Skip to main content

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 01/03/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum… https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum… चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…

वाचने 66386
प्रतिक्रिया 548

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

+1 आधुनिक औरंगजेबाने गोव्यात गोमंतक पार्टी तसेच पंजाबात अकाली दल, आसामात आसाम गण परिषद बुडवल्या ( जश्या औरंगजेबाने आदिलशाही कुतुबशाही बुडवल्या होत्या) पण मराठेशाही (आजचे शिवसेना आणी राष्ट्रवादी) बुडवणे त्या औरंगजेबलाही शक्य झाले नव्हते नी आजच्या भंपक औरंग्याच्या बापालाही शक्य नाई!

In reply to by रात्रीचे चांदणे

मग त्याच्या मागे आयडी, सीबीआय लावल्या गेल्या असत्या नी भाजपात आणून मोठे पद दिले असते, सगळे घोटाळे माफ केले असते, संघाच्या केशव माधव ने त्याच्यासाठी सतरंज्या उचलल्या असत्या. तो किती मोठा देशभक्त होता असे पो अंधभक्तानी व्हॉट्सअपवर पाडले असते. आलमगीरभक्त नावाची मोदीभक्त सारखं आणखी एक नवीन जमात असती!

जागतीक आनंदी देश नेमेची येतो मग पावसाळा या धरतीवर या महिण्यात जागतीक आनंदी देशांची क्रमवारी जाहीर झाली. खरे तर मी असले तत्सम शोधनिबंध फाट्यावर मारतो, पण या वेळेच्या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर मेक्सिको हा देश पाहिल्यावर मजा वाटली. खरे तर ह्या चाचण्या कोण करते, कधी करते, कुठे करते, कशी करते हे कागदोपत्री जरी दिसत असले तरी कितपत खरे आहेत हे सर्वे घेणार्‍याला व देणार्‍याला माहीत. ज्या मेक्सिकोमधले यच्च्यावत लोक पडेल ते काम करण्यासाठी जीव धोक्यात घालुन अमेरिकेत येतात त्या मेक्सिकोचा नंबर अमेरिकेच्याही पुढे? जगात हातात कटोरे घेउन भीक मागत फिरणारा पाकीस्तान भारताच्या पुढे? सौदि अरेबिया ३२, जिथे मानवी हक्क काय असतात हे कुणाला माहीत नाही. ग्वाटेमाला / हांडुरास / वेनेझुएला पहिल्या १०० मधे? बरे ते बर्‍याच वेळा वाचले होते की भुतान हा जगातला सगळ्यात आनंदी देश आहे. तो कुठे दिसत नाही. मान्य आहे जीडीपी ह्यात प्रमुख निकष आहे पण बाकीचे निकष? मागच्या महिण्यात किती लोकांना मदत केली, किती पैशे चॅरीटी ला दिले, तुमचे हरवलेले पाकीट कुणी परत दिले असले प्रश्न विचारुन काय साध्य होणार आहे? प्रत्येक देश सांस्क्रुतीक द्रुष्ट्या वेगळा असतो. सौदी अरेबिया जिथे चोरी केली तर हात छाटले जातात तिथे चोरीचे पाकीट कोण घेणार? भारत किंवा चीन सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात १० / २० हजार लोकांना प्रश्न विचारुन काय निष्कर्ष काढणार ?

In reply to by सुक्या

हजारो करोडो खर्च करून जागोजागी मोदींचा चेहरा दिवसातून ४ वेळा लोकाना दिसावा आशो व्यवस्था सरकारने केलीय, तरीदेखील भारत आनंदी देशांच्या यादीत नसेल तर प्रश्न गंभीर आहे!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तरीदेखील भारत आनंदी देशांच्या यादीत
म्हणूनच भारत आनंदी देशांच्या यादीत नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

खिक्क! मला वाटले मोदीजींचा फोटो दिवसातून ४ वेळा पाहून लोकाना आत्मविश्वास, स्फूर्ती, नी प्रेरणा मिळून भारतीय फार आनंदी असावेत, संडासाची भिंत ते दारूचा गुत्ता अशी एक जागा नाही जिथे महामहिम विश्वगुरू श्री नरेंद्र मोदी ह्यांचा फोटो नाही!

