Skip to main content

चर्चा

भावना दुखावणे

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 20/11/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात? माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात.

आवडती नावडती अपत्य

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 31/10/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
"शेअर्स,म्यु.फंड, निवासी जागा व घरे आवडतीचि तर बॅंकातल्या ठेवी नावडातीचि अपत्ये आहेत,काय?" शेअर्स,म्यु.फंड, निवासी जागा व घरे यावर मिळणारि य:चयावत उत्पन्ने या ना त्या स्वरुपात इन्कम टॅक्स फायदे मिळवण्यास पात्र असतात.उदा.शेअर्स,म्यु.फंड, यावरील लाभांश ,धारकाच्या हाती, करमुक्त येतो तर एक अथवा तीन वर्षाची भांडवली वाढ एकतर १०० टक्के करमुक्त असते किंवा इंडेक्ससेशन बॅनिफीट ला पात्र असते.राहत्या घरावरील उत्पन्नावर ३०टक्के सरसकट सूट असते.

मतदानात अग्रक्रम पद्धति अवलंबावी काय

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी बुधवार, 28/10/2015 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
मतदानात अग्रक्रम पद्धती अवलंबावी सध्या मतदानात first passing the post ही प्रणाली अंगिकारलि जाते. याचा अर्थ जास्त मते पडेल तो निवडून येतो.पण यामदधये अनेक वेळेला विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्था इ.त फक्त १०/१५ टक्के सारखी मते पडून उमेदवार विजयी होतो . मतदान जर ५०/६०टक्के झाले असेल तर विजयी उमेदवार जास्तीत जास्त ९ टक्के मतदारांचं प्रतिनिधीत्व करतो. सुध्रु ढ व सशक्त लोकशाहीत हे उचित नाही. यासाठी प्रेफरनशिअल मतदान पद्धती अंगिकारावी असे मला वाटते.देशाच्या राष्‍ट्र्पतींच्या निवडणुकीत हीच पद्धती अवलंबिली जाते .

स्मरण शक्ति लयाला जात चालली आहे काय

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/10/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत ३० पर्यंत पाढे असत.ई.६वी७वी,तच १२/१५चे पाढे विसरले, ते पूना:पाठ करण्याचा प्रयत्न झाला नाही, आवश्यकताहि पडली नाही. १९, २९ चे पाढे शिक्षकांनाही येत नसत . पावकी , सवायकि, औटकी हा प्रकारहि पूर्वीच्या प्राथमिक शिक्षणात होता, तेहि सोइस्कररित्या विसरलं गेलं.अर्थात त्याची फारशी गरजहि पुढच्या आयुष्यात कधी लागली नाही.

अजब पुस्तके

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 19/10/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूर स्थित "अजब " प्रकाशक ,यानी गेल्या कांहि वर्षापासून ५० रु.यात कोणतेही पुस्तक असा फंडा काढला आहे,अर्थात त्यांच्या प्रकाशना खालील कोणतेही पुस्तक.साधारणपणे निदान ही ४००/५०० टायटल असावित .गावोगावी प्रदर्शनं भरवुन ते पुस्तक विक्री करित असतात. बहुतेक पुस्तके, ही रॉयल्टी संपलेली असतात.निदान ५०/६० वर्षा पूर्वी प्रथम प्रकाशित झालेली असतात .राम गणेश गडकरी, श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकर, साने गुरूजी,नाथ माधव, ह.ना.आपटे,वि.दा.सावरकर,इ.जूने नामवंत लेखक त्यात आहेत .अलिकडील कांही लेखकहि उदा.

तिने काय करायला हवे होते?

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 13/10/2015 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच छी_ _ हा धागा वाचनात आला. सर्वांनी अगदी पोटतीडकीने प्रतिसाद दिले आणि आपापले अनुभव ऐकवले. पण कधी कधी चुकीचे घडतंय हे माहीत असूनही पुरुष बोटचेपी भुमीका घेतात हे पाहण्यात आले आहे. असाच मला आलेला एक अनुभव मी येथे देत आहे. १९९८ साली मी एका ८/९ माणसे असलेल्या कंपनीत कामाला होतो. मेडीकल प्रेझेंटेशन आणि जाहीराती मधे लागणारे अॅनिमेशन बनवणारी ही कंपनी होती. मोठमोठ्या औषधाच्या कंपन्या आमच्या क्लायंट होत्या. मार्केटींग साठी दोन लोक होते आणि बाकी सहा जण ऑफीसमधे बसून अॅनिमेशनचे काम करत असत.

अर्थ साक्शरता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/10/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाचीला नवी स्कूटर घ्यायची होती ,एका शो रूम मध्ये गेलो होतो , गाडीची किंमत सांगीतली 54851रुपये , हप्त्याने घेतल्यास रोख रु.20230 पहिल्यांदा , आणि एकतर 1971 चे 24 हप्ते म्हणजे 47304 एकूण 67534 किंवा 1477चे 36 हपते म्हणजे 53172 एकूण 73402 पहिल्या केसमध्ये वर्षाला फक्त (?) व्याज पडते म्हणे ६५००रु. तर दुसर्या केसमध्ये वर्षाला व्याज पड़ते ६२००रू.

अर्थसाक्षरता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/10/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाचीला नवी स्कूटर घ्यायची होती. एका शो रूममध्ये गेलो होतो. गाडीची किंमत सांगितली 54851 रुपये, हप्त्याने घेतल्यास रोख रु. 20230 पहिल्यांदा, आणि एकतर 1971चे 24 हप्ते - म्हणजे 47304, एकूण 67534; किंवा 1477चे 36 हप्ते - म्हणजे 53172, एकूण 73402. पहिल्या केसमध्ये वर्षाला फक्त (?) व्याज पडते म्हणे ६५०० रु. तर दुसर्‍या केसमध्ये वर्षाला व्याज पड़ते ६२०० रू. त्यांच्या दॄष्टीने. व्याज होते म्हणे ११.३० किंवा ११.८५ टक्के त्यांच्या दॄष्टीनं ते फक्त होते.

विसंगती सदा घडो...

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 11/10/2015 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांना आपल्याच वागण्यातली विसंगती कळते का कधी..? दोन अ‍ॅक्टीवास्वार, एक युवती व एक म्हातारे काका वीसफुटी रस्त्याचा डावा अर्धा भाग आवरून गप्पा हाणित उभे.. मी सरळ त्येंच्या अंगावर फोर-वीलर घातली. बाकी रस्ता मोकळा असूनही वळसा घातला नाही. ते हटेपर्यंत शांतपणे कार त्यांच्यासमोर उभी ठेवली. त्यांच्या आरामाच्या गप्पांमधे खंड पाडल्याने माझ्या कडे भयंकर क्रुद्ध नजरेने पाहत होते. जणू मीच मोठ्या गाडीची मस्ती दाखवत होतो. हे आपल्या भारताचे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय नागरिक, जे जाता-येता 'इस देश का कुच नै हो सकता' आळवत असतात, दुसरे कसे चुकीचे वागतात यावर धीर-गंभीर चर्चा झाडत असतात.

इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 08/10/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती .