मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

वामन देशमुख · · काथ्याकूट
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544813 वाचनखूण प्रतिक्रिया 783

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 20:43
मस्त बदनामी आणि फियर मॉंगरिंग करताय. सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेल; तर बिहार व उत्तरप्रदेशातल्या अनाथ बालिकागृहात मुलींवर अत्याचार करणाऱया ब्राह्मण-क्षत्रिय हिंदूंमुळे सगळेच हिंदू वाईट ठरतील ना?

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Sat, 02/16/2019 - 05:49
तुम्ही प्रकरण काय आहे हे वाचलेलं दिसत नाहीये. या लोकांनी त्या संपूर्ण काउंटीमधील एकही वय १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री सोडली नाही. लहान लहान मुलींना नादी लावून त्यांच्यावर वर्षानुवर्षे हजारो लोकांनी अत्याचार केले. त्या मुलींना ड्रग्सचे व्यसन लावून दिले. मी जे पुस्तक सांगितले आहे त्या मुलीने सगळं सविस्तर कथन केलंय. मला सांगतानाही कसं तरी होतंय.... १५ वर्षाची असताना तिच्या खोलीबाहेर लाईन लावून लोक उभे होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका दिवसात २५-३० लोकांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. अनाथाश्रमात असले प्रकार होतात हे मान्य आहेच पण तो त्या मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रकार जास्त आहे. हे घृणास्पद तर आहेच, पण वरील प्रकार म्हणजे केवळ "गोऱ्या" मुलींना लक्ष्य करणे हे कुठल्या प्रकारात मोडते? त्यापुढे जाऊन आपल्या इथे अनाथाश्रमात जे प्रकार होतात त्या अपराध्यांना शिक्षा तरी होते. रोशडेल प्रकरणात आधी तर पोलिसांनी दुर्लक्षच केले होते नंतर दबाव आल्यावर केस लढण्यासाठी म्हणून १ मिलियन पाउंड दिले? बोको हराम ने केलेले अत्याचार तुम्ही विसरलात काय? स्वतःच्या बायकापोरींना अगदी नखशिखांत काळ्या कपड्यात ठेवायचे. इतर धर्माच्या कोणी त्यांच्याकडे बघितलं तरी कत्तल करतात. मग दुसऱ्या धर्माच्या मुलींची तेवढीच इज्जत का करत नाहीत? भारतात फक्त हिंदू मुलींना लक्ष्य करण्यासाठी ग्रूमिंग कोण करत आहे हे जरा डोळे, कान, बुद्धी उघडी ठेवलीत तर कळेल. सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेल मी सरसकट सगळे मुसलमान असे आहेत असे कुठे म्हणले? पण हे प्रकार करणारे सर्व मुसलमानच होते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला फरक समजला तर ठीक नाही तर सोडून द्या.

In reply to by ट्रेड मार्क

Blackcat Sat, 02/16/2019 - 20:50
फारच गँभीर प्रकरण दिसते आहे, तुम्ही प्रकरण काय आहे हे वाचलेलं दिसत नाहीये. या लोकांनी त्या संपूर्ण काउंटीमधील एकही वय १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री सोडली नाही. काही घरात दोन पुरुष असतात , बाप व मुलगा , त्यांना घरातील स्त्री वाम मार्गावर आहे, हे समजले नाही ? काही घरात दोन स्त्रिया असतात , आई व मुलगी , तिथे एका स्त्रीला , आपल्यानन्तर दुसरीही शिकार होणार , हे थांबवता आले नाही ? भारतातही लव जिहादच्या तक्रारी असतात, मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ? आधुनिक नरकासुरच हे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 00:01
सुरुवात अगदी निरुपद्रवी वाटेल अश्या पद्धतीने होते. पौगंडावस्थेतल्या मुलींना फूस लावणे तसे सोपे असते. एकदा मुलगी जाळ्यात सापडली की मग धाक दाखवून, ब्लॅकमेल करून मुलीला वाटेल तसे वागवता येते. अश्या परिस्थितीत फसलेल्या मुली एकतर लाजेखातर वा भीतीमुळे आईवडिलांना लवकर सांगत नाहीत. जेव्हा सांगतात तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असू शकते. ब्लॅकमेल काय फक्त मुलींनाच करतात असं थोडीच आहे, आईवडिलांना पण करत असतीलच. ते पुस्तक लिहिलेल्या मुलीची परिस्थिती अशीच होती. आईवडील दोघेही कामानिमित्त बाहेर राहत असल्याने शाळेतून आल्यावर काहीतरी करावे म्हणून पेपर मध्ये आलेल्या एका जाहिरातीला उत्तर दिले आणि तिच्या आयुष्याची वाट लागली. नुसते बलात्कार, ड्रग्सच नव्हे तर या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी तिला तब्बल २० पेक्षा जास्त वर्षे लागली. मधल्या काळात आईवडिलांना कळले त्यांनी पोलीस कम्प्लेंट केली पण पोलिसांनी त्या मुलीलाच वेश्या ठरवले. या ग्रूमिंग गॅंगला हे समजल्यावर त्यांनी ब्लॅकमेल पासून सगळी दबावतंत्र वापरली. हे लोक एवढे धीट झाले की ते मनाला येईल तेव्हा त्या मुलीच्या घरी येऊ लागले. नाईलाजाने त्या मुलीच्या भावंडांवर परिणाम होऊ नये आईवडिलांनी तिला घरापासून लांब एक रूम घेऊन दिली. इतकी दुर्दशा होण्याचे कारण म्हणजे पोलीस किंवा इतर सरकारी आस्थापने त्यांना मदत करत नव्हती. कारण तिथे सगळीकडे या अपराध्यांचेच धर्मबंधू बसले होते. मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ? भारतात अगदी शिकलेल्या मुली, नट्या याच्या बळी आहेत. तसेच ग्रूमिंग गँग्स भारतातही जोरात आहेत. या मध्ये जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलांना इंग्लिश नीट बोलायला शिकवले जाते, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दिले जाते, चांगले कपडे, गाड्या, महागडे मोबाईल्स वगैरे पुरवले जातात. एरियातल्या हिंदू मुलींची लिस्ट त्यांच्या स्वभाव, आवडीनिवडी ई सकट तयार असते. कोणत्या मुलीला कोणी टारगेट करायचे हे पण ठरवले जाते. मग या मुलांना हिंदू वाटेल असे नाव दिले जाते, त्या नावाने त्यांची सोशल मेडिया अकाउंट्स उघडली जातात. एकदा मुलीने मैत्री केली की मग सहज म्हणून एकत्र फोटो काढले जातात. थोडेफार फोटोशॉप करून मग त्याचा वापर ब्लॅकमेल साठी करता येतो. सेक्युलॅरिझम हा सगळ्यात मोठा दोषी आहे. काही वेळा जरी मुलगा मुस्लिम आहे हे समजले तरी आम्ही धर्म, जातपात मानत नाही हे दाखवण्यासाठी मुली नातं पुढे नेतात. ती मुले सुद्धा आम्ही किती पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी मुलीने धर्म बदलायची गरज नाही वगैरे सांगतात. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की मग त्यांचे खरे स्वरूप दाखवतात. टीप: १००% मुसलमान असे आहेत किंवा हे असे करतात असे मला म्हणायचे नाहीये. पण हे असले प्रकार करणारे १००% लोक मुसलमान आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 03:04
शिवाय मुसलमानांना शिव्या देताना आपला हिंदू कर्मठ इतिहास सोयीस्करपणे विसरला जातो. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. आताही भारताची घटना जाळण्याची हिंमत केली जाते. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 06:46
तुम्ही कशाची कशाशी तुलना करताय हे पण तुम्हाला कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या इथे शतकभरापूर्वी गावांमध्ये जातिभेदांमुळे होत असलेल्या अत्याचारांची तुलना आत्ता एकविसाव्या शतकात इंग्लंडसाख्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांशी करताय. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात. इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 06:47
तुम्ही कशाची कशाशी तुलना करताय हे पण तुम्हाला कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या इथे शतकभरापूर्वी गावांमध्ये जातिभेदांमुळे होत असलेल्या अत्याचारांची तुलना आत्ता एकविसाव्या शतकात इंग्लंडसाख्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांशी करताय. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात. इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 07:56
परत तेच. हिंदू, ख्रिश्चॅनिटी व इतर धर्मांतही इतका धर्मांधळेपणा होताच; पण कालांतराने त्यात प्रगती झाली. तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल. लगेच हे लोक हे लोक म्हणून स्टिरियोटाईप करायची गरज नाही इतकाच मुद्दा आहे. इंग्लंडचं मला माहित नाही; पण भारतात इंग्लंडपेक्षा जास्त संख्येने मुसलमान अनेक शतकांपासून आहेत व स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 02/18/2019 - 00:19
तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल. भारतातील कुठल्या शाळेत/ कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही? पण हे लोक मुलांना मदरश्यात पाठवतात. वर मदरश्यांमध्ये गणित आणि शास्त्र शिकवायच्या प्रस्तावाला मुसलमानच विरोध करत आहेत. मदरश्यांमध्ये सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून फडणवीस सरकारने प्रयत्न केले तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून काय सांगितले बघा. "It is ill-designed and ill-timed, I don't know why they are doing it," said Kamal Farooqui of the All India Muslim Personal Law Board. अजूनही जर मुलांना फक्त एकच धर्म खरा आहे आणि इतर धर्म मानणारे लोक मारून टाकले पाहिजे असे शिकवले जात असेल तर या लोकांसमोर काय हात जोडून उभे राहणार? शांततेसाठी किती चर्चेच्या फेऱ्या झाल्या, किती प्रयत्न झाले? पण काय उपयोग झाला? जर तुम्ही सगळे मुसलमान आतंकवादी नाही असं म्हणताय तर आतंकवाद्यांना विरोध किती "चांगले" मुसलमान करतात? जे मुसलमान खरंच इतर धर्मांच्या लोकांना आदराने वागवतात त्यांना किती हिंदू त्रास देतात? स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही. म्हणजेच हे सिद्ध झालंय की हिंदुबहुल असलेल्या भारताने मुसलमानांना पण सामान संधी देऊ केल्या होत्या/ आहेत. पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी जाताजाता काय म्हणले हे आठवत असेलच. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे भारताचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. यांना किंवा हमीद अन्सारींना ही पदे देऊ नयेत म्हणून कुठल्या "कट्टर" हिंदूने काही केले का? कलाम साहेब राष्ट्रपती असताना पण जे अतिरेकी हल्ले झाले त्याबद्दल कोणी कलाम साहेबांचा धर्म काढून दूषणे दिली का? मुद्दा हा आहे की सामान्य मुसलमान जो पर्यंत स्वतःला या अतिरेक्यांपासून वेगळं का करत नाही? जर १००% अतिरेकी मुसलमान आहेत तर कुठला मुसलमान अतिरेकी आहे का नाही हे कसे कळणार? अगदी शिकलेले, सुस्थापित, चांगली सांपत्तिक स्थिती असणारे, मोठ्या शहरांमध्ये राहणारे मुसलमान जर कुठले तरी पुस्तक वाचून व व्हिडिओ बघून अतिरेकी बनत असतील तर मग फरक करणार कसा? जोपर्यंत चांगला मुसलमान योग्य बाजू घेत नाही तोपर्यंत ओल्याबरोबर सुके ही जळणार. माझ्या शेजारी बसून माझ्याबरोबर काम करणारी व्यक्ती जर अचानक लांडी पॅन्ट, स्कल कॅप घालू लागला, दिवसातून ५ वेळा अगदी मीटिंग अर्धवट सोडून नमाजाला जायला लागला, इस्लामच कसा चांगला यावर बोलू लागला तर मनात नक्कीच कुठेतरी संशयाची पाल चुकचुकेल.