In reply to by सुक्या

जागतीक आनंदी देश...
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत. असली संशोधने, पाहण्या व त्यांचे निष्कर्ष हे पाहून त्यांच्यातला फोलपणा लगेच जाणवतो. --- "शेणपट्ट्यात वळवळणारे किडे, साजूक तुपातही शेणच शोधतात" हे अधोरेखित करणारे काही उप-प्रतिसाद या प्रतिसादाखाली दिसले.

In reply to by वामन देशमुख

बरोबर. जन्मापासून मरेपर्यंत शेणगोळे हेच ज्यांचे विश्व त्यांच्याकडून वेगळे काय अपेक्षणार?

औरंग्याने वयाच्या अंदाजे ६० व्या वर्षी महाराष्ट्रावर आक्रमण केले व पुढील २७ वर्षे तो आक्रमण करीत राहिला पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. आधुनिक औरंग्याने सुद्धा ६० वयाच्या आसपास पक्ष काढून महाराष्ट्रावर जातीयवादाचे आक्रमण केले व पुढील २६-२७ वर्षे महाराष्ट्रात जातीय आगी लावत राहिला, पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही. त्या औरंग्याला एक मुलगी होती जी शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होती. आधुनिक औरंग्याला एकच मुलगी आहे व तो उतारवयात मुलीकडेच राहतो.

In reply to by श्रीगुरुजी

'आधुनिक'ला पद्मविभूषण देउन गौरव करणार्या ब्रम्हावृंदाचे काय करायचे? 'आधुनिक' ने पाठिंबा द्यावा म्हणुन ब्रम्हावृंद नेहमीच कार्यशील राहिला आहे. https://timesofindia.indiatimes.com/elections-2004-news/mahajan-vouches…

In reply to by श्रीगुरुजी

गुजरातेत जन्मलेल्या औरंग्याने अनेक वर्षे गुजरातचा सुभेदार म्हणून काम पाहिले, केंद्रात पद बळकावयला आपल्या दारा शिकोह सारख्या आपल्या बंधूंच्याच हत्या केल्या, आधुनिक औरंग्याही गुजरातेत जन्म घेऊन बरीच वर्षे गुजरातची सुभेदारी करत होता तसेच त्यानेही आपले बंधूची सीडी कांड घडवून राजकीय करिअरची हत्या केली! गुजरातेत जातीय दंगल घडवून आपला खुंटा हलवून बळकट केला, जुन्या औरंग्याने आपल्या बायका सांभाळल्या होत्या!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जुन्या औरंग्याने गचकल्यानंतर अंदाजे दोनशे पंचवीस तीस वर्षांनंतर महाराष्ट्रात हिंदू कुटुंबात पुनर्जन्म घेतला व नवीन जन्मातही आपले हिंदूविरोधी जुनेच काम सुरू ठेवले. जुन्या औरंग्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही कारण हिंदूंनी प्रखर प्रतिकार केला व तो तब्बल ८८ वर्षे जगून महाराष्ट्रातच वारला. पुनर्जन्मित औरंग्यालाही महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही कारण हिंदूंनी त्याला कायम पराभूत केले. इथले काही फुटकळ चिल्लर शेंदाड शिपाई त्याला सामील झाले. तरीही हिंदू जनतेने त्याला महाराष्ट्र जिंकू दिला नाही. आता पार थकलाय तो. या जन्मातही आपल्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही हे शल्य उराशी बाळगूनच तो उसासे टाकतोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुनर्जन्मित औरंग्याची पंचाहत्तरी उलटून जवळपास दशक लोटलं. पण रिटायर व्हायचे नाव नाही. लोकांनी धरून चालवायला लागतं, बोलता येत नाही . . . पण जातीजातीत फूट पाडून, जातीय आगी लावून महाराष्ट्र जिंकण्याची हौस कायम आहे. तो औरंग्या सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत रिटायर झाला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

अजून गाठायचीय ७५! तख्तावर औरंग्याच आहे ना? बाकी हे मात्र खरं! गुंड, मावळी, तडीपार, भोगी, इडी, गणोजी, सूर्याजी, निवडणूक आयोग सगळं वापरूनही औरंग्याने काही महाराष्ट्र जिंकला गेला नाही!

