Skip to main content

अनुभव

(धप्पकन)

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 12/04/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला.. कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार.. छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज... कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(मनातल्या मनात)

नस्त्या उचापती

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

टायटॅनिक 4D

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/04/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे.

हे असले बायकांचे वागणे...

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 08/04/2012 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
बायकांचं वागणं हे फार पूर्वीपासून पडलेलं कोडय. त्यांना केव्हा कोण नि काय आवडेल हे काही सांगता येत नाही. बहुधा आपल्याकडे एखाद्या मुलीचे लग्नाचे वय झाले की तिच्यासाठी वरसंशोधन सुरू होते. शेजारीपाजारी विचारणा करतात, मग काय... सुरू झाले का संशोधन ? किती झाले कांदेपोह्याचे कार्यक्रम ? मुलीची पत्रिका देऊन ठेवा...

निजेला लॅपटॉप

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 08/04/2012 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.

मारवा !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 06/04/2012 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. मन हळवं झालं होतं.

मोबाईल कंपन्यांची नवी बाजू

लेखक मनमौजी यांनी गुरुवार, 05/04/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझा सोबत घडलेल्या ह्या प्रसंगाने मला मोबाईल कंपन्यांची नवी बाजू दाखवली. तिच बाजू तुमचा समोर मांडण्याचा हा माझा प्रयत्न. मि एक एअरटेल प्रि-पेड चा ग्राहक आहे. एअरटेल प्रि-पेड सोबत मि नेटवर्क विशयीचे चित्र-विचित्र अनुभव घेतच असतो. परन्तु, यावेळी तस नाही. काल रात्रि मि पाहिलेले शेवटची शिल्लक होती रू.५०.५४. पण आज सकाळी जेव्हा मि एका कॉल नन्तर बिल पाहिले तेव्हा मला ध्यानत आले की एअरटेलने माझा १ पैसा कमी केला होता. माझी शिल्लक रू.४५.५३ इतकी होती. १९८ ला लगेच कॉल केला. ५-७ मिनिट लागले कस्टमर केअर एक्झिक्युटीवशी बोलायला. त्या सुन्दर आवाझ असनार्‍या बाईला माझ बोलण पटेना.