Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544962
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by नगरीनिरंजन

स्पष्ट म्हणलंय - "Parliamentary elections in India increase the possibility of communal violence if BJP stresses nationalist themes," म्हणजे राष्ट्रीयत्वाबद्दल बोलले तर कम्युनल टेन्शन होते? कोणाला राष्ट्राच्या संकल्पनेमुळे त्रास होतो बरं? पुढे यात असं लिहिलं आहे - "BJP policies during Modi’s first term have deepened communal tensions in some BJP-governed states, and Hindu nationalist state leaders might view a Hindu-nationalist campaign as a signal to incite low-level violence to animate their supporters," कुठल्या भाजप सरकार असलेल्या राज्यात असे कम्युनल टेन्शन किंवा दंगे झालेत? ज्या गुजराथ मध्ये मोदी १२ वर्ष मुख्यमंत्री होते तिथे २००२ नंतर किती दंगे झाले? गुजराथमधील किती मुस्लिम राज्य सोडून पळून गेले? याउलट प. बंगाल, आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये मध्ये काय चाललंय हे माहित असेलच.

In reply to by ट्रेड मार्क

अहो हा रिपोर्ट त्यांनी त्यांच्या सरकारला दिलाय. ते त्यांच्या सरकारशी खोटं बोलत असतील तर तुम्हाला काय त्रास? असला तरी सीआयएशी वाद घाला.

In reply to by नगरीनिरंजन

उद्या आई ए एस च्या रिपोर्ट ला पण महत्व द्याल का ? मीडिया प्रमाणेच कुंथीत विचार असणारी , स्वतःला पुरोगामी लेबल लावून घेणारी , मुस्लिम विरोधी दंगलीला फक्त जातीय दंगल समजणारी टोळकी भारतात खुप आहेत आणि त्यांच्या पक्षपाती विचारा मुळेच भाजप ने 2014 जिंकले आणि 2019 ला पुनरावृत्ति होण्याची शक्यता आहे . मुस्लिम वर अन्यायाची एखादी घटना घडली की भारतातील तमाम कळवळा वाले एकत्र एवून झापड़ लावून हिंदू समाजाला झोड़पत बसतात ( इथे मिपावर सुद्धा ' जातीयवादी ' म्हणून हीनवणारे गूढ़गे मेंदु वाले त्यातलेच ) आणि बंगाल मधील बहुसंख्य मुस्लिम असलेल्या गावा मध्ये हिंदू च्या वस्त्या जाळल्या गेल्या , त्या वेळी सगळे पुरोगामी , पुरस्कार वापसी , बॉलीवुड मधील खान गैंग थोबाड़ाला कुलुप लावून बसतात . एका हाताने टाळी वाजवन्याची कला असणारे पूरोगामे दोन्ही हाताने टाळ्या वाजवत , टोळ्या बनवून गांवभर फिरायला सुरवात करतात . भारतातील जातीयवाद वाढवन्यासाठी कारणीभूत पुरोगामीच आहेत ( मिपावर सुद्धा ) , पुरोगम्या नी निष्पक्ष भूमिका घेतली तर जातीयवाद नष्ट करण्यात मोलाची साथ जातीयवादच देतील .

In reply to by ट्रम्प

मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, धर्मांध आहेतच; पण हिंदू सहिष्णु होते ना? हे हिंदुत्ववादी हिंदू काही तसे वाटत नाहीत बुवा. बर्‍याच हिंदूंनी “आमच्या नावावर नको“ म्हणून लाथाडलंय या हिंदुत्ववादाला.

In reply to by नगरीनिरंजन

मला त्रास हा आहे की तो रिपोर्ट तुम्ही इकडे दाखवून तुम्हाला हवे ते अर्थ काढताय. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा रिपोर्ट तुम्ही दाखवण्यामागचा उद्देश काय आहे? स्पष्टच सांगा ना, उगाच आडूनआडून कशाला... मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, धर्मांध आहेतच; पण हिंदू सहिष्णु होते ना? हे हिंदुत्ववादी हिंदू काही तसे वाटत नाहीत बुवा. बर्‍याच हिंदूंनी “आमच्या नावावर नको“ म्हणून लाथाडलंय या हिंदुत्ववादाला. या सहिष्णुतेच्या पाखंडापायीच तर हे अडाणी, धर्मांध आपल्या डोक्यावर बसलेत. किती सहिष्णू असावे याला पण काही मर्यादा असली पाहिजेच. तुमच्या घरात तुम्ही एखाद्याला गरज आहे म्हणून आश्रय दिलात आणि मग तो तुमचे उपकार न मानता ही एक संधी समजून तुमच्या घरावर कब्जा करू लागला तर तुम्ही अशीच सहिष्णुता दाखवणार का? जसे हिंदूंनी लाथाडले तसेच किती मुसलमानांनी लाथाडलंय हा प्रश्न एकदा विचारून बघा. हे "बरेच" हिंदू जे म्हणताय तेच आता जागे होत आहेत, उरलेले काही जे सेक्युलर असण्याचे भूत मानगुटीवर बसलेले आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

अहो हा रिपोर्ट त्यांनी त्यांच्या सरकारला दिलाय ..... असला तरी सीआयएशी वाद घाला. तो रिपोर्ट अमेरिकंस लोकांचा ईंटर्नल आहे, तो खरा का खोटा तुम्हाला माहिती नाही !! तरी सुद्धा त्यांच्या सरकारला दिलेला रिपोर्ट तुम्हाला ईथे देण्यात काय ईंटरेस्ट ?

