहीला नंबर चुकला.

गरजांच पोलिटिक्स

लेखक फुंटी यांनी सोमवार, 26/05/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुणी लेखक नाही,मला लेखक व्हायचं पण नाही...मनातली घुसमट बाहेर पडावी म्हणून लिहितोय....डुप्लिकेट आयडी वरून ...घुसमट....मला सहन नाही होत ....इमोशनल चुतीया बनणं काय असत ते मला विचारा ...प्रेम असो कि कुणाला केलेली मदत .....त्या एका क्षणी वाटत असत कि आपण नसतो तर हे शक्य झाल नसत...हे आपल्यामुळे झालंय ,काडीचाही फायदा नसताना उगाचच छाती फुगून येते अभिमानाने.....कसला वांझोटा अभिमान तो.... तरीही घालवलीत ७-८ वर्ष या दुनियादारी मध्ये...कुणाला काही फरक पडत नसतो आपल्या असण्या नसण्याने ...आपण नसलो कि दुसरा कुणी असतो...हे ज्या क्षणी लक्षात येत तो क्षण असतो कोसळण्याचा ,कोलमडून पडण्याचा ...अनुभवतोय मी तेच क्ष

एक विलक्षण अनुभव

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 25/05/2014 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस.

मला काही काळ शांती भेटली होती ……!

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 24/05/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक मला शांती भेटली …. रोहिणी हॉटेलच्या समोरून ती शांत पणे एकटीच चालली होती . तिला पाहून मी एकदम चमकलो ! शांती, आमची शाळेतील मैत्रिण ! नावाप्रमाणे शांत , शाळेत असताना सरळ मार्गी जाणारी, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात , आपण बरे आणि आपला अभ्यास बरा. पण आज दिसलेली शांती एकदम वेगळीच वाटत होती शांते ए शांते , मी बिन्धास भर रस्त्यात तिला हाक मारली तिने मला पाहिले , अरे अमोल कसा आहेस ?

आय टी आणि आम्ही

लेखक nasatiuthathev यांनी शुक्रवार, 23/05/2014 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी आणि आम्ही शेवटचे वर्ष संपत असत ... Placement नामक पर्व सुरु होत असत .... ह्या पर्वात सगळ्या जणांना उडी घ्यायची असते किंबहुना तशी धडपड तरी ते करीत असतात .... कंपनी'ज येतात .... आपल्यातले (आमच्यातले ???) काही जण select होतात .... आम्ही मात्र अजूनही त्या कॉलेजच्या बेफिकीरीतच असतो ... अरे होईल रे .... कंपनी कुठे पळून चालल्या आहेत का ...... अरे आपल्याला ती कंपनी च नको होती यार ... असे संवाद कट्ट्यावर ऐकायला/ऐकवायला सुरुवात होते .... select झालेल्या मुलांचा आता एक वेगळा ग्रुप तयार झालेला असतो ....

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 23/05/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.