Skip to main content

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 01/03/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum… https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum… चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…

वाचने 66641
प्रतिक्रिया 548

प्रतिक्रिया

आपण युक्रेनला कधी आला आहात का? नसाल तर या हा बाणेदारपणा असेल तर , व्हाइट हाऊसने हाकलून दिल्यानंतरही त्याच अमेरिकेबरोबर मिनरल्स डील करायला तयार होणे ह्याला लाचारी समजायचं का?

तसं ही अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको वरून येणाऱ्या मालांवर कर लावलेला आहे तर भारताविरुद्ध कराची घोषणा केली आहे.

या धाग्यात अमेरिकन तात्या शिवाय दुसरे काही नसते. दिनांक 9 मार्चला आशियातील सर्वात मोठा ज्यूस काढण्याचे संयंत्र नागपुरात सुरू झाले. संयंत्रची क्षमता 800 टन एका दिवसाची आहे. संत्र्या शिवाय इतर फळांचे ज्यूस ही इथे काढले जाईल. पुढील पाच वर्षांत नागपुरात किमान दहा हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि हजारो शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल. संत्र्याचे भाव 40 टक्के वाढले. 1500 रु वरून 2200 रु प्रति क्विंटल झाले.

ट्र्म्पाचे सहकारी वाणिज्य सचिव- हॉवर्ड ल्युट्निक- "भारताने रशियाकडून शस्त्रे घेणे बंद करावे. अमेरिकेकडुन शस्त्रे घ्यावीत. ब्रीक्स देशांनी डॉलरशी स्पर्धा करणारा चलन काढण्याचा जो प्रयत्न आहे तोही बंद झाला पाहिजे. असेही ल्युटनिक म्हणाले. दोन दिवसापुर्वीची मुलाखत आहे. https://www.youtube.com/watch?v=HWaNqn5amJw संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या काय करत आहेत सहज शोधुन पाहिले- चॅम्पियन चषक विजेत्या भारताचे त्यांनी अभिनंदन केले. ओमर अब्दुल्ला ५४ वर्षाचे झाले म्हणुन राजनाथ ह्यांनी त्यांचे शुभचिंतन केले. बेंगळुरुत एच ए एलच्या योगदानाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. https://newskarnataka.com/karnataka/bengaluru/rajnath-singh-celebrates-…

ट्रम्पने शिमगा सुरु केलाय. जर्मनी,फ्रान्स,ब्रिटन्,चीन्,कॅनडाचे देशप्रमुख अजिबात न घाबरता रंग लावत आहेत. भारताला ट्रम्पने रंग लावला पण भारत 'वेळ आल्यावर रंग लावु' म्हणतोय. कॅनडा-अमेरिकेचे गेले १५० वर्षे चांगले संबंध आहेत. दोन देशांत तब्बल ८००० कि.मी. सीमा आहे पण नवे पंतप्रधान माईक कार्नी ह्यांनी ट्रम्पना प्रत्युत्तर द्यायला अजिबात वेळ लावला नाही. सुरुवातीला त्यांनी ट्रम्प ह्यांना हॅरी पॉटरमधील 'वॉल्डेमॉर'ची उपमा दिली."मी ट्रम्प ह्याना अजिबात यशस्वी होउ देणार नाही" असे माईक म्हणाले. न घाबरता,कूटनीतीच्या नावाखाली वेळकाढुपणा न करता कॅनडाने जे ठणकावुन सांगितले त्याला म्हणतात खरा राष्ट्रवाद. राष्ट्रवादाचे दुसरे उदाहरण घ्या- Ontario Premier Doug Ford has taken a strong stance against U.S. President Donald Trump’s sweeping tariffs on Canada, vowing to retaliate by cutting energy exports, banning U.S. alcohol and cancelling a $100 million Starlink deal. They Need To Feel Pain https://www.news18.com/world/canada-cancels-100m-starlink-deal-threaten… आणि आपण? जयशंकर लंडनमधील आपल्या चाह्त्यांचे फोटो टाकुन त्यांचे आभार मानत आहेत. बाकीचे मंत्री भारताच्या क्रिकेट संघाचे कौतुक करत आहेत. ते विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते/सचिव म्हण्तात- ""There is lot of interest in statements coming from United States. I will not go into details"" किती ते घाबरायचे? असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हटल्यानंतर खर तर कॅनडाने सगळे संबंध तोडून टाकायला पाहिजे होते. पण ते बसले कुटणीतीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने टेस्ला आणि हर्ले वर १००% आयातशुल्क लावल्यास अमेरिका भारताच्या कोणत्या उत्पादनावर तेव्हढेच आयातशुल्क लावेल?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अग माई! अमेरिका सारख्या देशांना उत्तर द्यायला देशप्रेम असावे लागते, भाजपेयी देशप्रेमी नाहीत. त्यांच्या आडात देशप्रेम नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