In reply to by नगरीनिरंजन

तेजस आठवले Tue, 02/19/2019 - 22:27
नगरीनिरंजन साहेब, आपण मिपाचे जुने सदस्य आहात. धर्म आणि जात ह्यावर भरपूर चर्चा अनेक धाग्यांवर झालेली आहे. सध्याची चर्चा ही आत्ताच्या काळात घडणाऱ्या घटनांवर आहे, त्यामुळे जुने आणि ह्या विषयाशी संबंधित नसलेले विचार कृपया मांडले नाहीत तर ते योग्य राहील. हिंदू धर्म कर्मठ होता आणि थोडाफार अजूनही आहे, पण हा कर्मठपणा सक्तीचा नाही. कितीतरी मुसलमान इस्लामच्या कर्मठपणाला कंटाळलेले असू शकतील, पण हे बोलून दाखवण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे का आणि ते स्वातंत्र्य त्यांनी उपभोगले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपणाला माहित असेल अशी खात्री आहे.
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.
हे अगदी खरे आहे. पण जेव्हा हे चुकीचे आहे हे कळले तेव्हा कायदा करून समाजातल्या सर्व लोकांना संधी मिळतील हे पाहिले गेले,आणि नावापुरते का होईना तो कायदा पाळला जातो.(खऱ्या शोषितांना,वंचितांना डावलून बाकीचेच लोक आरक्षणाचा उपभोग घेतात हे त्यातले कटू सत्य आहे. जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याच्या बातम्या अनेकदा वृत्तपत्रात येत असतात.). समाजातला मोठा वर्ग म्हणजे बहुजन समाज तुम्ही म्हणताय त्याला आता शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत.काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर अन्याय झाला हे खरे. पण सवर्ण म्हणजे नक्की कोण?कुठल्याही एका जातीला इथे जबाबदार ठरवता येत नाही.समाजातल्या सगळ्या अन्यायाला ब्राह्मण जबाबदार आहेत हा प्रोपोगांडा ब्रिगेडने पसरवला आहे.शिक्षण हे आजच्या काळातले नसून त्या काळातले विचारात घ्या. ब्राह्मण सोडून इतरांना अध्ययनाचा अधिकार नव्हता. पण तेव्हा कारकुनी स्वरूपाच्या नोकऱ्या किती होत्या? लोहार लोहारकाम, चांभार चपला-चामड्याच्या वस्तू, न्हावी केस कापणे,शिंपी वस्त्रे विणणे, कुंभार मातीची भांडी घडवणे असे वंशंपरंपरागत व्यवसाय करत होतेच की.बलुतेदारी हीच होती ना.गावात प्रत्येक जातीतल्या, व्यवसायातल्या लोकांना एकमेकांची गरज तेव्हाही होती आणि आत्ताही काही प्रमाणात आहे.गावाचे पाटील, चौगुला, देशमुख ह्यातले किती ब्राह्मण होते?शेतीची कामे करायला कुळे असत, ती काय फक्त ब्राह्मणांकडेच का?खालची जात आपण म्हणताय पण पूर्वीच्या काळी कोठली जात कोणाला कसे वागवत असे ह्याबद्दल अजून माहिती मिळवा.रोटी बेटी व्यवहार कुठकुठल्या जातींमध्ये होत? शिंपी जात वस्त्रे विणत असे. आता जर खालच्या जातींना वस्त्रे नाकारली होती मग ती कोणी? ब्राह्मणांनी का मराठ्यांनी का शिंप्यांनी ,कोणी? प्रत्येक जात त्यांचे वंशपरंपरेने आलेले काम करत होती.न्हाव्याच्या मुलाला लोहारकाम किंवा सुताराला चपला बनवायला कुठले लिखित कायदे अडवत होते. मुस्लिम ब्रदरहूड ह्या संज्ञेअंतर्गत सगळे मुस्लिम समान आहेत आणि इस्लाम मध्ये भेदाभेद नाहीत असे म्हटले जाते. खरेच तसे आहे का?उदाहरणार्थ मुस्लिमांमधील लेबबाई ही जात मागास आहे आणि तिला घटनात्मकदृष्ट्या आरक्षण आहे.ऐकीव अनुभवानुसार देशोदेशीच्या मुसलमानांमध्ये फरक केला जातो. अरब हे स्वतःला मूळ मुसलमान मानतात तर पठाण आपण विशुद्ध मुसलमान असल्याचे म्हणतात. भेदाभेद तिकडेही आहेच.शिया काय सुन्नी काय अहमदिया, बोहरा काय भेद आहेतच की. आपण कृपया माझ्या प्रतिसादातील शिक्षण आणि त्या अनुषंगाने लिहिलेला भाग नजरेखालून घालावा हि विनंती.. http://www.misalpav.com/comment/977484#comment-977484