In reply to by डँबिस००७

लोकांनी वाचून ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे बोध घ्यावा म्हणून. बा़की काही खासगी इंटरेस्ट नाही.

काँग्रेसने मसूदला पकडले , भाजपेयींने सोडले, भाजपेयींने अफजलला पकडले, काँग्रेसने फाशी दिली. काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.

काँग्रेसनेच पाकिस्तान बनवला ! काँग्रेसनेच पाकिस्ताला बनवल !! काँग्रेसनेच पाकिस्तानला काश्मिर दिला नाही !!! काँग्रेसनेच पाकिस्तानला अर्धा काश्मिर घेऊ दिला पण काही कारवाई केली नाही !!! काँग्रेसनेच पाकिस्तानशी चार वेळेला युद्ध केले पण एकदाही निर्णायक पराभव केला नाही, पाकिस्तानला निशस्र केले नाही !!!! काश्मिर मधला आतंकवाद हा कॉंग्रेसची देन आहे !! भारतावरचे आतंकी हल्ले हे कॉंग्रेसमुळेच व कॉंग्रेसच्या काळातच झालेले आहे !!

लोकसत्ता ऑनलाइन Pulwama Terror attack: जम्मूकाश्मीरमधील फूटीरतावादी नेत्यांना दणका पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांना जम्मू-काश्मीर सरकारने जोरदार दणका दिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मीरवाइज उमर फारूक, शब्बीर शाह, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि अब्दुल गनी बट यांचा यात समावेश आहे. या फुटीरतावाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी संरक्षण दिले होते. जम्मू काश्मीरमधील आधिकाऱ्याने सांगितले की, मीरवाइज उमर फारूक आणि अन्य चार नेत्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांना यापुढे कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत === हे भाट खरे जबाबदार आहेत कश्मिर प्रश्न वाढवायला.

In reply to by विशुमित

उठसुठ पाकिस्तानी नेत्यां बरोबर चर्चा करणारे फुटिर पुलवामा हल्ल्या बद्दल मात्र असे तोंडात गुळणी धरून बसले आहेत जसे भारतातील काही नेते पुलवामा बद्दल संवेदना प्रकट कराव्या तर मुस्लिम मतदार नाराज होण्याची भीती . त्यांची सुरक्षा काढली हे मस्त झाले .

मटा पुणे आवृत्ति शेवटच्या पानावरील बातमी : - कराची मधील खासगी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय सिनेमातील गाण्यावर डांस चालला असताना पाठिमागील पडद्यावर भारतीय झेंडा दिसला आणि त्यामुळे पाकिस्तान चा अभिमान दुखवला म्हणून त्या शाळेची मान्यता रदद् करण्यात आली . आणि आमच्या भारतात मात्र तुकडे गैंग पाकिस्तान च्या समर्थनार्थ घोषणा देवून धींगाना घालतात कारण त्यांना माहित आहे त्यांच्या समर्थनार्थ रागा , ममता , केजरी , आव्हाड , कधी कधी उधोजी पण येणार . मुख्यता हाच फरक आहे पाकिस्तानी आणि भारतीयांच्या स्वाभिमानात .

In reply to by ट्रम्प

पाकिस्तान्यांना स्वतःच्या देशाचा स्वाभिमान आहे हा तुमचा गैरसमज आहे. तिथे ISI आणि सैन्य एवढे प्रबळ आहेत कि स्थानिक प्रशासनाने लगोलाग भीतीने ते काढायला लावले असणार.बळीचा बकरा हि ठरवलेला असणार. पाकिस्तानी तुंम्ही समजताय तेवढे स्वाभिमानी असते तर सगळीकडे एवढी छी-थू अनुक्रमे पाकिस्तान्यांची आणि पाकिस्तान या राष्ट्राची झाली नसती. खेळाडू,कलाकारांचे आणि सैन्यातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एकच स्वप्न असते संधी मिळाली तर इंग्लंड-अमेरिकेचा व्हिसा मिळवून तिथेच स्थाईक व्हायचे

In reply to by lakhu risbud

पाकिस्तानच्या लोकांना देशाभिमान पेक्षा भारत द्वेष हा मोठा घटक आहे. खरं तर लष्कर आणि भारत द्वेष हे दोन प्रमुख घटक त्यांना विघटनापासून वाचवण्यात मोठा हातभार लावणारे आहेत. अन्यथा पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाण यांच्यात कोणताही बंधुभाव नसून त्यांच्यातून विस्तव जात नाही. धर्म हा सुद्धा त्यांना एकत्र बांधू शकलेला नाही हि वस्तुस्थिती आहे.

काळीमाऊ,
डोवालांचा मुलगा ब्रिटिश नागरिक आहे म्हणे , तुम्हाला भेटतो का कधी ?
ए माझ्या काळीकिच्च मनीमावड्ये, तू कित्तीकित्ती गोंडस ( = क्यूट) आहेस गं. तो पप्पू भारतात राहतो म्हणे. तुला चावलाय का गं कधी? तु.न., -गा.पै.

नगरीनिरंजन,
शिवाय मुंबईत सनातनच्या कार्यकर्त्यांकडे व भाजपच्या नगरसेवकाकडे शस्त्रे सापडली आहेत.
सनातनच्या कोणत्याही साधकाकडे कसलंही शस्त्रं सापडलेलं नाहीये. आणि सापडलं तरी त्याचा सनातन संस्थेशी कसलाही संबंध नाही. नरेंद्र दाभोलकर फ्रॉड असून स्वत:च्या कर्माने मेला आहे. सनातन संस्थेचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांशी फुटक्या कवडीइतकाही संबंध नाही. सनातनच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसृत करणारे खऱ्या धोक्यांपासनं लोकांचं लक्ष विचलित करताहेत. आ.न., -गा.पै.