कुलभूषण जाधवांना पकडून देणाऱ्या ISI एजंटांचा अज्ञाताने गोळ्या घालून पाकिस्तानात खात्मा केला तरी संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांचं एक स्टेटमेंट नाही. देशप्रेमी असले असते तर काहीतरी बोलले असते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात कॅनडा तोंडावर पडले नाही तर थोबाड फोडुन घेतले आहे. ३ वर्षे झाली तरी अजुन त्यांची गाडी क्रेडीबल अलीगेशन च्या पुढे सरकली नाहेये. जरा माहीती घ्या. उगा आपले नेहेमीचे डायलॉग मारु नका.

In reply to by सुक्या

खूपच जास्त अपेक्षा. या माणसाची समज ती किती, अभ्यास तो किती, माहिती ती किती. निज्जर हत्येसंदर्भात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही असे ट्रुडोनेच ३ महिन्यांपूर्वी मान्य केले होते. पण हे समजण्यासाठी वाचन करावे लागते आणि थोडी तरी समज असावी लागते. या माणसाच्या बाबतीत तर सगळाच आनंद. अर्थात त्यात नवल नाही. चिवशेणासारख्या घाणीचा समर्थक असण्यासाठी मेंदू घोट्यात असणे सक्तीचे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नक्की का? अटक झालेल्यांसंदर्भात काय? खटले दाखल झाले त्याचे काय? बऱ्याच गोष्टी आहेत, पण एकदा का आपण खोट बोलणाऱ्या नेत्याचे समर्थक झालो की सगळी तथ्ये सहज दुर्लक्षित करता येतात नाही?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भाउबली सायेब, जरा ऐकता का? मी जिथे राहतो तिथुन वान्कुवर २ तासावर आहे. २ महिन्यातुन एकदा तरी मी तिथे जेवण करायला जातो. इतकेच काय ज्या दिवशी निज्जर निजधामास गेला त्या दिवशी मी सरे ह्या गावातच होतो (खादाडी करायला). माझे अनेक मित्र कॅनेडीयन सिटीझन आहेत. तेव्हा मला ह्या प्रकरणाची तुमच्यापेक्षा जरा जास्तच माहीती आहे. उगा आपले व्हाट्सअ‍ॅप छापील प्रश्न विचारु नका.

In reply to by सुक्या

सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो नेमके काय बोलला ते सांगावे, भारताविरुद्ध पुरावेच नाहीत की पुरेसे पुरावे नाहीत? गावठी चाणक्य नी त्याच्या आकाच्या अंधभक्तीत वस्तुस्थिती काय तेही पाहावे! खर तर असे मर्डर करायला जी सफाई लागते ती दाखवता आलेली नाही! निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे. असो! देशभक्त बना अंधभक्त नको इतकेच म्हणेन!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDU त्यांचे पोलिस कमीशनर थेट सांगतात की भारतिय अधिकार्यांविरुद्ध पुरावे मिळाले, ते त्यांनी भारत सरकारला पाठवले. ते त्यांच्या वेबसाईटवर देखील हेच लिहितात. अशी ही बदनामी दुसर्या देशाने खपवुन घेतली असती का? "माफी मागा" असे जाहीररीत्या सांगायला हवे भारताने. आता कॅनडाचे गुप्तचर प्रमुख एका परिषदेसाठी दिल्लित येत आहेत. संबंध पुर्ववत होत असतील तर भारताने त्यांना कमीशनरांचे हे वक्तव्य/वेबसाईट वरील बदनामी थांबवा अशी ताकीद दिली पाहिजे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई हे तुला मला माहीत! पण अंधभक्त त्यांचा गावठी चाणक्य आणी अडाणी आका ह्यांच्या समर्थनात सगळ्यानाच मूर्ख ठरवू लागतात त्याला काय करणार? अंधभक्तीला काहीही सीमा नसते!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे आपली कल्पनाशक्ती आचाट आहे. माझी बोलती बंद केलीत तुम्ही ... (हे परमेश्वरा काय काय वाचावे लागते आहे.)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे आगगाडीचे अपहरण झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! भारताची जी जायची ती गेलीच! ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एका मानसच्या द्वेषपाई लोक बुद्धी गहाण का ठेवतात. कॅनडाची जगात हंसी झाली आहे. बाकी आपले पंत प्रधान जे बोलतात ते करून दाखवितात. दहा वर्षांत भारतात भूतो न भविष्यती विकास झाला आहे. हे जगाला दिसत आहे.

In reply to by विवेकपटाईत

आपले पंत प्रधान जे बोलतात ते करून दाखवितात. दहा वर्षांत भारतात भूतो न भविष्यती विकास झाला आहे.
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली. चालू ठेवा करमणूक. -दिलीप बिरुटे

In reply to by रात्रीचे चांदणे

"तरी संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांचं एक स्टेटमेंट नाही" मारले ही चांगले झाले पण "आम्ही पाकिस्तानच्या एका नागरिकाला मारले" असे विधान करणे मूर्खपणाचे झाले असते. आठवणी प्रमाणे कुलभुषणच्या विरोधात कथित पुरावे सापडले होते. तेथील न्यायालयाने ते तपासले होते. ही केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालु होती/आहे.

"३ वर्षे झाली तरी अजुन त्यांची गाडी क्रेडीबल अलीगेशन च्या पुढे सरकली नाहेये." कॅनडाच्या संसदीय कमीटी मधील नोट्स मधुन- Indian Government Agents’ Involvement in Violent Criminal Activity in Canada On October 14, the RCMP took the unprecedented step of publicly disclosing the threat posed by Government of India actions that have come to light through various law enforcement operations, including ongoing RCMP investigations. https://www.publicsafety.gc.ca/cnt/trnsprnc/brfng-mtrls/prlmntry-bndrs/… इकडे पोलिस कमीशनर काय म्हणतात पहा- https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDU म्हणजे ते त्यांच्या साईटवर भारतावर आरोप करतात,पुरावे आहेत म्हणुन सांगतात, मुलाखतीतही तेच सांगतात. This evidence was presented directly to Government of India officials, along with a request for their cooperation in stemming the violence and that our law enforcement agencies work together to address these issues. कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, देशाचा पंतप्रधान प्रगट सांगतोय की निज्जरच्या हत्येत भारताचा हात नाही आणि तू पोलीस कमिशनर घेऊन बसलीस. म्हणजे पोलिस हवालदार सांगतोय अमुक एकाने चोरी केली आणि पोलीस आयुक्त न्यायालयात सांगतोय त्याने चोरी केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत हे ट्रुडोने सांगितल्यानंतर कॅनडाचे पोलीस आयुक्त, अधिकारी इ. जे म्हणतात त्यास शष्प महत्त्व नाही. अबाच्या संगतीने तुझी अवस्था ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला . . . अशी झाली आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, विषय आहे तो निज्जर हत्या झाली ती भारतीय एजंट्ने केली व त्या हत्येत भारतीय अधिकारी सामील आहेत हा. तुम्ही दिलेला पब्लीक सेफ्टी दुवा हा त्यांच्या पार्लमेंटरी कमीटी च्या नोट्स आहेत. त्याला शष्प महत्व नाही. ट्रुडो तर पार्लमेंट मधे बोलला होता ही ह्यात भारताचा हात आहे. बाकी जर कॅनडा कडे किंवा फाईव आईज कडे जर सज्जड पुरावे असते तर आतापर्यंत ट्रुडो ने थयथयाट केला असता. उगा आपल्या पंतप्रधान पदाचा बळी दिला नसता. ट्रुडो चा सारा डोलारा जगमित सिन्ग च्या आधारावर होता. निज्जर प्रकरणात काही हाती न लागल्यामुळे जगमित ने पण त्याला डच्चु दिला. फाईव आइज पण आता तेरी भी चुप मेरी भी चुप आहेत. असो. अमेरीका/कॅनडा/ब्रिटन वगेरे वगेरे देश काहीही बोलले की ते खरे(च) आहे असे समजणारा वर्ग अजुनही आहे. व्हाईट सुप्रीमसी / गुलामगिरी चे जोखड ईतक्यात फेकणे अशक्य आहे. बरीच व्रुत्तपत्रे/लोक ही मानसिकता नेहेमी दाखवत असतात. कॅनडाचे अधिकारी जे बोलत आहेत ते खरे आहे व भारतीय अधिकारी जे बोलत आहेत ते खोटे आहे हे तुमचे ग्रुहीतक आहे. त्याला तुम्हीच तोडु शकता. ईतर फक्त प्रयत्न करु शकतात. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. परराष्ट्र व्यवहारामध्ये मुसद्देगिरी नावाचा प्रकार असतो, तुमचे चुकले माफी मागा/ कट्टी फु किंवा तु तो मेरा यार है तेरेलिये सब हाजिर है वगेरे भाषण बाजी चालत नाही हे तुम्हाला माहीत आहे. बाकी निज्जर हत्या व नंतर चे झालेले सोहळे याचा आता चावुन चावुन चोथा झाला आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रतीसाद. तरीही गंमत म्हणुन खालीस्तानी किड्यांचे सिटीझन्स कोर्ट / खालीस्तानी रेफरंडम असल्ये माकड्चाळे बघायला जाईनच. त्यांच्या डोळ्यात बघुन छद्मीपणे हसण्यात कोण आनंद मिळतो.