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 02:54
धर्मांध लोक अतिशय क्रूर आणि हलकट असतात आणि मुसलमानांमध्ये ते प्रमाण जास्त आहे हे मान्य आहे. युरोपमध्ये रिफ्युजी म्हणून गेलेले लोक मुसलमानबहुल देशातले असतात आणि तिथे त्यांचे पूर्ण ब्रेनवॉशिंग झालेले असते. बोको हरामसुद्धा कट्टर धर्मांध आहे. परंतू त्या लोकांना आणि भारतातल्या मुसलमानांना एकजिनसी मानून तिकजच्या लोकांच्या कृत्याबद्दल हिंदूबहुल देशात अवाजवी भीती पसरवून द्वेषाचे वातावरण निर्माण करून काहीही होणार नाहीय. राजकारणी लोक सत्तेसाठी करतात. सामान्य माणसाने करायचे काय कारण? उलट भारतातले मुस्लिम बरेच गरीब आणि निरक्षर आहेत शिक्षण आणि रोजगारीतूनच लोकसंख्येवर नियंत्रण आणले जाऊ शकते. असा द्वेष पसरवून आणि जिनोसाईड करुन पूर्ण देशाचे नुकसान होते. अडाणी व स्वार्थांध नेत्यांना हे समजून घ्यायची गरज वाटत नाही; पण शिकलेल्या जनतेला तरी कळायला हवे.

In reply to by ट्रेड मार्क

ट्रम्प गुरुवार, 02/14/2019 - 09:58
एकंदर सगळाच प्रकार भयानक आहे !! आपण पाहुने आहोत हे माहित असताना देखील पाकिस्तानी मुस्लिम ब्रिटन मधील महिला / मुलींना वेशाव्यववसाया मध्ये ढकलन्याचे धाडस कसे क़ाय करु शकतात ? इंग्लैंड मध्ये ' त्या' धर्मियांची वाढती संख्या पाहता फ़्रांस प्रमाणे इंग्लैड मध्ये ही दहशत वादी हल्ल्यांचे प्रमाण वाढू शकते . माझ्या माहिती प्रमाणे इंग्लैंड मध्ये त्यांच्या वस्तीवर आणि धार्मिक स्थळावर सतत 24 तास नजर ठेवली जाते . भारतातही लव्ह जिहाद अस्तित्वात नाही असे म्हणणारे तथाकथित , ढोंगी , पुरोगामी शांततप्रिय लोक मिपावर सुद्धा आहे बर का !!! आणि हेच ढोंगी पुरोगामी लोक विषयानुसार सतत मिपावरिल इतर लोकांना खिजवत असतात . याचा अर्थ एकच आहे की ते स्वतः ' जगभरातील बदनाम शांततप्रिय धर्मीय आहेत ' किंवा त्यांचे गुलाम आहेत .