धाग्याचे पंचशतक लवकर होण्यासाठी आमची एक काडी :)

घरी आग लागल्याचे निमित्त झाले आणि दिल्ली हायकोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश यशवंत वर्मा ह्यांच्या घरी तब्बल १५ कोटी रुपयांची रोकड सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि एकच गदारोळ झाला. ही घटना घडली १४ मार्च पण जाहीर झाली काल-२१ मार्चला. सरकारी यंत्रणा किती सचोटीने काम करते ते येथे दिसले. नंतर रोकड सापडलीच नाही असा खुलासा दिल्ली अग्निशमन दलातर्फे देण्यात आला.ह्या वर्माची बदली असोसियशनने पुन्हा अलाहाबादला केली. अलाहाबादच्या बार असोसियेशनने हा 'कचरा' इकडे नको म्हणुन निषेध व्यक्त केला. हे वर्मा आधी अलाहाबाद कोर्टात होते. अलाहाबाद कोर्टात अशा 'प्रामाणिक' न्यायाधीशांसारखी 'विद्वान' न्यायाधीशांचीही फौज आहे. हल्लीच तिकडच्या एका न्यायाधीशाने बलात्कार संबंधीत प्रकरणी असा निर्णय दिला होता- that a man allegedly grabbing an 11-year-old girl’s breasts, breaking her pyjama strings, and dragging her under a culvert is not enough to charge him with ‘attempt to rape’ has sparked widespread outrage and calls for the Supreme Court’s intervention https://www.thehindu.com/news/national/uttar-pradesh/demands-for-sc-to-… दोन वर्षपुर्वी गुजरात हायकोर्टाचे एक न्यायाधीश- समीर दवे ह्यांनी १६ वर्षाच्या पीडीत मुलीला 'मनुस्म्रुती वाचली नसशील तर वाच. पुर्वी १७ व्या वर्षी मुली बाळंत व्हायच्या" असा सल्ला दिल्याचे वाचलेले आठवते. एवढे बिन्डोक आणी भ्रष्ट न्यायाधीश देशात कार्यरत आहेत ही शरमेची गोष्ट आहे. आता ह्या वर्मानी कोणते निकाल दिले होते, कोणते संशयास्पद होते ह्याची चौकशी होईल अशी अपे़क्षा करूया.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काही चौकशी होणार माही माई! विशिष्ट पक्षाच्या बाजूने निकाल द्यायच्या बोलीवर ह्या न्यायाधीशाला स्वच्छ करून घेतले जाईल, रिटायर्डमेंट नंतर हाती कमळ घेऊन तो राज्यसभेचा खासदारही होईल! गोबरयुग गं गोबरयुग!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्यावरुन सोहराबुद्द्दिन एन्काउंटरची जुनी केस आठवली. ही केस आधी न्यायाधीश जे टी उत्पत ह्यांच्याकडे होती. त्यांनी अमित शहा ह्यांना हजर रहायला सांगितल्यावर त्यांची बदली झाली आणि जज्ज लोया ह्यांची नेमणुक झाली. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचा संशयास्पद म्रुत्यु नागपूरमध्ये झाला होता. ह्यांच्या बहिणीने(ज्या सोलापूरला असतात. राठी आडनाव आहे बहुदा) टी.व्ही वर येउन सांगितले होते की 'न्यायाधीश मोहित शहा ह्यांनी त्यांच्या भावाला अनेक कोटींची ऑफर दिली होती. लोया ह्यांच्या मृत्युनंतर एम बी गोसावी ह्यांची नेमणूक झाली.ह्या न्यायाधीशांनी सी बी आय न बनवलेली चार्ज शीट(जी साधारण दहा हजार पानांची होती) ती फक्त १५ दिवसात वाचली !!आणि निकाल देउन टाकला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सगळीच यंत्रणा किडवलीय गं यांनी, इडी काय, सीबीआय काय, निवडणूक आयोग काय, ठाकरेंची शिवसेनाही ह्या किडक्या यंत्रणेने संबंध नसलेल्या लोकाना दिली, पवारांनी स्वत स्थापलेली राष्ट्रवादी त्यांच्या हयातीतच काढून घेतली, वाटले होते न्याययंत्रणातरी सुरक्षित असेल पण तसेही काही दिसत नाही. गोबरयुगात आणखी काय काय पाहावे लागणार देव जाणे!