In reply to by सुक्या

कॅनडाचे अधिकारी जे बोलत आहेत ते खरे आहे व भारतीय अधिकारी जे बोलत आहेत ते खोटे आहे हे तुमचे ग्रुहीतक आहे असे कोणी म्हणत नाही. जे समोर दिसते त्यावरुन अनुमान काढावे लागते. ते आर सी एम पी चे कमीशनर चॅनेलवर येउन सरळ "भारत सरकार विरोधात पुरावे आहेत" असे म्हणतात. "भारत सरकारला पुरावे सादर केले आहेत" असेही म्हणतात. त्यांच्या वेबसाईटवरही तसे लिहिले जाते. आता एवढे झाल्यावर भारत सरकारकडुन अपेक्षा काय असते? पुरावे नसतील तर भारतिय दूतावासाने त्या कमीशनरला सांगणे की "तू पुरावे दिले नाहीस. तू भारत सरकारची माफी माग नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू" बरोबर ना? भारतिय दूतावासाकडुन तशी कृती झाली का ? "ट्रुडो बोलला आणि विषय संपला" ही पळवाट नाही का? कॅनडाने भारताची जी बदनामी केली त्याचे काय?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आंतरराष्ट्रीय राजकारणात माफी, अपकीर्तिचा खटला वगैरे नसते, एवढी समज असावी अशी अपेक्षा आहे. ११ सप्टेंबरचा हल्ला बुशने स्वत:च आयोजित केला होता, इस्राएलने केला होता असले अनेक आरोप अनेक इस्लामी देशांनी केले होते. इटालीचा अध्यक्ष तर म्हटला होता की सीआयए व मोसादने संयुक्तपणे ११ सप्टेंबरचा हल्ला योजला होता. ना अमेरिकेने ना इस्राएलने असल्या आरोपांकडे शष्प लक्ष दिले ना ते माफी मागा म्हणून मागे लागले. इंदिरा गांधी तर भारतातल्या सर्व घटनांमध्ये सीआयएचा हात असल्याचा आरोप करायच्या. पाकिस्तान देशातील सर्व घटनांमागे रॉ असल्याचा आरोप करतो. ना असल्या आरोपांमुळे कोणत्या देशाची अपकीर्ति होते ना एखादा देश आमची माफी मागा अशी मागणी करतो ना आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागतो ना आरोप करणारे माफी मागतात. इतकं वय झाले तरी माईडी अजून बाळबोधच राहिली.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान थेट भारतावर आरोप करीत आहे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.

