लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा
फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर
मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..!
लेखकशिव कन्यायांनी शनिवार, 26/11/2016 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]
पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी बुधवार, 23/11/2016 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल
विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा
वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा
विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस
पुन्हा अवेळी आली कळ जर
पोट दाबुनी ठेउ नका
पाडून टाका मळमळ सारी
विचार कधिही करु नका
पैजारबुवा,
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी शनिवार, 19/11/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
लेखकशिव कन्यायांनी शुक्रवार, 23/09/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
---- शिवकन्या
लेखकशिव कन्यायांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!
... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
...
लेखकशिव कन्यायांनी मंगळवार, 13/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
cursor च्या सुईने
inbox मधील पत्रे
क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी
हव्या त्या पत्राशी आल्यावर,
अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत,
blank page वर नजर खिळवून
काय काय लिहून पाठवायचे परत
याचे तासनतास जाळे विणतेच कि मन!
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?
शिवकन्या
लेखकशिव कन्यायांनी शुक्रवार, 02/09/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
लेखकशिव कन्यायांनी शनिवार, 20/08/2016 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!'
मऊ शीर, तीक्ष्ण सुई
लक्क काळीज, डोळ्यात पाणी
थंड एसी, मंद दिवे
पांढऱ्या भिंती, एकट रात्री!
तासाला थेंबभर या गतीने
ठि ब क ते रक्त रात्रभर....
जखडलेल्या शरीराने
श्रमलेल्या डोळ्यांनी
हुं कि चू न करता
बघत राहतो आपण
रक्ताची journey........
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
-- शिवकन्या