Skip to main content

बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 25/08/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.


ब्रिटनचे भावी मंत्रिमंडळ आणि तुर्कांचा / भारतीयांचा बदला

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/07/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ बातमी Britain now has the most 'desi' Cabinet in its history ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापित होणार्‍या बोरीस जॉन्सन या ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. त्यात महत्त्वाची पदे अशी... १.

हिमा दास... भारताची 'ट्रॅक अँड अ‍ॅथलेटिक्स' सुवर्णकन्या

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 21/07/2019 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट म्हटले म्हणजे भारतीय वेडे होतात... आणि क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे तर बेभान होऊन इतर सर्व विसरण्याची वेळ. मात्र, या वेडामुळे भारतात इतर खेळांकडे आणि खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. याचे उत्तम उदाहरण नुकतेच घडून गेले आहे. उणेपुरे १९ वे वर्षे चालू असलेल्या (जन्म ९ जानेवारी २०००) असलेली हिमा दास ही आसाममधील एका सामान्य शेतकर्‍याची मुलगी आहे. डाळ-भात असे सर्वसामान्य जेवण, कोणतीही न्युट्रिशन किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स परवडणारी नव्हती. स्वस्तातले बूट वापरून ती भाताच्या शेतात धावण्याचा सराव करत असे.

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 05/04/2019 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही. मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच.

नक्की काय अपेक्षित आहे?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 11/03/2019 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडॆच मला एक-दोघांनी विचारले की सगळे फिजिकल शेअर डिमॅट करून झाले का? ३१ मार्च नंतर त्या शेअरची किंमत शून्य होईल वगैरे... अधिक शोध घेता असे समजले की ३१ मार्च नंतर फिजिकल-टु-फिजिकल होणार नाही. दुसर्‍याच्या नावावर करायचे असल्यास किंवा विकायचे असल्यास ते डिमॅट करणे आवश्यक आहे.

पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा

लेखक नानुअण्णा यांनी शुक्रवार, 22/02/2019 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे. खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत. सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत.

दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

लेखक vcdatrange यांनी मंगळवार, 08/01/2019 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

लेखक मनो यांनी रविवार, 30/12/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.