In reply to by ट्रम्प

डँबिस००७ गुरुवार, 02/14/2019 - 14:30
ईंग्लडची राज्यव्यवस्था पुर्णपणे कोलमडायच्या स्थितीत आलेली आहे. एकेकाळी जगावर राज्य करणार्या ह्या देशावर आज ३०% पाकिस्तानातले मुस्लिम लोक निवडुन गेलेले आहेत व आता राज्य करत आहेत. थोड्याच दिवसात तिथे शरीया लागु केला तर आश्चर्य वाटु नये. लॉ ऑफ कर्मा !!

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/14/2019 - 13:37
राफेल प्रकरण काही शांत होत नाही. कॅगचा रिपोर्ट तर आला पण त्यात आकडेवारी नाही. ह्या आधी जेव्हा नेव्ही/वायुदलकडून अशी मोठी खरेदी होत होती तेव्हा कॅगने रेपोर्ट मध्ये आकडेवारी दिली होती. ! https://www.youtube.com/watch?v=8RABu0FH23I&t=306s मोदी फ्रांसला जातात त्याआधी अनिल अंबानीही पॅरिसला पोचतो व काही बोलणी करतो.. योगायोग मानायचा?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डँबिस००७ गुरुवार, 02/14/2019 - 14:25
माईसाहेब, तुम्ही असे प्रश्न विचारला तर आम्ही तसे प्रश्न विचारु ! जसे की डोकलाम मध्ये न भारत विरुद्ध चीन लष्कर समोरासमोर असताना , राहुल गांधी व टिम चीन राजदुताला गुपचुप भेटायला जाते ! या भेटीच प्रयोजन विचारल तर भेटलेच नाही म्हणुन खोटच सांगतो ! पुरावे दाखवल्यावर भेट झाली अस पण भेटीच्या वेळेला काय चर्चील गे ल ते आज पर्यंत सांगीतल नाही !!

प्रसाद_१९८२ गुरुवार, 02/14/2019 - 19:42
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ३० जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट केला. यात सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. -- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/terrorists-have-attacked-a-crpf-convoy-in-jammu-and-kashmirs-pulwama/articleshow/67992498.cms

In reply to by प्रसाद_१९८२

गामा पैलवान गुरुवार, 02/14/2019 - 21:26
आजूनेक २६/११ झालं तर बलुचिस्तान वेगळा होईल अशा अर्थाचं वक्तव्यं अजित दोभाल यांनी केल्याचं ऐकून होतो. म्हणून जालावर शोध घेतला. तर ते सापडलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=150 पण इथे तर ते जरतरच्या भाषेत बोलतांना दिसतात. जवानांचं बलिदान व्यर्थ न जावो, इतकंच! :-( -गा.पै.

In reply to by प्रसाद_१९८२

ट्रम्प गुरुवार, 02/14/2019 - 22:29
अवघड आहे !! खूपच वाइट घटना घडली आहे , अतेरिकी च्या भेकड हल्ल्यात मरण यावे हे सैनिकांसाठी दुर्दैवी असते . सुरजेवाला ने यात सुद्धा राजकारण सुरु केले आहे . " या दुर्दैवी क्षणी काँग्रेस पक्ष सैनिकां बरोबर , भाजप च्या पाठी उभा आहे असे " जर म्हणाले असते तर काँग्रेस ची उंची नक्कीच वाढली असती .

In reply to by प्रसाद_१९८२

बाप्पू गुरुवार, 02/14/2019 - 22:39
खूप दुःखद घटना. सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली. हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद नावाच्या शांतता प्रेमी लोकांच्या संघटनेने घेतली आहे.

डँबिस००७ Fri, 02/15/2019 - 11:59
खूप दुःखद घटना. सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली Terrorism has no religion हे परत एकदा सिद्ध झाले !! कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने दिलेली प्रतिक्रिया त्यांची सडलेली मानसिकता दाखवते !! पाकिस्तान टिव्ही वर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी अश्या घटनेची पुनरावृृृत्ती व्हावी अशी कामना करताना आढळले !!

In reply to by डँबिस००७

बाप्पू Fri, 02/15/2019 - 15:58
Terrorism has no religion हे परत एकदा सिद्ध झाले !! हे वाक्य जोपर्यंत भुतलावर आहे आणि यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत तोवर असेच हल्ले होत राहणार. बाकी चालुद्या... !!

