Skip to main content

आस्वाद

बाबानची फजिती....

लेखक सुदिप खेडगिकर यांनी शुक्रवार, 24/04/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः- जेवणचे टेबल, वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र..... बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ???? मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो) बाबा खूप गम्भीर चेहरा... बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे... खाणार कानाखाली सान्गणार सगळ.. इतक्यात आई येते... काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा... तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय.. बीअर घेतात चिरन्जीव आप्ले... आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो..

कोर्ट

लेखक सव्यसाची यांनी रविवार, 19/04/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. ) (मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या) काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

राधा …....२

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राधा …....१ पहाटवाऱ्यानं सोबत आणलेल्या बासरीच्या सुरांनी राधेला उठवलं . राधेची लगबग चालू झाली . राधा जणू सोळा वर्षाची अल्लड युवती बनली. कितीप्रकारे नटली तरी तिचं समाधान होईना. शेवटी एकदाचा साजशृंगार आटपला आणि ती झपाझप शिवमंदिराच्या दिशेने चालू लागली . सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता . मंदिरात पोचली तेव्हा तिथं कुणीच नव्हतं . कृष्णाची वाट पाहत ती आवारात बसून राहिली. हळूहळू लोक येऊ लागले. क्वचित कुणाच्या तोंडून त्यांच्या राजाची स्तुती ऐकू येई . आणि इकडे राधेचा उर अभिमानाने भरून जाई .

राधा …....१

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 13/04/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आता फक्त आजचीच रात्र. तिनं स्वत:लाच समजावलं. पण मन तर बाभरं झालेलं. ऐकतय थोडंच. ते द्वारकेत पोचलं सुद्धा. काय करत असेल तो या वेळी ? इतक्या वर्षांनी आपण भेटणार म्हणून डोळ्यातून आनंद उतू जात असेल का? त्याचे भावुक डोळे मनातलं सगळं बोलून जात. म्हणून गोकुळात असताना तिची कधी काही खोडी करायची असेल तर तो तिच्या मागे उभा राहत असे, डोळे लपवून. कारण त्याचे डोळे तिच्यापासून काही लपवू शकत नसत. याउलट अनयचे डोळे, तिला त्याआडचं मन कधी समजतंच नसे. अनयच्या आठवणीने तिच्या काळजात कळ आली. बिचारा! अनय म्हटलं की "बिचारा" हा शब्द तिच्या तोंडी आपसूक येत असे.

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 10/04/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

दिवस असे कि (भाग १)

लेखक मालविका यांनी बुधवार, 08/04/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आल्यावर अनेक मंगल कार्यक्रमांना जायची वेळ आली.अशा प्रसंगी सहभागी व्हायला मला देखील मनापासून आवडत.त्यातून मंगल कार्य कुणा घरच्याच जवळच्या नातेवाईकाच असेल तर मग बघायलाच नको.अगदी हक्काने जाण होत.यावेळी देखील असच अगदी जवळच मंगल कार्य होत.माझ्या बहिणीच्या मुलाची मुंज.नात्याने चुलत असली तरीही मनाने सख्खी बहिण असल्याने घरचंच कार्य होत.शिवाय सुट्टी देखील पुरेशी होती मग काय चांगला ८ दिवस मुक्काम ठोकला ताईकडे.

रामायण - कथा - सीता ???

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 07/04/2015 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही. माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.) रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत समावली. आता ही सीता आहे तरी कोण?

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 30/03/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात.

संस्कृत सुभाषिते -२

लेखक शरद यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्‍यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे ! मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !! (कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर) असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.