In reply to by रामचंद्र

महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनचे संस्थापक बहुदा. Lieutenant Colonel (retired) Jayant Rao Chitale on Thursday clarified he has formed a 'Hindustan suicide squad' and not a 'Hindu suicide squad' dismissing reports that his outfit has links with the Shiv Sena. इकडे मात्र हसू आवरेना "I have been requesting the government for the last three years to form this suicide squad," he said. "I have sent letters to the Prime Minister Atal Bihari Vajpayee, President Abdul Kalam and the army chief about the formation of these suicide squads, but there was no response. So, I started the training programme." म्हणजे वाजपेयी/कलाम आत्मघातकी पथकासाठी मान्यता देतील अशी जयंतरावांची अपेक्षा होती. असो. https://m.rediff.com/news/2002/nov/14fird.htm

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

२००२ मधील शिळी बातमी आहे. या प्रकारात पुढे काय झाले ते माहिती नाही. या बातमीतील खालील ओळी रोचक आहेत. Media reports had said the 'suicide squad' drew its inspiration from the recent call of the Sena chief to form 'Hindu suicide squads' to tackle terrorism in India. स्वतः व स्वत:चे कुटुंब घरात आरामात बसणार आणि बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि इतरांनी सर्व काही करायचं!

In reply to by श्रीगुरुजी

अरुण भाटिया, अविनाश धर्माधिकारी, खैरनार, किरण बेदी ही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात होती त्याच काळात चितळेसाहेब पुण्यात रान उठवू पहात होते. मात्र पुणेकरांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. भिडेगुरुजींना जशी सांगलीची भूमी 'लाभली' तशी व्यवहारी पुण्यात कर्नलसाहेबांना काही अनुभूती आली नाही. त्यांची 'योजना' यशस्वी झाली असती तर खरोखरच भारताचा इतिहासच बदलला असता. असो.

२००५/६ मध्ये सोहरबुद्दिन,कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती ह्याना खोट्या चकमकीत मारल्याच्या प्रकरणातअमित शहा ह्यांना क्लीन चीट देणारे न्यायाधीश मदन गोसावी सध्या कुठे आहेत हे जाणुन घेण्यासाठी इंटरनेटवर शोधले. आता हे गोसावी संत साहित्याचे अभ्यासक झाले आहेत. आता त्यांचा उल्लेख ह.भ.प. मदन महाराज गोसावी असा होतो. अपेक्षेप्रमाणे ते सत्ताधार्यांच्या आसपासही अधुन मधुन फिरकत असतात. https://www.youtube.com/watch?v=hficKtnREaE अमित शहा आणि त्यानंतर अनेक पोलिस अधिकार्यांना न्यायाधीश गोसावी ह्यांनी क्लीन चीट दिली होती. https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/sohrabuddin-encounte…

२००५ साली सोहरबुद्दिन मेला होता तर केंद्रातील काँग्रेस सरकारने चौकशी करून अमित शहांना जेल मध्ये पाठवायला पाहिजे होते. नऊ वर्ष काही कमी काळ नाही. कमीत कमी खालच्या न्यायालयात तरी गुन्हा सिद्ध व्हायला पाहिजे होता.

In reply to by रात्रीचे चांदणे

तकालिन सरकारचा उद्देश विरोधकांना जेलमध्ये घालणे, जुन्या केसेस उकरुन ई.डी./आयकर खात्याची भीती दाखवणे हा नव्हता. २००५ साली सोहराबुद्दिनचे एन्काउंटर झाले, आणि नंतर लगेच त्याच्या पत्नीला जाळुन मारण्यात आले. तिचा मृतदेहही सापडला नाही. एक वर्शाने तुलसीराम प्रजापती ह्यालाही चकमकीत मारण्यात आले.असो. ह्या न्यायाधीश यशवंत वर्माच्या घरी १५ कोटीची रोकड सापडली आहे. ई.डी./आयकर खात्याचे अधिकारी सध्या दुबई/सिंगापूर्/युरोप फिरायला गेले आहेत का ? कारण निवडणुकपूर्व काळात ह्यांना २५-३० वर्षे जुन्या फायली काढुन त्याचा राजकीय पक्षांना हिशोब विचारण्यासाठी वेळ होता. इकडे तर घबाड सापडलय. पण काहीच हालचाल दिसत नाही. हे न्यायाधीश जेथे राहतात त्या भागात सुऱक्षा असते, सी सी टी.व्ही कॅमेरेही असतात. गेल्या १/२ महिन्यातले फूटेज तपासले तर किती जणांनी न्यायाधीशांना माल आणुन दिला हे कळेल. 'ना खाउंगा ना खाने दूंगा ' म्हणणार्यानी आतातरी पुढाकार घ्यायची किमान हिंमत दाखवावी. ट्रम्पसमोर नुसतेच हसणे,मिठ्या मारणे एकवेळ क्षम्य, कारण अमेरिका देश खूप बलवान आहे. पण निदान अशा ठिकाणी तरी हिंमत दाखवा.

