Skip to main content

आस्वाद

हे हृदय कसे बापाचे......!

Published on 20/06/2015 - 17:32 प्रकाशित मुखपृष्ठ
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

याद्या 8122

मी आणि परी

Published on 20/06/2015 - 11:28 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3827

सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत

Published on 17/06/2015 - 17:09 प्रकाशित मुखपृष्ठ
आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी. तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत. ..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया. मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना ! तो हो ज्जाव सुरू !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 24529

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच - इमानदार सत्यवादी

Published on 11/06/2015 - 20:38 प्रकाशित मुखपृष्ठ
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत त्यांच्या पुढ्यात बसलो होतो. अचानक स्वामीजींनी डोळे उघडले. क्षण ही न गमावता मी लगेच प्रश्न विचारला, स्वामीजी एक शंका आहे. आजकाल इंद्रप्रस्थि जे काही चालले आहे, ते बघून सत्यवादी इमानदार या शब्दांबाबत शंका उपस्थित झाली आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, इमानदार व्यक्ती हा सत्यवादी असतो, सत्यवादी हा इमानदार असतो. इमानदार सत्यवादी कधीच खोटे बोलत नाही. संभ्रमात पडलेल्या अज्ञानी मानवांना हे कळणे कठीणच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1301

नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)

Published on 10/06/2015 - 22:54 प्रकाशित मुखपृष्ठ
नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम) वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप... टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5321

ये दोस्ती ......

Published on 09/06/2015 - 22:04 प्रकाशित मुखपृष्ठ
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.

याद्या 14059

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

Published on 09/06/2015 - 16:42 प्रकाशित मुखपृष्ठ

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

प्रा अद्वयानंद गळतगे

अशा रितीने ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत नसेल तर नाडी ग्रंथात त्यांची शांती-पुजा करण्यास का सांगितले जाते? (वरील प्रश्नातील दुसरा मुद्दा ) त्या पूजेचा काय उपयोग? ( तिसरा मुद्दा) असे साहजिकच प्रश्न निर्माण होतात. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 10631

टोकियो स्टोरी...

Published on 08/06/2015 - 03:35 प्रकाशित मुखपृष्ठ
मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी. साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच...... असो, पण अमृताच्या लेखावरून तरी वाटत होते की हा चित्रपट तसा नसावा. आणि खरंच, हा चित्रपट बघितल्यावर काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4822

तपश्चर्येचे फळ ???

Published on 02/06/2015 - 22:22 प्रकाशित मुखपृष्ठ
मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते. गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3833

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

Published on 30/05/2015 - 14:37 प्रकाशित मुखपृष्ठ
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

याद्या 56296