In reply to by बाप्पू

जेसीना Fri, 02/15/2019 - 16:27
एक काम करायला पाहिजे ... जेव्हडे आतंकवादी मरतात ना , मेलेल्यास डुकराबरोबर गाडायला पाहिजे ... मग समजेल Terrorism has no religion हे किती खरा ते

डँबिस००७ Fri, 02/15/2019 - 17:07
पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे ! पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!

डँबिस००७ Fri, 02/15/2019 - 17:07
पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे ! पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!

ट्रम्प Fri, 02/15/2019 - 17:41
या सैनिकां ऐवजी 40 दगड फेकणारे मारले गेले असते तर अवार्ड वापसी , वामपंथी , पुरोगामी , मानवाधिकार , नासिररूद्दीन , आमिर खान असेच गप्प बसले असते का ? ट्विटर वर मृत्यु पावलेल्या सैनिकांची लिस्ट पाहुन पाकिस्तानी मुस्लिम नां उकळ्या फुटल्या आहेत , कारण त्यात एक ही मुस्लिम नाहीये !!!!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Fri, 02/15/2019 - 22:24
मृत्यु पावलेल्या सैनिकां बद्दल सांत्वनापर दोन शब्द लिहले असते तर तुझी बोटे झिजली असती का रे ? !!! मी पाकिस्तानी नां आनंद झाला असे म्हणालो तर त्या डूक्कर पाकिस्तान बद्दल तू का प्रेम व्यक्त करतोस ? त्यांच्याशी तुझे काही नाते संबध आहेत का ? काल तो सुरजेवाला पत्रकार परिषदेत दुःख व्यक्त करायचे सोडून भाजप वर हल्ला करत होता त्या सुरजेवाला च्या गैंग मध्ये आहेस का तू ? त्याची आणि तुझी वैचारिक पातळी सारखी च वाटतेय रे !!!!! कालच्या हल्ल्याने झालेला आनंद तू लपवू न शकल्या मुळे मिपावरिल एका देशद्रोही ची खात्री पटली !!! सर्व जातिधर्मातील नागरिक भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ एकत्र आलेले असतना आज अलीगढ़ यूनिवर्सिटी मधील एका देशद्रोही ने अज़हर मसूद चे अभिनंदन केले . त्याच प्रमाणे तू फक्त मिपावर अजहर मसूद चे अभिनंदन करून दाखव !!!!!

In reply to by ट्रम्प

विशुमित Fri, 02/15/2019 - 22:54
तात्या शांत व्हा! शांत व्हा! भावनांना आवर घाला. सगळेच जवानांच्या परिवाराच्या दुखामधे सामील आहेत. देशभक्ती हा फक्त भाजपचाच ट्रेड मार्क नाही आहे. === अफवा अणि जातीय तेढ निर्माण होईन असे काही करायच टाळा. स्वत बरोबर संपादक मंडळी अणि मिपाला देखील गोत्यात आणाल. पोलीस आंतरिक सलोखा राखावा/ रहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. कृपया त्यांना सहकार्य करा. आवरा स्वतला. डोळे पुसा. रडायचं नाही आता आपल्याला लढायच आहे. === संपादक मंडळ आम्ही तर करत आहोतच कृपया तुम्ही देखील ट्रंप यांचे सांत्वन करा.

In reply to by विशुमित

ट्रम्प Fri, 02/15/2019 - 23:13
कशाला उगिचच संपादकनां तरास देताय !! त्ये कुठल्या बी इशयावर तिर्कच बॉलतय , म्हणून जरा डॉस्क तापल व्हत . त्ये तेवढ पुलिसांच बघा बरका , रागाच्या भरात बोलून ग्येलो म्या बी पण आता जरा कन्ट्रोल करिन . आम्ही क़ाय तुमच्या शब्दाबाहेर न्हाय , न्हाय तर काय व्हायच की तुमचे आयटी सेल वाले लागायचे माग !!!!!

In reply to by ट्रम्प

Blackcat Sun, 02/17/2019 - 08:12
त्या अझर मसूदला बाजपेयीं , अडवाणी अन डोवालने सोडले ना ? आणि अभिनन्दन मला करायला सांगतोस ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Sun, 02/17/2019 - 10:30
त्या गतकाळातील अजहर ला सोडलेल्या घटने बद्दल आज पर्यंत काँग्रेस ने वाजपेयीनां दोषी धरलेले नाही !!! मग तू का तुझी अक्कल पाजळत आहेस ? पुलवामा च्या घटने चे गांभीर्य जांणवण्या इतपत सुद्धा संवेदनशीलता नाही का तुझ्याकडे ? पुलवामा च्या दुर्दैवी घटनेत सवेंदनशीलता न दाखवणारेच आत गेले आहेत आणि या दुर्दैवी घटने च्या वेळी सुद्धा तुझे विखारी विचार मांडत आहे म्हणून ' अजहर चे समर्थन करून दाखव ' बोललो होतो . पुलवामा घटनेवरुन खालच्या पातळीवर येवून विचार व्यक्त करणाऱ्या तुझ्या सारख्या उलटया कलिजा चा निषेध करण्याचे सोडून '' मिपा संपादका नां त्रास होईल ना !!! संपादक तुम्हीच यांना समजवा " असे बोलणारे महाभाग इथे आहेत याचे आश्चर्य वाटते .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/17/2019 - 10:50
अहो मोदी, संरक्षण मंत्री ( कोण आहेत आता??), दोवल, रॉ अणि संबंधित सरकारी एजेन्सीज़ची बेजबाबदारी कशी झाकता येईल फक्त यासाठीच तुमचा आटापिटा चालू आहे, हे आता लपता लपवू शकत नाही आहात. घटना कशी रोखू शकली गेली असती याबाबत चर्चा अपेक्षित होती. === बाकी संपादक मंडळाने योग्य वेळी तुमचे कान टोचले आहेत. पण आपण थोडीच सुधारणार आहात. असो...!!

