Skip to main content

भाषांतर

युद्ध....... खलिल जिब्रान

Published on 30/03/2015 - 22:46 प्रकाशित मुखपृष्ठ
राजवाड्यात जंगी मेजवानी चालू होती, तेव्हा एक माणूस तिथे घाईघाईने आला आणि त्याने राजपुत्राला लवून मुजरा केला. सगळे पाहुणे त्याच्याकडे टकामका पाहू लागले कारण त्याचा एक डोळा निखळला होता, रिकाम्या खोबणीतून रक्त ठिबकत होते. राजपुत्राने त्याला विचारले, ‘ही आपत्ती तुझ्यावर कशी काय कोसळली?’ त्यावर तो सांगू लागला, ‘ हे राजपुत्रा, मी व्यवसायाने चोर आहे. आज अमावस्या! आकाशात चंद्र नव्हता म्हणून मी चोरी करण्यासाठी एका दलालाच्या घरात घुसायचे ठरवले. पण अंधारात चूक झाली. दलालाच्या घराऐवजी मी विणकराच्या घरात शिरलो. अंधारात उडी मारताना तिथल्या हातमागाला माझा धक्का लागला आणि माझा डोळा निखळून पडला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6362

सुंदरी आणि जत्रा ...... खलील जिब्रान

Published on 25/03/2015 - 21:06 प्रकाशित मुखपृष्ठ
एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली. खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती. सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती. उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते. सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5619

माणूस ..... खलील जिब्रान

Published on 22/03/2015 - 22:13 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो. तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते. परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते. तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा. त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले, ‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’ त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे! एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय . पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5788

युद्ध आणि छोटेसे देश...... [ खलील जिब्रान ]

Published on 20/03/2015 - 09:56 प्रकाशित मुखपृष्ठ
एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते. त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला. गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला. त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर! ते पाहून पहिला गरुड खवळला. त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले. त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला. कोकराच्या आईने वर पाहिले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 12832

दर्शन

Published on 18/03/2015 - 00:04 प्रकाशित मुखपृष्ठ
गवताच्या एका पात्याने पिंपळाच्या प्रचंड सावलीकडे तक्रार केली, 'तू सारखी इकडून तिकडे हलत राहतेस, माझी शांतता भंग पावते!' सावलीने उत्तर दिले, 'मी हलत नाही. जरा वर पहा, तिथे एक झाड आहे आणि ते वाऱ्याने चहूबाजूंनी हलते!' गवताच्या पात्याने आपले इवलेसे डोळे वर करून पहिले........ ........ आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला आपल्यावरील वृक्षाच्या विराट रूपाचे दर्शन घडले! ते पाते मनातल्या मनात म्हणाले, ' माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे!' ..... तेव्हापासून ते पाते शांतचित्त झाले. खलील जिब्रानच्या 'The Shadow'या लघुकथेचा भावानुवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3452

थ्री क्वशन्स- लिओ टॉलस्टॉय

Published on 26/02/2015 - 11:11 प्रकाशित मुखपृष्ठ
उद्याच्या जागतिक मराठी दिनानिमित्त लिओ टॉलस्टॉय यांच्या 'थ्री क्वशन्स' कथेचा स्वैर अनुवाद... एकेकाळी एका राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही एक एक घटना आहे. कोणताही अचूक निर्णय घेण्याची निश्चित वेळ कोणती? कोणाचे म्हणणे गांभिर्यपूर्वक ऐकावे आणि कोणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2922

दगडाचे सुप : एक भावांतरीत रशियन लोककथा

Published on 13/02/2015 - 17:40 प्रकाशित मुखपृष्ठ
उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट. नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 10689

अंधार क्षण भाग ५ - सुरेन मिर्झोयान (लेख २६)

Published on 19/01/2015 - 00:20 प्रकाशित मुखपृष्ठ
अंधार क्षण - सुरेन मिर्झोयान ज्यांना दुस-या महायुद्धामध्ये अजिबात रस नाही त्यांनीसुद्धा स्टॅलिनग्राडच्या लढाईबद्दल ऐकलेलं असतं. या लढाईपासून जर्मनीच्या पराभवाची सुरूवात झाली. त्यानंतर कर्स्कच्या लढाईने जर्मनी युद्ध जिंकू शकत नाही हे सिद्ध झालं, त्यामुळे त्याचा फायदा उचलण्यासाठी रशियन सैन्याने ' आॅपरेशन बाग्रेत्सिओन ' ही प्रतिचढाई सुरु केली आणि शेवटी बर्लिनमध्ये जर्मनीने शरणागती पत्करली. हा सगळा घटनाक्रम सुरु करणा-या या लढाईला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकी संहारक, दाहक आणि हातघाईची लढाई याआधी आणि यानंतरही क्वचितच लढली गेली असेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 15638

अंधार क्षण भाग ५ - व्लादिमीर ओग्रिझ्को (लेख २५)

Published on 12/01/2015 - 00:50 प्रकाशित मुखपृष्ठ
अंधार क्षण - व्लादिमीर ओग्रिझ्को जर मला आज कोणी विचारलं की १९३९ ते १९४५ हा जो दुस-या महायुद्धाचा संपूर्ण कालखंड आहे त्यातला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक असा दिवस निवड, तर मी सर्वांना माहीत असलेले दिवस - उदाहरणार्थ ३ सप्टेंबर १९३९, जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडवर जर्मनीने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं; किंवा ७ डिसेंबर १९४१, जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर आकस्मिक रीत्या बाँबहल्ला करुन युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं; किंवा २२ जून १९४१, जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर जगातला सर्वात मोठा आक्रमक हल्ला चढवला - निवडणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9081

अंधार क्षण भाग ५ - निष्ठा (लेख २४)

Published on 05/01/2015 - 09:13 प्रकाशित मुखपृष्ठ
अंधार क्षण भाग ५ - निष्ठा मध्ययुगीन युद्धांमध्ये आणि दुस-या महायुद्धामध्ये असलेला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे धर्म हा मुद्दा दुस-या महायुद्धात अजिबात महत्वाचा नव्हता. नाझींच्या ज्यू द्वेषाचं कारण धार्मिक नसून वांशिक होतं. हिटलरला तर कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती. पण धार्मिक मुद्दे जरी महत्त्वाचे नसले तरी एखाद्या विचारसरणीवर पराकोटीची निष्ठा हे दुस-या महायुद्धाचं वैशिष्ट्य होतं. एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरसारख्या कट्टर नाझींसाठी सोविएत रशियाविरूद्ध पुकारलेलं युद्ध म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद आणि राष्ट्रीय समाजवाद या दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6466