Skip to main content

प्रकटन

नाते गंधाशी.

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 04/08/2014 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
गंध ........... आपल्या जीवनात गंध हा अविभाज्य घटक आहे.(फक्त ज्यांना वासच येत नाही त्यांचे माहित नाही.)पण सर्वसाधारणपणे गंधाशी आपले जीवन निगडीत असते. सुगंधाशी जवळीक आणि दुर्गंधापासून पलायन ही सर्वसामान्यपणे गंधाविषयीची प्रतिक्षिप्त क्रिया. लहानपणापासून ते आत्तापर्यंत निरनिराळ्या गंधांशी काही आठवणी जोडलेल्या आहेत.काही सुखदायक काही वेदनादायक. लहानपणी सुट्टीमध्ये गावी जायचो (संसरी, नाशिक) त्याकाळी घरात चुली असायच्या.त्यात जळण म्हणून गोवऱ्या जाळल्या जायच्या.तो धूर घरातील सर्व वस्तूंना प्रेमाने आपल्या कवेत घ्यायचा.

मैत्रीचा धागा

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 02/08/2014 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट महिना आला कि नव्या पिढीची धामधूम चालू होते ती फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची. रंगीबेरंगी पट्ट्या हातभार बांधून दिवसभर दिमाखात फिरणार. आता तर काय तोंडावर सुद्धा काहीबाही लिहिलेलं असतं. आमच्या वेळी नव्हतं बुवा असलं काही.(इति आमची पिढी) पण तरीही माझी शाळेत असताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे इ. ५ वी असताना मला खूप मैत्रिणी मिळाल्या. त्यातील एक मैत्रीण माझी जिवाभावाची कधी झाली कळलेच नाही. एकाच बेंच वर बसून वर्ग चालू असताना खुसूखुसू गप्पा मारणे,हळूच डबा उघडून खाणे अशा आमच्या गमती जमती चालत. एकमेकी शिवाय करमत नसे.

सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे?

लेखक arunjoshi123 यांनी गुरुवार, 31/07/2014 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार हे श्रीमंतांवर अन्याय करून गरीबांना फायदे पोहोचवत आहे असा एक आर्थिक युक्तिवाद आहे. म्हणजे करसवलती, दरसवलती, कल्याणकारी योजना, इत्यादीमधून वैगेरे. या मतावर मुद्देसूद अशी चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. ----------------------- १. सर्वसाधारणपणे या चर्चेकरिता गरीब म्हणजे कोण नि श्रीमंत म्हणजे कोण हे सांगावे लागेल. साधारणतः ज्यांना सरकारी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सवलतींचा, कल्याणकारी योजनांचा थेट फायदा मिळतो ते गरीब अशी व्याख्या पुरेशी ठरावी.

अक्कलदाढ - एक काढणे

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 31/07/2014 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात वर असलेली तळटीपः यातली अक्कलदाढ काढणे, सुरवातीला शिकाऊ आणि पकाऊ आणि मग योग्य डॉक्टरांकडे जाणे इत्यादी भाग वगळता लेख फुगवायला अनेक काल्पनिक गोष्टी घातल्या आहेत हे आधीच अतीचाणाक्ष वाचकांनी ध्यानात घ्यावे ही विनंती. तसेच महिला वर्ग, शेतकरी किंवा कामगार वर्ग, प्राणीपक्षीप्रेमी संघटना इत्यादींचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही हे ही लक्षात घ्यावे. डिड आय लीव्ह आउट एनिबडी? हा विनोदी लेख आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर आता वाचा... अक्कलदाढ - एक काढणे तर, झालं असं की वुडहाऊसचं 'लाफिंग गॅस' वाचणे सुरु आहे.

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 11/07/2014 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश! नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो! संदीप म्हणतो : बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो, कशी शांतता शून्य, शब्दात येते. आताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते । ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, बोलणं मुश्कील झालं असतांना, ते शब्दात उतरवणं, ही उस्ताद बहादुरशा ज़फ़रची कमाल.

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

लेखक पुस्तकमित्र यांनी शुक्रवार, 04/07/2014 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

नारकोंडम बेट-- पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 04/07/2014 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
नारकोंडम बेट-- पुढे आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू.

कहां गये वो लोग?--नाथा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 03/07/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई आमचं ६-७ खोल्यांचं जुनं तिपाखी कौलारु घर होतं.दाराला कड्या घालुन बसण्याची पद्धत अजुन सुरु झाली नव्हती.सगळ्यांची दारं सताड उघडी असायची आणि आम्ही पोरेटोरे दुपारी कुणाही एकाच्या घरी किंवा संध्याकाळी कुणाच्याही वाड्यात खेळत पडीक असायचो.आमचे घर मोठे असल्याने त्यातल्यात्यात आमच्याकडेच दुपारचा अड्डा असे.एकदा असेच एका कुठल्यातरी खोलीत पत्ते वगैरे खेळत असताना घरात चोरी झाली आणि चोराने

पढत मुर्ख व मुर्खाची लक्षणे

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 01/07/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे. तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे? तर तो म्हणतो, “मला माहित नाही. गाढवाला विचारा.” बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.