In reply to by विशुमित

ट्रम्प Sun, 02/17/2019 - 11:47
ठिक आहे !! बर झाले विषय तुम्हीच काढला आहे !!! तर कसाब टीम ने मुंबई त केलेल्या हल्ल्यात सामान्य माणूस देशोधड़ीला लागला असताना बाईट देण्या साठी सतत कपड़े बदलण्याचे गांभीर्य पाळणारे गृहमंत्री आणि ' ऐसी छोटी ! छोटी ! बातें होती रहती है ' वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री च्या कार्यकर्त्या ने जबाबदारी निश्चिती ची अटापीटा बेजबाबदार काळ्यामावु च्या बरोबर करावा ? हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार. ' पुढील हल्ले कसे रोखता येतील ' या विषयावर तुम्ही तुमचे अगाध विचार तुमच्या नेत्यांसामोर का नाही मांडले ? काँग्रेस च्या काळात इतके दहशतवादी हल्ले झाले नसते ! ======================= बाकी संपादकानीं तुमचे कान कित्तेक वेळा कातरले पण तुमच्या वागण्यात सुधारना झालेली नाही .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/17/2019 - 13:08
1.ठिक आहे !! ==)) धन्यवाद कोणासाठी एवढा आटापिटा चालू आहे मान्य तरी केले. 2. ऐसी छोटी ! छोटी ! बातें होती रहती है ' वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री च्या कार्यकर्त्या ने ==)) हिंदीभाषा बोलण्याची सवय नसल्या कारणाने ती 'Slip of the tongue ' होती, हे कोणीही सुज्ञ माणूस सांगू शकेल. कार्यकर्ता?? आम्ही भक्त ही नाही अन् कार्यकर्ते ही नाही आहोत. आमचा प्रपंच चांगला चालू आहे. 3. हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार. ==)) वाक्य रचनेचे प्रयोजन नाही समजले. 4. पुढील हल्ले कसे रोखता येतील ' या विषयावर तुम्ही तुमचे अगाध विचार तुमच्या नेत्यांसामोर का नाही मांडले ? ==)) हे काम माझे नाही ना. ज्यांचे आहे ते राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सर्वपक्षीय बैठक सोडून उद्घाटनं करायला झोला घेऊन फिरत आहेत. 5. बाकी संपादकानीं तुमचे कान कित्तेक वेळा कातरले पण तुमच्या वागण्यात सुधारना झालेली नाही ==)) त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. सुधारणा ही continuous process आहे. असो...!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 11:12
मोगा खान अर्धवट माहिती प्रसारित करून दिशाभूल करणे हि सवय सोडून द्या आता १८७ लोकांच्या (१७३ प्रवासी अधिक १५ विमान कर्मचारी-- त्यापैकी एका प्रवाश्याला त्यांनी विमानातच ठार मारले तो सोडून) जीवाचा प्रश्न होता. त्या प्रवाश्यात जर "आपले नातेवाईक" असते तर जर मसूदला सोडूच नका असे आपण म्हणाला असता का? अपहरणात सामील असलेले १० पैकी ७ लोक पळून गेले परंतु तीन लोकांना पकडून जन्मठेप दिलेली आहे हे आपल्यास माहिती आहे का? जिथे तिथे पच पच करण्याची सवय सोडून द्या.

