मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बातमी

महिलांचा T-20 वर्ल्ड कप २०१८

मुक्त विहारि ·
नमस्कार, खरे तर हा धागा श्रीगुरुजी काढतील असे वाटले होते, पण ...असो... आत्ता पर्यंत तरी ४ मॅचेस झाल्या आहेत. भारताच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे, हरमनप्रीत कौरने काढलेले शतक...फक्त ५१ बॉलमध्ये १०३ धावा.. आस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने आपापल्या मॅचेस जिंकल्या आहेत तर, इंग्लंड आणि श्रीलंका ह्यांच्या मधली मॅच पावसामुळे वाया गेली... अजून अर्ध्या तासाने, भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच सुरु होईल. रात्री १:३० वाजता, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड ह्यांच्या मध्ये सामना होईल. हरमनप्रीत कौर आणि भारतीय टीमला शुभेच्छा.... अधिक माहितीसाठी खालील लिंक बघा... https://www.cricbuzz.com/cricket-series/2724/icc-

रफाल - भाग २

रणजित चितळे ·
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

पाच भारतियांच्या चमूने जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये विक्रमी सुवर्णक्षण नोंदवला !

डॉ सुहास म्हात्रे ·
लिस्बन (पोर्तुगाल) येथे आयोजित केलेल्या जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (International Physics Olympiad उर्फ IPhO) पवन गोयल, लाय जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता आणि निशांत अभंगी या पाच भारतियांच्या चमूतील प्रत्येकाने सुवर्णपदक जिंकले आहे !  चमूतील १००% सभासदांनी सुवर्णपदक पटकावणे हा भारताचा गेल्या २१ वर्षांतील विक्रम आहे. या पूर्वी एकदा पाच पैकी चार जणांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.

जर चंद्र तुमच्यासारखा सुंदर असता ...

मनो ·
सिंदखेडचे राजे लखुजी (अथवा लुखजी ) जाधवराव - राजमाता जिजाबाईसाहेबांचे वडील आणि शहाजी राजांचे सासरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळातली महत्वाची व्यक्ती. अश्या जाधवरावांचे एक नव्हे तर दोन चित्रे मला सापडली, त्या दोन चित्रांची ही कथा. न्यूयॉर्कच्या 'मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट' मध्ये एक 'बादशाही अल्बम' नावाचा चित्रांचा संग्रह आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात चित्रे जोडण्यात आली. औरंगझेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला.

|| छत्रपती संभाजीराजे यांचे अप्रकाशित दुर्मिळ चित्र ||

मनो ·
आज १४ मे - इंग्रजी तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (जन्म १४ मे १६५७). यानिमित्त संभाजी महाराजांशी संबंधित माझे संशोधन आज महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. बातमीत सगळे बारकावे देणे शक्य नसते, म्हणून हा एक विशेष लेख - बातमीच्या तुलनेत इथे प्रतिक्रियांतून भरपूर शिकायला मिळते, तेंव्हा आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. === छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हि १६८० ते १६८९ अशी फक्त नऊ वर्षांची होती, पण या थोडक्या कालावधीतच त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या ह्या पराक्रमी छत्रपतीची अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच चित्रे आजवर उजेडात आली आहेत.

बातमी!

दिनेश५७ ·
मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.

योग प्रसारासाठी सायकल यात्रा- परभणी- जालना- औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्यामध्ये ६०० किमी सायकलिंग

मार्गी ·
सर्वांना नमस्कार! एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा 'योग प्रसारासाठी सायकल यात्रा' अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' व त्या संस्थेच्या विस्तारलेल्या कार्यासंदर्भात हा प्रवास असेल. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग कार्यकर्ते व योग शिक्षक ह्यांना ह्या प्रवासात भेटेन. परभणीमध्ये गेल्या चार दशकांपासून निरामय संस्था काम करते आहे.

तुमच्या देशात....

शिव कन्या ·
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते.

एका अवलियाची भेट

मार्गी ·
नमस्कार. २१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.

श्रीदेवी जाते जिवानिशी

कुमार जावडेकर ·
श्रीदेवीच्या आणि आमच्या वयात तसं बर्‍यापैकी अंतर होतं. आम्ही महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत श्रीदेवीचा 'मिस्टर इंडिया' आणि (आपल्या) माधुरीचा 'तेज़ाब' येऊन गेले होते. त्यामुळे तिच्या घडलेल्या 'जुदाई'मुळे आम्हीं जरी हळहळलो असलो, तरी त्याचा फारसा 'सदमा' आम्हांला पोहोचला नाही आणि जखम भळभळली नाही. नव्वदीत श्रीदेवीला सोडून (किंवा धरून) अनिल कपूरनं (आपल्या) माधुरीला हिरॉईन केलं याचा मात्र राग आम्हीं मित्रा-मित्रांमधे चांगलाच आळवला / चघळला होता. एकीकडे श्रीदेवीचे 'लम्हें', 'खुदागवाह',लाडला' वगैरे बघणं न थांबवता...