नगरीनिरंजन,
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.
हा शुद्ध अपप्रचार आहे. हे दावे पुराव्याने सिद्ध झालेले नाहीत. एकीकडे बारा बलुतेदार म्हणून गळे काढायचे आणि त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मणांनी शिक्षण नाकारलं म्हणून वृथा आरोप करायचे. पोटभरू व्यावसायिक शिक्षण बहुजनांना नाकारलं असतं तर बलुतं कुठून निर्माण झाली असती? बकवास सगळा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

=)) इंग्रज यायच्या आधीच्या भिक्षुक वैदिक शिक्षणाला कुत्रंही विचारत नव्हतं हे खरं आणि भविष्यातही विचारणार नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. बलुतेदारांनी जी काही कौशल्ये विकसित केली ती स्वतः केली. त्यांना कधीही राजाश्रय किंवा संस्थात्मक आधार मिळाला नाही. इंग्रजांसकट येईल त्या राज्यकर्त्यांची भाटगिरी करणार्‍यांनी कौशल्यविकास व संशोधकवृत्तीला कधीही निरपेक्ष व संस्थात्मक आधार मिळू दिला नाहीय ह्या देशात. ज्या देशांनी हे केलं ते आज महासत्ता झालेत आणि भाटमंडळी समुद्र ओलांडण्याचे आपलेच जुने नियम सोयीस्करपणे गुंडाळून त्यांच्या आश्रयाला गेलेत.

जवानावर दारू पिल्याचा आरोप पोलिसांनी केला असता ' माझी वैद्यकीय तपासणी करा ' जवानाने सांगून सुद्धा त्याला सात तास चौकित डांबन्यात आले . आपले फड़नवीस साहेब यात जातिने लक्ष घालतील अशी अशा आहे . पूर्ण देशात ही न्यूज स्प्रेड होवून महाराष्ट्र पोलिसांचे म्हणजेच मुख्यमंत्री चे नाक कापले जाण्याची शक्यता वाटते . MT: Baramati: सीआरपीएफच्या जवानाला बारामती पोलिसांची बेदम मारहाण http://mtonline.in/5yRWPY/dga via @mataonline: http://app.mtmobile.in

पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या पंजाब मधल्या अंत्ययात्रेला हजर रहायला काँग्रेसच्या आमदार नवज्योत सींगला वेळा मिळाला नाही ! पंजाबचे मुख्य मंत्री अमरेंद्र सींग यांनी अंत्ययात्रेला हजर सुचना नवज्योत सींगला दिलेली असताना ह्या सुचनेचे पालन नवज्योत सींग यांनी केले नाही !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का एक वीडियो सोशल मीडिया पर ख़ूब चर्चा में है. इस वीडियो क्लिप में नरेंद्र मोदी कह रहे हैं, "सेना में जवान जितना साहस करने की ताक़त रखता है उससे ज़्यादा साहस करने की ताक़त व्यापारी रखता है." इस वीडियो को ख़ूब शेयर किया जा रहा है कि इसके सामने आने के बाद विवाद खड़ा हो गया है. हालाँकि ये स्पष्ट नहीं है कि उन्होंने इससे पहले और बाद में क्या कहा और ये वीडियो कब का है. वीडियो को लेकर सोशल मीडिया पर भी हज़ारों टिप्पणियां आई हैं. https://www.bbc.com/hindi/india/2016/03/160307_controversy_over_modi_tr…

चार वर्षा पूर्वी शमीमा बेगम नावाची मुलगी मोठ्या बहिणीच्या पासपोर्ट वर यू के मधून बाहेर पळाली आणि सीरिया मधील ई सी स जॉइन केले . ज्या वेळी ती पळाली त्या वेळी 15 वर्षाची होती आता तिला लहान मूल आहे व तिला पुन्हा युकेत यायचे आहे , पण आता जनमत तिच्या विरोधात असताना तेथील पुरोगम्या मुळे ती परत येवू शकते . https://twitter.com/TwitterMoments/status/1096006591688646656?s=09

सरकारला २८ हजार कोटी रूपयांची अंतरिम शिलकीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली हे या बैठकीस उपस्थित होते.. सलग दुसऱ्या वर्षी आरबीआय सरकारला अंतरिम शिल्लक हस्तांतरित करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. याच मुद्यावरून सरकारबरोबर मतभेद झाल्याने आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

