Skip to main content

अनुभव

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 20/04/2012 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे.

<<<ठेल्याचा घोळ - एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!>>>

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 17/04/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक डेअरीचा व्यवसाय नीट सुरु असतानाही मी डेअरीच्या ठिकाणीच पान सुपारीचा ठेला स्थापित केला होता. (झक मारलीन ठेला सुरु केला असं झालंय, कारण पैसे देऊनही ठेल्याचं अधिकृत लायसन्स मिळू शकत नाहीय ) त्यात धंद्याच्या जागेत पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही व्यवसाय व्यवस्थित चालू होते. पण गेल्या काही दिवसात ठेल्यावरच्या गांज्याने गोंधळ झाला , आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी धाड पड्ल्यानं ठेला आणि डेअरी पण बंद करावी लागली. आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक माननीय (पक्षी एजन्ट, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि मनपा नि पोलिस ठेसनासमोर अनुष्टाणाला बसवला.

एका चित्रकाराच्या आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 13/04/2012 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या काही आठवणी : मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी : http://misalpav.com/node/18587 आमचे सक्सेना सर त्यांच्या तरुणपणी सहा महिने मांडूगडावर (मांडवचा किल्ला) जाउन राहिले होते, त्यांची त्याकाळची तिथली अद्भुत निसर्गचित्रे आजही मला आठवतात. ती बघून आम्ही तीन मित्रांनी मांडवला जायचे ठरवले. छप्पन मैलांचा प्रवास सायकलने सहज पार पडला. वाटेत खेडूत वा आदिवासींचे घोळके दिसले, की थांबून स्केचेस करायचो (सुमारे १९७० साली) रात्रीच्या सुमारास मांडव ला पोचल्यावर तिथल्या राम मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो....

एक भिजलेला चहा...!

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 13/04/2012 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
.......पाणी झरत चालले- आज आभाळ फाटले, पावसाला पावसाने -वर ढगांत गाठले, पाणी झरत चालले - उभ्या रानाला तहान, आता किलबिलत आहे, राना..... सौमित्र कुजबूजत होता... माझ्या जुन्या फिलिप्स च्या टेपरेकॉर्डर वर! बाहेर उन्हाची लाही- लाही होताना, "गारवा" अल्बमने नेहमीच साथ दिलेली... इतकी, की गेल्या २-३ वर्षांत कॅसेट घासून, सौमित्र दोन-दोनदा बोलतोय की काय, असा भास व्हावा!! रणजित देसाईंची 'अभोगी' कादंबरी वाचत होते, अगदी पालथी पडून, छानपैकी पाय हवेत हलवत! उन्हाचा त्रास मात्र खरेच सोसवेना, शेवटी उठून पंख्याचा रेग्यूलेटर खच्चून पिळला आणि जेव्हा लयीत डुलत त्याने '५' चा ताल धरला, तेव्हा कुठे हायसं वाटलं....

४ डि

लेखक किचेन यांनी गुरुवार, 12/04/2012 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बन्कोकमधल्या 'ड्रीम वर्ल्ड ' नावाच्या मनोरंजक पार्कमध्ये असलेल्या सिनेमागृहाबाहेर ४ डी अशी पाटी बघितली.पोस्टरवर एक तरुण हातात मोठ्ठी बंदूक घेऊन आणि शास्त्रान्यांचे कपडे घालून जेम्स बोन्डच्या स्टाइल्मध्ये उभा होता.पोस्टरवरून चित्रपट लहान मुलांचा आहे अस वाटत होत.आता हा चौथा डी कशासाठी हि उत्सुकता आम्हाला होती पण थेटरात जायची मला जाम भीती वाटत होती.कारण बन्कोक.इथे कशाच्या आवरणातमध्ये काय निघेल हे सांगता येत नाही.आदल्या दिवशी अपचन झाल्याने आम्ही भारतीय जेवण कुठे मिळतंय का हे बघायला बाहेर पडलो.रीसेप्शानिस्त्कडून एक पत्ता मिळाला होता.तिथे साधारण पुण्याच्या तुलाशिबागेसारख होत.म्हण्जे कानातले , गळ्या

(फस्स्स्स्स्स्स्कन)

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात सोडा उघडल्याचा फस्स्स्स्स्स्स्कन आवाज आला... कोणाची तरी बायको माहेरी गेली असणार... डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... आमची बायको घरी आहे म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोक्यात घुसणारा तो बूच उघडल्याचा आवाज... कोण ढोसतोय इतकी... मजा मारतोय **चा.. असशील सद्ध्या एकटा म्हणून आमची का जळवतोस... हलकट टेंपररी बॅचलर सारे... शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता... मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...

आमचं पण महाभारत

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
झक मारली नी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आणली ह्या १०५ जणांनी. चांगला खाऊन पिऊन सुखी होतो तर ते ह्यांना बघवलं नाही. खायला अन्न नाही, रपेटीला घोडे नाहीत, शेतात राबायला मजूरही नाहीत. सगळ्यांना धरून नेलं. म्हणे युद्ध आहे. महायुद्ध. वर त वर युद्धानंतर दिवसाअखेरी सैनीकांना लागेल म्हणून दारूवरही रेशनींग सुरू केलं. टिआरपी खेचण्यासाठी काय काय नाही केलं ह्यांनी? पोपटाचे डोळेच काय फोडले, झाडंच काय उपटली, एकमेकांना विष काय घातलं, हत्तींना सोंडेला धरून फेकूनच काय दिलं...