In reply to by रात्रीचे चांदणे

कसं पाठविणार? काही सबळ पुरावे हवे ना? सगळेच असत्य आरोप. मोदींना गुजरात दंगलीत गुंतविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले. परंतु ते जमलं नाही. नंतर इशरत जहां प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाला. इशरत जहाच्या घरी जाऊन जित्याने तिच्या कुटुंबाला १ लाख रूपयांची मदत दिली. एका अँब्युलन्सला शहीद इशरत जहा असे नाव दिले. औरंग्याच्या पित्त्यांना पाकिस्तानी अतिरेकीच जवळचे वाटतात. नंतर सोहराबुद्दिन प्रकरणात. मोदी नाही तर निदान त्यांचा सहकारी अमित शहांना तरी अडकवू म्हणून शहांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. तो प्रयत्नही फसला. नंतर न्यायमूर्ती लोयांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यावरही संशयाचे वादळ उठवून शहांना पुन्हा एकदा अडकविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो सुद्धा अपयशी ठरला. जसे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, दयानंद पांडे अश्या ८-९ जणांना, मूळ गुन्हेगारांना सोडून, मालेगाव प्रकरणात सक्तीचे अढकविण्यात आले होते, अगदी तसेच मोदी-शहांना अडकविण्याचे असंख्य प्रयत्न झाले. अनेक असत्य प्रकरणे निर्माण करून असत्य पुरावे निर्माण केले गेले. परंतु ते या सर्व देशद्रोह्यांना पुरून उरले.

In reply to by श्रीगुरुजी

"नंतर सोहराबुद्दिन प्रकरणात. मोदी नाही तर निदान त्यांचा सहकारी अमित शहांना तरी अडकवू म्हणून शहांना अडकविण्याचा प्रयत्न झाला" सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे का ? जरा गुजरातमधील ज्येष्ट नागरिकांशी(निवृत्त सरकारी अधिकार्यांशी) गप्पा मारुन बघा. सगळे डीटेल्स कळतील. हा गुजरात/राजस्थानमधील गुंड.मार्बल व्यावसायिकांकडुन खंडणी गोळा करुन ती सत्ताधार्यांना पोचवायची कामे करायचा. हरेन पंड्या ह्या भाजपाच्या मंत्र्याची २००३ साली हत्या का झाली होती? कोणी केली होती? हत्या करण्यार्याची हत्या मग पोलिसांतर्फे एन्काउंटर का करण्यात आले.? हे सगळे कोणी केले? पाकिस्तान? काँग्रेस? हरेन पंड्या ह्या मंत्र्याला मारुन पाकिस्तानला काय मिळणार होते? हरेन पंड्या कोणाच्या विरोधात अय्यर आयोगासमोर साक्ष देणार होते?

In reply to by रामचंद्र

पुस्तकातील कोणती घटना खोटी आहे हे म्हणण्याची हिंम्मत अजून झाली नाही.८०च्या दशकापासुन गुजरात्यांची डोकी भडकावण्याचे काम सुरू होते. त्याचा तो परिणाम होता. "मुसलमानाच्या दुकानातून सामान घेउ नका" हे वाक्य गुजरातमध्येच ३/४ वेळा मी ऐकलेले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, डोके भडकावून आपली पोळी शेकणे, सत्ता मिळवणे नी भ्रष्टाचार करणे हाच काय तो भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे, नैतिकतेचं आव आणणाऱ्या संघ सारख्या संघटना असल्या लोकाना पाठिंबा देतात! कुणे एकेकाळी संघात जाऊन कुठलातरी वर्ग पूर्ण केला होता ह्याची आता लाज वाटते!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गल्लीगल्लीत कुत्री भुंकत असतात. अश्या किती कुत्र्यांना हाड् म्हणायचं? एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अशी लाखो पुस्तके आली तरी सूज्ञ दुर्लक्ष करतात. पवारांनी ९-१० वर्षांपूर्वी लिहिलेल्या आत्मचरित्रात सोनिया गांधींवर टीका केली होती. परंतु आजतागायत सोनिया गांधींनी त्यावर अवाक्षर प्रतिक्रिया न देता अनुल्लेखाने मारले. पुस्तक लेखिका किंवा पुस्तकावर विश्वास ठेवणारे न्यायालयात का जात नाहीत?