"घेतला कळफलक आणि बडवला बेजबाबदारपणे" याचे अजून एक उत्तम उदाहरण ! Blackcat, वैचारिक अंधत्वामुळे, तुमच्या लेखनाच्या विश्वासार्हतेची पातळी दिवसेदिवस... तळ नसलेल्या डक्यात पडावी तशी... रसातळाला जात आहे. =)) =)) =)) आरबीआयने सरकारला नुकतीच दिलेली रक्कम, आरबीआयला झालेल्या फायद्यांपैकी, सरकारला दिलेला लाभांश (डिव्हीडंड) होता. Reserve Bank of India Act of 1934 अन्वये आरबीआय स्थापन केली गेली आहे. त्या कायद्याच्या Chapter 4, section 47 of the Act अन्वये, असा अंतरिम आणि/अथवा अखेरचा डिव्हिडंड (लाभांश) आरबीआय सरकारला दरवर्षी देते. गुंतवणूकदाराला कोणतीही संस्था लाभांश देते, तसाच हा सर्वसाधारण प्रकार आहे. आरबीआयने सरकारला पहिला लाभांश १९३६ साली दिला आहे. (The RBI was founded in 1934 and has been operating according to the Reserve Bank of India Act of 1934. Chapter 4, section 47 of the Act, titled “Allocation of Surplus funds” mandates for any profits made by the RBI from its operations to be sent to the Centre.) काही दिवसांपूर्वी माध्यमांत चर्चिला गेलेला मुद्दा या लाभांशाबद्दल नसून, आरबीआयकडे असलेल्या देशाच्या गंगाजळीच्या, देशोपयोगी विकासकामाच्या उपयोगाबद्दलचा, होता. ही गंगाजळ रु२८,००० कोटी इतकी टुक्कार नसून, ३० जून २०१८ रोजी जाहीर झालेल्या आकड्यांप्रमाणे, तिचे आकारमान, खालीलप्रमाणे आहे... (अ) चलन आणि सोन्याच्या स्वरूपातली गंगाजळी : रु६,९१,००० (सहा लाख, एक्याण्णव हजार) कोटी आणि (आ) आकस्मिक कारणांसाठी आरक्षित चलन (contingency reserve) : रु२,३२,००० (दोन लाख, बत्तीस हजार) कोटी म्हणजे, एकूण रू९,२३,००० (नऊ लाख, तेवीस हजार) कोटी इतकी मोठी आहे. यामधील काही रक्कम विकासकामांसाठी किंवा आकस्मिक कारणांसाठी वापरायचा वैध हक्क सरकारला आहे आणि त्यावेळेसही, ती रक्कम वापरण्याबद्दल मतभेद नव्हते, तर त्यापैकी किती रक्कम वापरावी, याबद्दल होते. एखाद्या गंभीर मुद्द्यावर लिहिण्यापूर्वी, त्याचा थोडातरी अभ्यास करून मग कळफलक बडवावा, आणि ते जमले नाही तर गप्प बसावे, इतके मूलभूत ज्ञान वापरले असते, तर परत एकदा तोंडावर पडायला झाले नसते =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ साहेब , ज्या माणसाला २००% कस्टम्स डयुटी पडल्याने वस्तुची किंमत किती वाढु शकते हे साधारण गणित जमत नाही त्याच्या कडुन RBI च्या लाखो कोटीच्या रकमांच गणित कस उगडाव ?

In reply to by डँबिस००७

अंतरिम शिल्लक आणि लाभांश एकच का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

नई दिल्ली वित्त मंत्रालय ने कैलकुलेशन करके बताया था कि आरबीआई ने रिस्क और रिजर्व के नाम पर वित्त वर्ष 2017 और 2018 में 27,380 करोड़ रुपये अपने पास रखे थे। मंत्रालय चाहता है कि वह इस रकम को भी ट्रांसफर करे। आरबीआई ने सोमवार को अपने बयान में कहा, 'यह लगातार दूसरा साल है, जब रिजर्व बैंक इंटरिम सरप्लस ट्रांसफर कर रहा है।' पिछले वित्त वर्ष में आरबीआई ने मार्च में 10 करोड़ रुपये का अंतरिम लाभांश सरकार को दिया था। इसके साथ वित्त वर्ष 2018 में डिविडेंड की कुल रकम 40,659 करोड़ रुपये पहुंच गई थी। https://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/centre-wan… जी एस टी त थोबाड फुटले , त्याची प्लॅस्टिक सर्जरी करायला पैसे पाहिजे आहेत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

रेल्वे स्टेशन वरचे फुकट वाय फाय वापरणाऱ्या नीं कोटयावधि च्या गप्पा मारू नये , काँग्रेस च्या काळात ओवरड्राफ्ट कित्तेक वेळा काढला !! सरकारी कर्मचाऱ्याचें पगार सोने विकुन करत होते !! आठवा ते बुरे दिन !!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

(आरबीआयला तिच्या कामांमुळे मिळालेले उत्पन्न - तिचा खर्च) = शिल्लक = फायदा = लाभ (नेट प्रॉफिट). लाभाचा गुंतवणुकदारांना वाटला जाणारा अंश = लाभांश (डिव्हिडंड). गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणूकीच्या प्रमाणात लाभ विभागला (डिव्हाईड केला) जातो... म्हणून गुंतवणूकदाराला मिळणार्‍या लाभांशाला, 'डिव्हिडंड', म्हणतात. वर्ष पूर्ण होण्याअगोदर, अंतरिम (इंटेरिम) ताळेबंदाच्या आधारे, गुंतवणूकदारांना दिलेला लाभाचा भाग/अंश = अंतरिम लाभांश (इंटेरिम डिव्हिडंड). पूर्ण वर्षाचा ताळेबंद तयार झाल्यावर गुंतवणूकदारांना दिलेला लाभाचा भाग/अंश = अंतिम लाभांश (फायनल डिव्हिडंड). असे अंतरिम व अंतिम लाभांश गुंतवणूकदारास देणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे, हे आर्थिक क्षेत्राचे "निम्न स्तराचे" ज्ञान असलेल्या व्यक्तिला माहित असते... तसे ज्ञान नसलेल्या, मुद्दाम डोळे घट्ट बंद करून घेतलेल्या अथवा नाठाळपणे विपर्यास करणार्‍या व्यक्तीला हे लागू होत नाही, हेवेसांन. ज्याने त्याने यापैकी आपला प्रकार निवडावा आणि वाचकांनी लेखकाचा प्रकार ठरवावा. =)) =)) =))

ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: February 19, 2019 12:59 PM | Updated: February 19, 2019 01:01 PM statue of shivaji maharaj in kothrud without any decoration ; Congress and NCP invaders | ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक ठळक मुद्दे निधी उपलब्ध नसल्याचे महापौरांकडून कारण पुणे: संपूर्ण देशभरात शिवजयंती जल्लोषात साजरी होत असताना मात्र, कोथरूडमध्येछत्रपती शिवाजी महाराज पुतळ््याला कोेणत्याही प्रकारची सजावट करण्यात आली नाही. हा एकप्रकारे महाराजांचा अपमान आहे. आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही अशी भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महापालिकेच्या या कृतीविरोधात आंदोेलन छेडले. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच आंदोलकांकडून यावेळी महापौरांना लक्ष्य देखील करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध करत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महापौैर मुक्ता टिळक विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्त्तर देताना म्हणाल्या, न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेच्या कररुपी पैशांची उधळपट्टी थांबविण्यात आली आहे. निधी उपलब्ध नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले http://m.lokmat.com/pune/statue-shivaji-maharaj-kothrud-without-any-dec…

What Manmohan Singh said "We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably the fruits of development. These must have the first claim on resources" Equitably : “in a fair and impartial manner.” [2] These : “devise innovative plans” not “Muslims or minority”. (If latter was the case he would have used “They” instead of “these”) What he meant "We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share in a fair and impartial manner the fruits of development. These plans must have the first claim on Central Government resources" https://www.ndtv.com/video/news/news/pmo-dismisses-row-over-manmohan-s-… https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/minoritie…

In reply to by अर्वाच्य

... तर पंतप्रधान कार्यालयानं खुलासा प्रसिद्ध का केला नाही? किमान टाइम्स ला त्यांची बातमी मागे घ्यायला का लावली नाही?

In reply to by महेश हतोळकर

These (इनोवेटीव प्लान्स) must have the first claim on resources. तुम्हाला उलगडून सत्य सांगितले तर तुम्ही समजून आपले मत बदलणार ह्या आशेवर खुलासा करुन दिलाय. यापुढे तुमची मर्जी

In reply to by महेश हतोळकर

सुरुवातीलाच पंप्र "these plans" असं स्पष्ट म्हणाले नाही यातच सगळं आलं. खडा मारुन पाहिला, अंगलट येतय असं दिसल्या बरोबर स्पष्टीकरण पुढे केले.

In reply to by अर्वाच्य

"We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably the fruits of development. These must have the first claim on resources" WHICH MEANS "We will have to devise innovative plans to ensure that the Muslim minority gets the first claim on National resources which belong to all"

In reply to by अर्वाच्य

तुम्हीच जो व्हिडिओ शेअर केला तो बघितला नाही का? त्यात डॉ. साहेबांनी स्पष्ट म्हणलंय "They must have the first claim on resources". हे These तुम्ही तुमच्या मनाचं टाकताय कारण सारवासारव करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेस वापरायला मनुष्य लागतो प्लॅन काही आपले आपले रिसोर्सेस वापरणार नाहीये. म्हणजेच तुम्ही म्हणता तसं These plans असं म्हणले असते तरी अर्थ असा निघतो की प्लॅन पण असे बनवायचे की त्यातून मुसलमानांना हे रिसोर्सेस पहिले वापरायला मिळतील, कारण त्यांचा या रिसोर्सेसवर पहिला अधिकार आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? किंवा जे करत आहेत त्यांच्या प्रगतीला कोणी अडथळा आणत आहे का? मुस्लिम मुलांना शाळेत घेणार नाही असे कुठली शाळा म्हणते का? पण त्या लोकांनाच मुलांना मदरशात पाठवायचं असतं त्याला कोण काय करणार? मदरसे आधुनिक करायचा तथाकथित "हिंदू" सरकारच्या प्लॅनला कोणी विरोध केलाय ते बघा. हिंदूंनी कधी मुसलमानांना प्रगती करण्यास विरोध केला आहे ते पुराव्यासहित सांगा. ज्या मुस्लिमांना प्रगती करायची होती ती त्यांनी केलीच आहे, त्यांना कोणी अगदी उच्च शिक्षण घ्यायला किंवा नोकरी करायलाही बंदी केलेली नाहीये किंवा अडथळेही आणला नाहीये. असे असताना का देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप द्यायचे?

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही भारतात राहत नाही. भारतात परत यायचा काही तुमचा प्लान नाही. मग आमच्या देशात आम्ही काय करतो यावर बोलण्यचा तुम्हाला काय अधिकार मिळतो? भारतात राहत असाल तर बोला नाही तर आपली इथली टकळी बंद करा.

In reply to by अर्वाच्य

मी कुठे राहतो, माझा कुठे जायचा/ यायचा प्लॅन आहे नाही याच्याशी तुम्हाला काय करायचंय? मी पण भारतीय नागरिकच आहे त्यामुळे घटनेने मला अधिकार दिलेला आहे त्याचा मी वापर करणारच. मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसेल तर असे प्रतिसाद येतात. एकतर मुद्देसूद प्रतिवाद करा नाहीतर आपले अर्वाच्य तोंड बंद करा.

In reply to by ट्रेड मार्क

पुन्हा एकदा तुमचा हास्यास्पद प्रतिसाद. हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता? एका ठिकाणी अरब देश अतिरेक्यांचा तोंडदेखला निषेध करतायत- तुमच्या मते प्रत्यक्ष काही करत नाहीत - याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. इथे मात्र तोंडदेखलं बोललेलं तुम्ही पुरावा म्हणून सांगताय. थोडं तरी तार्किकदृष्ट्या सुसंगत बोला. मुसलमानांची प्रगती का होत नाहिये याची बहुतेक कारणं सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये आधीच आली आहेत, आता तुम्हाला ते शिकवत बसायचं का, की समजून घ्यायचं नाही हा तुम्ही दृढनिश्चय केला आहे?

