दुखात सुखाची धून असते ..!!
सगळेच संपून गेलेले असते
ती धडपड ...
जागरणे ....
धावपळ ...
धडधडणे ....!!
नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा
आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू
न कळत ....न जुमानणारे ...!
सगळे बधीर ..!!
ते क्षण ….
ते वातावरण ....
सगळे सुन्न... अबोल ...
अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...!
एका नंतर दुसर्याचे
घनघोर टाहो....
काव्यरस
मिसळपाव