In reply to by श्रीगुरुजी

न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही, न्यायालय जो निर्णय देईल त्याला न्याय म्हणायचे असते. - असे डॉ. सुबोध खरेनी मिपावरच लिहिले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे का त्याच्या एनकाऊंटरमागे अमित शाह असते तर जास्त आनंद झाला असता. हरेन पंड्यांच्या हत्येनंतरही मोदींना अडकविण्याचा प्रयत्न झाला होता, कारण गुजरात दंगलीमागे मोदी असल्याचे कोणतेही पुरावे मिळू शकले नव्हते. अर्थात या प्रकरणातही मोदी अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले. गुजरात दंगल, हरेन पंड्या, इशरत जहा, सोहराबुद्दिन, ती गुजरातमधील पाळत ठेवण्यात आलेली मुलगी, न्यायमूर्ती लोया अश्या अनेक प्रकरणात जाणूनबुजून मोदी-शाहंना अडकविण्याचा आटोकाट प्रयत्न सोनिया गांधी सरकारने केला. परंतु प्रत्येक वेळी ते अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले.

In reply to by श्रीगुरुजी

मध्यंतरी उभाटा सरकार सत्तेत आल्यावर तरी न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची चौकशी करायला पाहिजे होती. कारण लोयांचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

तेव्हा टकल्याने एक पुस्तक लिहून सर्वोच्च न्यायालयात लोयांच्या मृत्युसाठी शाहंना दोषी धरावे यासाठी दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुरावे, डॉक्टरांची साक्ष, ४ सहकारी न्यायाधीशांची साक्ष, शवविच्छेदनाचा अहवाल, त्यांच्या आजारांचा इतिहास अश्या सर्व गोष्टी तपासून लोयांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा निर्णय दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कौसरबीवर बलात्कार करुन तिला जाळण्याचे आदेश कुणी दिले? ती जीवंत असती तर कोण अडचणीत येणार होते?तिच्या नावावर गुन्हे नव्हते. हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता? हरेन पंड्या कुणाला अडचणीत आणु पाहत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे खरे तर सर्वाना माहित आहेत. ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे. एल ई टी/पाकिस्तान हे शब्द घुसडले की काहीही खपवता येते. आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले. उत्तर प्रदेशच्या लोकांची डोकी फिरवणे तुलनेने सोपे होते. आता लक्ष महाराष्ट्रावर आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता? पाकिस्तानचा म्हणजे पर्यायाने कॉंग्रेसचा. ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे. इशरत आपली हस्तक होती हे लष्करेतोयबानेच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले. चालायला, बोलायला यायच्या आधीपासून गुजराती डोक्यात व्यवसाय, पैसे कमावणे, समभाग वगैरे शिकतात. असले व्यवहारी धर्म वगैरे खूळ डोक्यात घेत नाहीत. आपला लाभ असल्याशिवाय ते काहीही करीत नाहीत. इशरत जहा, सोहराबुद्दिन, हरेन पंड्या यांच्या मृत्युसंबंधी अजूनही मनात शंका असतील तर न्यायालयात जाऊ शकता.

