=============================
कधी एक काळी असा काळ होता, जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे..
मनातून वारा तरारून येता कसे फूल प्रत्येक नाचायचे !
कधी ते पहाटे दिशाकोन सारेच आदित्य रंगात रंगायचे
कधी रात्रीचे गोड अंधार सारे सुखाच्याच स्वप्नात संपायचे !
असो भोवतालात गर्दी कितीही, तुझे चोरटे नेत्र भेटायचे
मनाचे मनी गूज यावे कळोनी, असे काहीसे छान बोलायचे !
कधी एकदा नीट एकांत येता, हातामधे हात गुंफायचे..
असा स्पर्श स्पर्शास स्पर्शून जाता, रोमांच रोमांच फुलवायचे !
कधी शांतता खूप बोलायची ..अन कधी शब्द सारे मुके व्हायचे,
कधी पावसाळाच डोळ्यात येता, चारी दिशांना धुके व्हायचे..
कधी एवढा काळ भांडायचो की