"आमची दारू भारताने स्वस्त करावी. बॉर्बॉन व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी करावे. "तात्यांचे फर्मान. भारताने आयात शुल्क १५०% वरुन १००% केले होतेच. पण आता त्याचे जाहीर वाच्य व्हाईट हाउसने केले- (आयात शुल्क भारताने फेब्रुवारीतच कमी केले आहे) https://www.youtube.com/watch?v=3WWFDXL-juY https://www.reuters.com/business/retail-consumer/india-slashes-bourbon-…(Reuters,in%20the%20South%20Asian%20market. युरोपियन युनियनचे उत्तर- https://www.youtube.com/watch?v=bMHTNFV9Y6M "अमेरिका जे आयात शुल्क लादु पाहातेय ते न पटणारे आहे." पियुष गोयल ह्यांची पुन्हा अमेरिकावारी होतेय. https://www.ndtvprofit.com/economy-finance/reciprocal-tariffs-piyush-go…

शेवटी पंतप्रधानांच्या कार्यालयातुन कुणीतरी बोलते झाले- Trump tariff threats present opportunity for India, too much protection detrimental to growth: Shamika Ravi(पंतप्रधान सल्लागार समीती) वा, म्हणजे भारत जेव्हा आयात शुल्क जास्त लावत होता तेव्हाही संधी होत्या आणी आता आयात शुल्क कमी केल्यावरही संधी आहेत. !!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे आता आनंदी? सरकारतर्फे कोणीतरी बोलावे म्हणून तुझ्या 'ह्यां'नी देव पाण्यात ठेवले होते आणि तू अन्नपाणी सोडलं होतंस. आता देव पाण्यातून काढा, तू उपवास सोड आणि सत्यनारायण घालून उद्यापन कर.

D माईडे, अबा, बलुचिस्तानमधील आगगाडी अपहरण प्रकरणात भारताचा हात आहे या पाकिस्तानच्या आरोपामुळे भारताची जगभर नाचक्की झाली आहे. भारताची मान शरमेने खाली गेली आहे. आधी कॅनडात आणि आता पाकिस्तानात भारत दहशतवादी कृत्ये करीत आहे. भारताला लाज वाटायला हवी. परंतु मोदी-शाह-डोवाल एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे भक्तही गप्प आहेत. भारताच्या नाचक्कीचे यांना काही पडले नाही. तुम्ही गप्प का? निदान तुम्ही तरी काहीतरी बोला.

In reply to by श्रीगुरुजी

जर बलुचिस्तानमधील घटनेत भारताचा हात असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे असे स्वतःच्या बळावर काही नगरसेवक पण निवडून न आणू शकणार्‍या भाजपच्या एखाद्या गल्लीतल्या नेत्याने जाहीर वक्तव्य द्यायला पाहिजे. भविष्यात समजा बलुचिस्तानमध्ये यादवी युद्ध सुरू झाले आणि पाकिस्तानचा तुकडा पडला तर मग 'बघा आम्हीच केलं' असे म्हणत पुढच्या दोन-तीन पिढ्या श्रेय घेऊ :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भक्तुल्यांना अभिमान वाटतोय, पण या घटनेमुळे भारताची मान शरमेने खाली गेलीये आणि जगभर भारताची अपकीर्ति झालीये याचे अधभक्तांना ना सोयर ना सुतक. - इति माई, माईंंचे 'हे' आणि अबा

बर, हा आरोप पण कोणी सध्या माणसाने नाही तर पंत प्रधानाच्या सल्लागाराने केलाय.

जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत आले नसते तर भारताचे तुकडे तुकडे झाले असते. महागाई भयंकर वाढली असती. अनेक सरकारी बँकांचे दिवाळे निघाले असते. (दिवाळखोर कायदा बनला नसता). भारताचा कश्मीरचा बराचसा हिस्सा पाकिस्तानला दिल्या गेला असता. ज्या लोकांचे देशावर प्रेम नाही फक्त तेच मोदींचा विरोध करतात.

In reply to by विवेकपटाईत

"महागाई भयंकर वाढली असती" मग सध्या काय आहे? डिझेल- ५५ रुपयांपासुन ८८ रुपयापर्यंत(२०१४ पासुन २०२४ पर्यंत), पेट्रोल(७३ पासुन ९७ रुपये/लिटर) दूध(३६ रुपये लिटर पासुन ६० रुपये)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

The prices went up again -- from Rs 44 a litre in March 2011 to Rs 66 in May 2014, followed by a slide to Rs 57 in July 2017. माई तुमच्या "ह्यां"चे निवृत्तीवेतन तेवढेच राहिले का? का त्यात महागाई भत्ता आणि सातव्या वेतन आयोगामुळे भरघोस वाढ झाली? किंवा तुमच्या मुलं नातवंडांचे पगारही तेवढेच राहिले का? का कमी झाले? तुमचं वय झालं हे मात्र खरं

" परंतु मोदी-शाह-डोवाल एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे भक्तही गप्प आहेत. भारताच्या नाचक्कीचे यांना काही पडले नाही.तुम्ही गप्प का? निदान तुम्ही तरी काहीतरी बोला." फरक लक्षात घ्या आदरणीय गुरुजी. निज्जर प्रकरणात कॅनडाने पुरावे दिले होते असे ते म्हणतात. त्यांचे पोलिस अमित शहांचे नाव घेतात. आपल्या राजदूताला भारतात पाठवतात. ते पुरावे पाच देशांना देतात. त्यातले दोन देश ब्रिटन आणि अमेरिका काय म्हणतात ते ही वाचा- the United States and the United Kingdom threw their weight behind Canada, accusing India of not cooperating with the probe into the killing in the North American country and nudging it to do so now. म्हणजे फक्त कॅनडाच नाही तर हे दोन महत्वाचे देश कॅनडाला समर्थन देतात(हे समर्थन पुरावे पाहिल्यावरच दिले असणार. हे दोन देश तेवढे शहाणे निश्चित आहेत). म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते. पाकिस्तान आगगाडी प्रकरणात पाकिस्तानने पुरावे दिले का? दुसरा कोणता देश त्याच्या बाजुने उभा राहिला का? असेल तर भारत अशा गुप्त कारवायांत कमी पडतो असाच अर्थ काढावा लागेल. https://www.deccanherald.com/world/us-uk-stand-by-canada-ask-india-to-j… https://timesofindia.indiatimes.com/india/allegations-extremely-serious…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते. यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केल्यानंतर कसली दुबळी बाजू आणि कसलं डोंबलाचं उत्तर द्यायचं?

मला तर वाटतंय की निज्जर ला भारतानेच मारले असेल. हे कॅनडालाही समजले असेल. पण पुरावे सापडत नसतील. त्यामुळेच त्यांच्या स्टेटमेंट्स मध्ये एक वाक्यता नाही. एकदा म्हणतात पुरावे आहेत दुसऱ्या वेळेस नाही. भारतात दहशतवाद्यांचे आरोप असणाऱ्याला कॅनडाने संरक्षण नाही द्यायला पाहिजे होत. आत्ता कॅनडा ने कितीही आदळआपट केली तरी भारताने दुर्लक्ष केलेलेच बरे.