In reply to by श्रीगुरुजी

आणि अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केक भरवायला पंतप्रधान गेले. cake न खाउंगा ना खाने दूंगा असे म्हणायचे आणि न्यायाधीशांच्या घरात कोट्यावधीची रोकड. साधन शुचितेच्या गप्पा संघाने मारायच्या आणि ह्यांच्या मंत्र्यांची अंतर्वस्त्रे फाटलेली. ती महिला कस्तीपटू ओरडुन सांगते, त्या मंत्री ब्रीजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचा सरळ आरोप करते . ह्या ब्रीज्भूषण सिंगवर ३० हुन अधिक गुन्हे. हा माणुस स्व्तःच टीव्हीवर सांगतो की त्याने खून केला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बोंब मारायची आणि ह्यांचेच समर्थक भारतातुन बीफ निर्यात करणार. मेक-इन-इन्डिया म्हणायचे आणि ट्रम्प जे बरळेल त्याला 'येस सर' म्हणायचे. सगळीकडेच ढोंगबाजी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ माई! पण २०१४ साली आमच्या डोक्यात “अच्छे दिन” घुसले होते अच्छे दिन तर आले नाहीत पण बुरे दिन मात्र सुरू झाले! हिरा मिळवायच्या नादात मनमोहनसिंह ह्यांच्यासारखे अस्सल सोने. मात्र गमावले! आता पदरी कोळसा घेऊन फिरतोय! आता ह्यांनी यंत्रणा सडवलीय, निवडणूक आयोग ह्यांच्या ताब्यात आहे, ६ महिन्यात अचानक ४० लाख मतदार वाढतात, ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत कमळाच्या बिल्ल्याचे डायरेक्टर आहेत, म्हणून सर्वांना सारखेच १ लाख १५ हजार मते पडतात, नी मुस्लिम लोकसंख्येपेक्षा जास्ती मते mim पक्षाला पडतात! आता ह्यांना हटवणे भारतीयांच्या दृष्टीने फार कठीण आहे! गोबरयुग गं गोबरयुग!

मोदींना विरोध करायला कितीतरी चांगले मुद्दे मिळतील. पण काँग्रेस सारखे पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी अतिशय चुकीचे मुद्दे निवडले आणि अजूनही निवडत आहेत. लष्करेतोयबा सारख्या आतंकवादी संघटनेने आपल्या वेब साईट वर नाव प्रसिद्ध केलेली महिला आतंकवादी इशरत जहाँ सारख्याला समर्थन करून फार फार तर आव्हाडांसारख्यांना फायदा झाला असेल. बाकी कितीतरी मते कमी झालेली असतील. राफेल डील ला, राम मंदिर, ३७० कलम अशा कितीतरी गोष्टींना विरोध करून काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतलेला आहे

In reply to by रात्रीचे चांदणे

बाडिस. कालौघात केव्हाच बंद झालेल्या इशरत जहा, सोहराबुद्दिन, राफेल वगैरे निरर्थक मुद्दे तेव्हाही निरर्थक ठरले आणि आजही निरर्थक आहेत. विशेषतः या सर्व आरोपांसाठी मोदी-शाहंनी अग्निपरीक्षा देऊन त्यातून ते झळाळून बाहेर आले आहेत. परंतु मूर्ख विरोधक अजूनही ते मुद्दे सोडण्यास तयार नाहीत.

अवघे चौऱ्याऐशी वयमान! यावच्चंद्रदिवाकरौ आसन सोडणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

+१ ह्यांनी आपले शिष्य श्री नरेंद्र मोदी ह्यांचा आदर्श घ्यावा! ते ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहेत गेला बाजार मनोहर पर्रीकर ह्यांचा तरी आदर्श घ्यावा, आपण आजारी आहोत म्हणून त्यांनी पैड सोडले पण आजारपणातच बाटल्या वगैरे घेऊन विधानसभेत गेले नाही!

In reply to by श्रीगुरुजी

+१ ह्यांनी आपले शिष्य श्री नरेंद्र मोदी ह्यांचा आदर्श घ्यावा! ते ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहेत गेला बाजार मनोहर पर्रीकर ह्यांचा तरी आदर्श घ्यावा, आपण आजारी आहोत म्हणून त्यांनी पद सोडले पण आजारपणातच बाटल्या वगैरे घेऊन विधानसभेत गेले नाही!

In reply to by श्रीगुरुजी

उत्तम निर्णय. देर आये दुरुस्त आये. सौदी अरेबिया,मलेशिया वगैरे देशांनी जानेवारीपासूनच अँन्टी डंपिंग शुल्क चीनला लावायला सुरुवात केली होती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, स्टारलिंक, टेस्ला भारतात यायला अनुमती दिली आहे या फेकाफेकीचे पुरावे कधी देणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम निर्णय. देर आये दुरुस्त आये. सरकारने कांद्यावरील २०% निर्यात शुक्ल काढून टाकले. गेले दीड वर्ष कांदा उत्पादकांना सरकारने जेरीस आणले होते. देशाला कांदा खाणारा अर्थमंत्री हवाय, डोक्यात कांदे असलेला नको.