In reply to by आजानुकर्ण

पहिली गोष्ट म्हणजे, ममो असं म्हणले होते याचा काही पुरावा आहे का याची विचारणा झाली होती, त्यासाठी हा व्हिडिओ देण्यात आला. दुसरी गोष्ट, जर अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करणाऱ्या सरकारनेच मुसलमानांसाठी काही केले नाही हे तुम्ही चक्क मान्य केलंत. ममो सिंग तोंडदेखलं बोलले असे तुम्हीच म्हणताय. यालाच सेल्फ गोल म्हणतात. १५ लाखाची गोष्ट करताय तर पहिले आव्हान म्हणजे मोदी असे म्हणले याचा एक अधिकृत व्हिडीओ द्या. तसेच २००६ साली ममो सिंग कुठल्या निवडणुकीचा प्रचार करत होते? देशाचा पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीने असेच एक वाक्य कोणाला तरी झुकते माप देण्यासाठी का बोलावे याचे काही स्पष्टीकरण तुमच्याकडे आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे सच्चर समितीच्या रिपोर्टमध्ये पण खालील गोष्टी सांगितल्या आहेत. The Sachar Committee has compiled data from a number of sources. The report frames these issues as related to identity, security and equity. Barring some generic observations about the causes for the ‘development deficit’ among Muslims, there is no explicit or detailed discussion of the causes of such conditions. तसेच यातून बाहेर पाडण्यासाठी रेकमेंडेशन केलं की त्यांना सामान संधी असल्या पाहिजेत. कुठलाही रिपोर्ट असे म्हणलं नाहीये की मुसलमानांना झुकते माप द्या.

In reply to by ट्रेड मार्क

पुन्हा एकदा प्रयत्न करा. एक वाक्य म्हणजे संपूर्ण सच्चर आयोग रिपोर्ट नाही. तुम्हाला समजायला वेळ लागत असेल तर दोन वेळा प्रयत्न करा. प्रतिसाद द्यायची काहीही घाई करू नका . मी इथेच आहे. शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल. मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले. प्रतिसाद देताना किमान एकदा तरी वाचून पाहा. एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा. सुरुवातीला त्रास होईल पण जमेल.

In reply to by आजानुकर्ण

एक तर अर्वाच्य (हा आयडी आहे) यांनी या प्रतिसादात असे ममो म्हणाले याचा पुरावा द्या असे विचारल्यामुळे तो दिला. आणि त्यावर तुम्ही म्हणताय "हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता?" तुम्ही तर या प्रतिसादात फक्त सच्चर समितीचा उल्लेख केला आहे. मी निदान एक वाक्य तरी दिलं. एवढी तुम्हाला सच्चर समितीच्या रिपोर्ट समग्र माहित आहे तर एक लेख लिहा ना काय रिपोर्ट काय सांगतो आणि आत्ताच्या सरकारांनी काय काय केले आणि काय नाही केले. शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल. हाहा, एकही प्रतिसाद धड देता येत नाही पण तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाखाणण्यासारखा आहे. थोडी प्रयत्नांची दिशा बदललीत आणि झापडं काढलीत तर हळू हळू जमू शकेल. मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले. नाही हो, जुमला म्हणलं म्हणून नाही तर १५ लाख म्हणलं म्हणून आठवले. सगळे विरोधक वाडगा घेऊन कधीच आस लावून बसलेत. एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा. कोण कोणास म्हणाले! स्वतःचे प्रतिसाद लिहिताना थोडा विचार करत जा, आधीच्या प्रतिसादाचा रेफरन्स घ्या, संशोधन करत जा आणि नंतर १० वेळा वाचत जा. नाहीच जमलं तर बुद्धिवर्धक औषधे घेऊन बघा. एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे की माझ्या प्रतिसादांवर आक्षेप तुम्ही घेताय, त्यातही एक पण गोष्ट सुसंगत सोडा पण धडपणे मांडताही आली नाहीये. बाकी तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजत असाल तर मी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या - १. मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? २. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप का द्यायचे? याचे स्पष्टीकरण ३. १५ लाखांचा प्रत्येकाला देऊ असा चुनावी जुमला कोणी कधी केला त्याचा अधिकृत पुरावा द्या. ४. मुस्लिम लोकांच्या प्रगती साठी मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसने आत्तापर्यन्त काय काय प्रयत्न केले? ५. सचर समितीच्या रिपोर्टबद्दल तुमचे आकलन काय आहे? ६. सरकारने मुस्लिम लोकांच्या प्रगतीसाठी काय पावले उचलायला पाहिजेत? तुमच्या सोयीसाठी सगळे प्रश्न एकत्र विचारलेत. आता दाखवा तुम्ही किती सुसंगत आणि मुद्देसूद उत्तरे देताय.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रेड मार्क , पुन्हा एकदा सडेतोड़ प्रतिसाद !!! परदेशी राहून भारतातील धर्मादं , पुरोगामी लोकांची तोंड तुम्ही ज्या वैचारिक पद्धतीने , संयम राखून , बंद करता ते सुद्धा एकाच आय डी ने ते वाखाणण्याजोगे आहे . लगे रहो !!!!! हम तुम्हारे साथ है !!!!