In reply to by रात्रीचे चांदणे

"मला तर वाटतंय की निज्जर ला भारतानेच मारले असेल. हे कॅनडालाही समजले असेल. पण पुरावे सापडत नसतील" बरोब्बर. मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतय. ह्या आधी रॉचे संस्थापक आर एन काओ ह्यांच्या नेत्रुत्वाखाली अनेक कारवाया केल्या आहेत, नामानिराळे राहुन. ७०च्या दशकात Kao as one of the 'five great intelligence chiefs of the 1970s https://en.wikipedia.org/wiki/R._N._Kao ह्यांनी मुलाखतीही फारशा दिल्या नाहीत. ना अजित डोवाल ह्यांच्यासारखे काही विधान केले- You can do one Mumbai, and you may lose Balochistan” - Ajit Doval 9 yrs ago https://www.reddit.com/r/IndianDefense/comments/1f6zoth/you_can_do_one_… डोवाल ह्यांच्याबद्दल आदर आहे पण त्यांचे हेच विधान आता बलुचिस्तान ट्रेन प्रकरणानंतर सगळीकडे पुन्हा प्रसिद्ध होतेय. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत, अनावश्यक विधाने करायची काहीही गरज नाही. ह्याच कारणामुळे कॅनडा बाबतीत भारत शांत असेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतय बाहेर यायचा प्रश्नच नाही कारण आत गेलोच नव्हतो. तसं पाहिलं तर यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केलंय. अजून काय बाहेर यायचंय?

या धाग्याचे शीर्षक " ताज्या घडामोडी मार्च २०२४" असे आहे. मिपा वरचे लोक्स टाईम ट्रॅव्हल करत होते. असा समज होईल एक हजार वर्षांनंतर जर हा धागा कोणी वाचत असेल त्याचा. त्या काळातला एखादा पुना ओक हा लेख पुरावा म्हणून सादर करेल

हायला २०० प्रतिसादांनंतर हे लक्षात आले होय? आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर गप्पा हाणणाऱ्या मिपकराना ही छोटी गोष्ट लक्षात येऊ नये?? मोठ घर पोकळ वासा, वारा जाई भसाभसा!

'मिपा वरचे लोक्स टाईम ट्रॅव्हल करत होते. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर गप्पा हाणणाऱ्या मिपकराना ही छोटी गोष्ट लक्षात येऊ नये" बरे झाले हा विषय आला. आमचे थोर उद्योगपती मुकेश्भाई आणी सुनिल भारती मित्तल जून २०२४ मध्ये मस्कच्या स्टार-लिन्क बद्दल काय विचार करत होते ते शोधुन पाहिले- "Billionaires Mittal and Ambani take on Musk in India’s internet space race" अनेक वर्षे मस्क ह्यांच्या स्टार-लिंकला भारतात परवानगी मिळत नव्हती. Musk’s SpaceX, the owner of Starlink, has been trying to enter the country for more than three years, but has not won regulatory approvals and was rebuked in 2021 by local authorities for signing up customers without having the proper licences. अंबानी आणी मित्तल ह्यांच्या मते स्पेक्ट्रमचा लिलाव व्हायला हवा. ज्योतिरादित्य शिंदे ह्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये लिलाव करण्यात येणार नाही असे जाहीर केले(हे आय टी यु च्या नियमांनुसार आणि मस्क ह्यांना पाहिजे म्हणुन!) https://www.business-standard.com/industry/news/in-a-win-for-musk-scind… ट्रम्प ह्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर चक्र फिरलेली दिसतात. स्पेक्ट्रमचा लीलाव होणार नाही हे ल़क्षात आल्यावर ह्या दोन्ही उद्योगपतीनी मस्क ह्यांच्याशी जुळवुन घ्यायचे ठरवले आणि अवघ्या काही तासात दोघानी स्टार-लिंकबरोबर करार केला. https://economictimes.indiatimes.com/industry/telecom/telecom-news/elon…

In reply to by श्रीगुरुजी

+१ राष्ट्रवादीसोबत युती नाही! नाही! नाही! आपदधर्म नाही शाश्वतधर्म नाही…..!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अशावेळी "राजकारणात कुणीही कायमचा शत्रु नसतो" हे वाक्य समर्थकांकडुन वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठावर फेकले जाते. पण लोकांची दिशाभूल केलीत त्याचे काय ? राज्यावर ९.३ लाख कोटीचे कर्ज आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकावर ७२,००० रुपयांचे कर्ज येते.