कुणाल कामराच प्रकरण ताणायची काहीही गरज नव्हतं. आता तर तो स्टुडिओ पण पाडणार आहेत. सत्ता आहे म्हणून किती मजुराडे पणा.

- आणिबाणी लादून सर्व देशाचे कारागृह करणारे, - किशोरकुमारच्या गीतांना आकाशवाणीवर प्रतिबंध घालणारे, - हृदयनाथ मंगेशकरांची आकाशवाणीतून हकालपट्टी करणारे, - ऑंधी व किस्सा कुर्सी का चित्रपटावर बंदी आणणारे, - मांग भरो सजना चित्रपटातून शत्रुघ्न सिन्हाची दृश्ये काढून टाकणारे, - झी स्टुडिओची तोडफोड करणारे, - 'सोबत' साप्ताहिकाच्या कार्यालयाची तोडफोड करणारे, - निखिल वागळेला बदडायला गुंड पाठविणारे, - मुका व्यंगचित्र छापल्याने सामना कार्यालयाची तोडफोड करणारे, - बाळ ठाकरेंचे थंड स्वागत अशी बातमी देणाऱ्या बातमीदाराला मरेस्तोवर मारणारे, - व्यंगचित्र समुहात टाकणाऱ्या अनंत करमुसेला १०-१२ माणसे पाठवून घरी उचलून आणून रात्रभर बदडणारे, - व्यंगचित्र समुहात टाकणाऱ्या नौदल अधिकाऱ्याला डोळा फुटेस्तोवर मारणारे, - असंतांचे संत अग्रलेख मागे घेऊन क्षमा मागणारे, - कविता प्रसिद्ध करणाऱ्या एका सामान्य महिलेचा विनयभंग करून ४० दिवस तुरूंगात डांबणारे, - २ ओळींचे ट्विट करणाऱ्याला ४० दिवस तुरूंगात डांबणारे, . . . आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी टाहो फोडत आहेत.

सामान्य माणसांनी असल्या तोडफोडीच समर्थन नाही केलं पाहिजे. आज कामरा उद्या मिसळ पाव वरती टिका केली म्हणूनही तोडफोड केली जाऊ शकते.

In reply to by रात्रीचे चांदणे

आता कुणाल कामरा घटनेची प्रत हातात घेउन दाखवतोय. २०१९ पर्यंत आपली मीडिया शिवसेनेचा उल्लेख 'कम्युनल पार्टी' म्हणून करायची. १९९२ च्या दंगलीचा उल्लेख २०१९ पर्यंत यायचा. शिवसेनेची कॉन्ग्रेसबरोबर युती झाली आणि हे सगळे उल्लेख गायब झाले. म्हणजे आपली मीडियाही खर्या अर्थाने सेक्युलर नाही. किरीट सोमैय्यांच्या गाडीवर दगडफेक करणारे उद्धवसेनेचे होते ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सध्या मिडिया पूर्ण पने भाजपच्या आधीन आहे. त्यामुळे त्यांना सोयीच्या बातम्या फक्त दाखवल्या जात आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रात्रीचे चांदणे ह्यांचा काल भाजप समर्थनाकडे असतो, त्यांनीच हे सत्य सांगितले असल्याने मिडिया भाजपच्या ताटाखालचे मांजर झालाय हे कळते!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे मीडिया जाऊदे खड्ड्यात, खुद्द श्रीगुरुजी शिवसेनेला गुंड लोकांचा पक्ष वगैरे म्हणायचे! पण भाजप सोबत त्यातले ६० टक्के लोक आले तर आता खोटी शिवसेना गुरुजींच्या मते साधू संतांचा पक्ष झाला असावा नाही?

In reply to by रात्रीचे चांदणे

कोणीही केलेल्या कोणत्याही मारहाणीचे, मुस्कटदाबीचे, दढपशाहीचे, तोडफोडीचे मी समर्थन करीत नाही।

ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे. https://marathi.abplive.com/news/politics/bjp-distributes-32-lakh-sauga…