In reply to by ट्रम्प

आपण प्रयत्न करत राहायचं तरी या लोकांच्या विचारात फार फरक पडेल असं वाटत नाही. काही लोकांची बुद्धी तर फारच कलुषित झाली आहे. तर काहींना मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसल्याने त्रास होतोय तर काहींना आव्हान दिल्याने होतोय. मजा आहे.

अक्षय कुमार - 5 करोड़ सलमान खान - 22 लाख अमिताभ बच्चन - 2 करोड़ दिलजीत दोसांज - 3 लाख सिंगर बादशाह -3 लाख उरी टीम - 1 करोड़ टोटल धमाल टीम - 50 लाख . पुलवामा घटनेत मरण पावलेल्या जवानां साठी बॉलीवुड मधील या सेलेब्रिटीज़ ने मदत जाहिर केली आहे असहिष्णुता वरुन बोम्ब मारणारे आणि पाकिस्तानातील पुरग्रस्त जनते च्या मदतीला धावणाऱ्या शाहरुख आणि आमिरखान ने अजुन मात्र जवानां साठी पुढाकार घेतलेला नाही . मदत किती करावी की करु नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामध्ये कोणीजबरदस्ती। करु शकत नाही . पण दोन्ही देशातील जनतेत असा भेदभाव केल्या मुळेच खान गैंग सोशल मीडिया वर टार्गेट होते .

In reply to by ट्रम्प

परदेशी राहून काही आय डी भारतातील धर्मादं , पुरोगामी लोकांची तोंड ज्या वैचारिक पद्धतीने , संयम राखून , बंद करत आहेत ते सुद्धा एकाच आय डी ने. असे हे वाखाणण्याजोगे काम करत असताना तुम्ही मात्र फेक बातम्या देऊन त्यावर सगळा पोतेरा फिरवत आहात. https://m.timesofindia.com/news/fake-alert-no-shah-rukh-khan-did-not-do… === कसा का असेना पण शाहरूख आपल्याला जाम आवडतो!!

In reply to by विशुमित

प्रतिसाद देण्या अगोदर वाचत जा म्हणजे नंतर खजील होण्याची वेळ येणाऱ् नाही , असो !!! तर आता नीट समजून घ्या , कारण तुमच्या तालुक्यातील तुमचे चाळीस पन्नास मित्र सैन्यात आहेत असे तुम्ही एकदा सांगितले होते , त्यामुळे लोकांनी वेलफेयर सोसायटी ला केलेल्या मदतीचे महत्व तुम्हाला समजवण्याची वेळ येते यात आश्चर्य आहे . शिवाय हा विषय पक्षीय राजकारणाच्या पलीकडे आहे एवढी तरी समज तुम्हाला असेलच . हां !!! तर ज्या सैनिकांनीं देशासाठी वीरमरण स्वीकारले त्यांना सरकारी नियमानुसार मदत मिळतेच पण काही सेलिब्रिटीनी आपण या देशाचे काही देणे लागतो या भावनेतून वेल्फेयर सोसायटी ला आर्थिक मदत केली तर कोणी त्या सैनिकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली . सैनिकांच्या वेल्फेयर सोसायटी ला मदत करणाऱ्यामध्ये खान गैंग कधीच नसते अस का ? ते या देशाचे नागरिक नाहीत ? का त्यांचा बाप आय एस आय एजंट ( दावूद ) नाराज होईल म्हणून ? हि खान पिलावळ बाकीच्या सोशल एक्टिविटी करत असते यात शंका नाही पण नेमके इथेच पाणी का मूरत ?

In reply to by विशुमित

वैयक्तिक मानहानी , आय टी चा ढोस , उद्धट भाषेतील प्रतिसाद यावरुन तुमची शैक्षणिक पात्रता समजली !!!! असो !!! तेवढ जरा वेळात वेळ काढून वेल्फेयर सोसायटी च्या मदती बाबत तुमचे आणि बम्बळ चे विचार एकदम दक्षिण ध्रुवीय का होते तेव्हढ सांगाल का ?

In reply to by ट्रम्प

पहिल्या फ़ेक बातम्या चिटकवने जरा बंद करा. मग लोकांची शैक्षणिक पात्रता शोधत बसा. बाकी तुमचा प्रतिसाद एकदम हास्यास्पद असल्या कारणाने तो मी फाट्यावर मारला होता. Chillax...!!

In reply to by विशुमित

असू द्या !!! काही हरकत नाही , फक्त तेवढे आर्मी बद्दल चे ढोंगीप्रेम बंद करा किंवा खुल्लमखुल्ला पाकिस्तान च समर्थन करा .

In reply to by ट्रम्प

का उगाच हसं करून घेताय स्वतःचं?? फेक बातम्या टाकताय आणि म्हणताय काही हरकत नाही!! अजब आहे! === बाकी कोणाच्या सर्टिफिकेटसची आम्हाला गरज नाही. बाजारबुनग्याची तर नाहीच नाहीच...!! पुढे तुम्ही ठरवा!

In reply to by विशुमित

आयला !!! डायरेक्ट बाजारबुणगे ? दिसतेय ! दिसतेय !!! तुमच्या प्रत्येक प्रतिसाद मध्ये तीच छाप दिसतेय = ) बघा ! याला म्हणतात कंट्रोल करणे !! संयम ठेवणे !! नेमकी हीच गोष्ट तुम्ही साहेबांकडून शिकले नाही , शेम्बड्या पोरांची काम नाहीत राजकारणाच्या गप्पा मारायला .

In reply to by ट्रम्प

फेकर लोकानी दुसर्याना शहाणपणा शिकवू नये. आधी पहिले नाक पुसा बघू , मग राजकारणावर गप्पा मारा.

In reply to by ट्रम्प

नुसती जळजळ! तेवढंच करा... ते करोडोमध्ये कमावतात आणि करोडोमध्ये टॅक्स आपल्याच देशाला देतात, पलीकडच्या नाही! वरच्या प्रतिसादात तुमचे खोटे उघडे पडलेच आहे असेही. २०११ ला शाहरुख खानला युनेस्को पुरस्कार मिळालेला आहे सामाजिक कार्यासाठी. "गौरतलब है कि 20वें यूनेस्को अवॉर्ड्स में शाहरुख खान को उनके चैरिटी वर्क के लिए सम्मानित किया गया है। खास बात यह है कि इस अवॉर्ड को पाने वाले शाहरुख पहले भारतीय हैं। " https://navbharattimes.indiatimes.com/movie-masti/news-from-bollywood/-/championstrophy_articleshow/10814659.cms 1. Recently, Shah Rukh Khan’s Meer Foundation donated Rs. 12 lakhs to Government of Kerala's Chief Minister Distress Relief Fund in order to help the Kerala Flood victims. 2. In 2015, he reportedly donated a sum of Rs. 1 crore for the Chennai flood victims. 3. He also donated a sum of 25 lakhs to PM Manmohan Singh for Tsunami Relief camp. He was one of the celebrities who performed at Help Telethon Concert to raise money for tsunami victims. 4. Shah Rukh Khan’s team Kolkata Knight Riders (KKR) won the Indian Premium League (IPL) season 7. The King Khan donated the entire money (Rs. 15 crores) to cancer patients in Mumbai and Kolkata. अजून अनेक आहेत पण तुमच्यासारख्यासाठी एवढी पुरेशी आहेत. पूर्ण बातमी: https://www.indiatimes.com/entertainment/11-inspiring-acts-of-generosity-by-srk-which-prove-he-s-a-true-hero-in-every-sense-of-the-word-351619.html आणि महाराष्ट्रात राहून आमिर खान काय समाजकार्य करतो हे सांगावं लागत असेल तर धन्य आहात! त्यांनी मदत केली जरी असली तरी आपल्याला कळेलच असे काही आहे का? तरी बरं स्वतःच म्हणताय कि मदत करणे ज्याची त्याची इच्छा आहे...

In reply to by शब्दबम्बाळ

हे मी सगळं लिहणारच होतो. पण या वृत्तीना थोड्या गुदगुल्या केल्या तरी पुरेशा असतात. === शाहरुखच महिलांप्रती आदर कसा असावा, हे खरेच आत्मसात करण्यासारखी गोष्ट आहे. शारूखला ओळखणाऱ्या भारतातील बहुतांशी महिला माझ्या म्हणण्याला दुजोरा देऊ शकतील. कदाचित अतिशयोक्ती वाटत असेल!

In reply to by शब्दबम्बाळ

इकडे समर्थक (? सोर्री बाबा, लोकांना लगेच राग येतो आणि आम्हाला गुलाम ठरवून मोकळे होतात) शांतीप्रिय लोकांना झोडतात आणि त्यांचे "हे" राजपुत्राला मिठ्या काय मारतात, मागे थेट बिर्याणी खायलाच गेले शत्रुदेशात. लोक विसरणार नाहीत या गोष्टींना.! ते बिर्याणी खाऊन आले तेव्हा खूप गाजावाजा झाला होता कि पाकिस्तानचा प्रश्न चुटकीसरशी सुटणार म्हणून.! एक कडक अग्रलेख- https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-saudi-arabia-prince…

In reply to by विशुमित

कावळया च्या शापाने गाय मरते का ? त्याच प्रमाणे न खपणारे आणि एकांगी लिहाणाऱ्या पेपर चे लेख सामान्य मतदार वाचत नाहीच , त्यामुळे त्यांच्या पक्षपाती लेखामुळे भाजप ला काडिचा ही फरक पडणार नाही . मोदींची शरीफ भेट किंवा वाजपेयी नीं मसूद ला सोडण्या पाठिमागचे उद्देश आजच्या जनतेला चांगलेच समजतात त्यामुळे लोकसत्ता सारख्या प्लॉप पेपर ने बाहुल्या उगळत बसल्या दिवसेंदिवस लोकसत्ता चा खप कमी होणार हे निश्चित . TIO सुद्धा बऱ्यापैकी भाजप विरोध आवळत असतो , पण तरीसुद्धा गेल्या आठवड्यात त्यांनी '2019 मधील वाचकांचा कौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याचे ' छापले होते . त्यामुळे लोकसत्ता ची तुम्ही टाकलेली लिंक सरळ कचऱ्यात गेली आहे . जनमत काँग्रेस च्या विरोधात असल्या मुळे लोकसत्ता वाल्यानी तर वाचकांच्या प्रतिक्रिया छापने बंद केले आहे . फक्त मिपावर पिंका मारत बसण्या ऐवजी ट्विटर , ब्लॉग्स , ऑनलाइन न्यूज़पेपर वरील प्रतिक्रिया डोळे उघडून वाचा . तरी पण जनमत नाही समजले तर बिनधास्त पूर्वी सारखे अडाण्या चे सोंग घेवून फिरा आमची काही हरकत नाही !!!!!!! पाच वर्षा पूर्वी सगळी मीडिया मोदी विरोधात होती , पण तरी सुद्धा जनतेने काँग्रेस च्या विरोधात जावून भाजपला मताधिक्याने निवडून आणले होते . आता सुद्धा तीच परिस्थिति आहे .