In reply to by अर्वाच्य

सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 20:06
मोसाद सारखे ओप्रेशन करायला काय हरकत होती? आपल्या जवानांवर विश्वास नव्हता? आपली बालबुद्धी आहे कि आपल्याला खरंच हे सोपं आहे असं वाटतंय? एकदा श्री बोका ए आझम यांची मोसाद हि मालिका वाचून घ्या. https://www.history.com/this-day-in-history/hostage-rescue-mission-ends-in-disaster https://en.wikipedia.org/wiki/2011_Afghanistan_Boeing_Chinook_shootdown इस्रायली राजकारणी आणि भारतीय राजकारणी यात किती फरक आहे ते एकदा वाचून पहा. https://www.dailyo.in/politics/morarji-desai-kargil-war-pervez-musharraf-pakistan-raw-kahuta-nuclear-warfare/story/1/3802.html https://www.indiatvnews.com/news/india/know-how-morarji-desai-botched-up-raw-s-most-daring-plan-operat-31481.html/page/6

In reply to by अर्वाच्य

अर्वाच्य गुरुवार, 02/21/2019 - 15:08
कंदाहारच्या वेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान वाजपेयीच होते ना? कबूल करा त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांच्यात कुवत नव्हती.

In reply to by अर्वाच्य

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 19:39
तुमची आमची काय लायकी आहे त्यांची कुवत काढायची? पोखरण २ चा निर्णय त्यांचाच होता ना?

In reply to by ट्रम्प

आजानुकर्ण Fri, 02/15/2019 - 20:15
अरे हलकट माणसा, इथे यादी बघ. https://www.indiatoday.in/india/story/pulwama-terror-attack-complete-list-martyred-crpf-jawans-1456836-2019-02-15 नाहीतर तिकडे काश्मीरमध्ये जा आणि सैनिकांच्या चड्ड्या काढून तपास. पण तुझी गटारगंगा किमान आज बंद ठेव.

In reply to by ट्रम्प

शब्दबम्बाळ Fri, 02/15/2019 - 21:13
अरे सुशिक्षित अडाण्या, तुझ्यासारख्या ट्रोल्सनी मिपाची पार पातळी खाली आणून ठेवलीये. आता असल्या धाग्यावर यावंसं पण वाटत नाही. किती नीचपणा कराल, बॉलीवूड मधल्या बहुतेक जणांनी निषेध केला आहे हल्ल्याचा... याविषयावर तरी घाण करू नका! असले लोक तिकडे फेबुवर "प्रियांका गांधी शहिदांच्या मृत्युवरती हसली" अश्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. किती खाली जाल अजून? भडकून प्रतिक्रिया देऊन काही उपयोग होणार नाहीये. एक व्हिडीओ देत आहे सगळे मुद्दे पटतील/नाही पटतील पण निदान विचार तरी करा.

Chandu Fri, 02/15/2019 - 18:56
भारतिय सैन्यात सैनिकाना धर्म नसतो.हुतात्मा झालेल्या सैनिकांचा धर्म काढून कृपया चर्चा भलतीकडे वळवू नका.ही कळकळीची विनन्ती.

संपादक मंडळ Fri, 02/15/2019 - 23:19
महत्वाची सूचना :

आपला देश सद्या एका कठीण भावनिक पर्वातून जात आहे. सर्वच भारतियांचा भावनावेग अनावर झालेला आहे. या परिक्षेच्या घडीला, सर्व मिपाकरानी, आपापल्या मत-मतांतरांना बाजूला ठेवून, भारताच्या शत्रूविरुद्धची आपली एकजूट डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या लिखाणावर ताबा ठेवणेच योग्य होईल. आपल्या मत-मतांतरांवर आधारीत वादविवाद करण्याचा आपला लोकशाही हक्क गाजविण्यासाठी हा काळ योग्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.

अन्यथा, भारताच्या शत्रूंचा, भारतियांमध्ये फूट पाडण्याचा उद्येश, यशस्वी करण्यात हातभार लावल्यासारखे होईल.

नगरीनिरंजन Fri, 02/15/2019 - 23:23
राजकारण म्हणून नाही; पण बीजेपी समर्थकांची पातळी सगळ्यांनी पाहिली आहेच. शिवाय मुंबईत सनातनच्या कार्यकर्त्यांकडे व भाजपच्या नगरसेवकाकडे शस्त्रे सापडली आहेत. कृपया सर्वांनी काळजी घ्या. (संपादित) निवडणुका संपेपर्यंत कोणत्याही द्वेषजनक बातमीवर विश्वास ठेवू नये हे आपापल्या सामाजिक वर्तुळात जास्तीत जास्त लोकांना सांगायला हवे.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रम्प Sat, 02/16/2019 - 06:25
संपादक मंडळ च्या आवाहना नंतर सुद्धा ढुसकी मारलीच का ? !!!! हिंसाचार वरुन काँग्रेस समर्थकानी 1984 मध्ये केलेली सिखसेवा आठवली . सध्या इथेच अल्पविराम .

In reply to by ट्रम्प

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 03:09
आम्ही काँग्रेस समर्थक नाही. बीजेपी किंवा काँग्रेस, आमच्याबरोबर किंवा आमच्याविरुद्ध अशी बायनरी विचारसरणी आमची नाही.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Sat, 02/16/2019 - 09:37
(संपादित) कोणताही "ठोस" पुरावा नसताना
"या वेळेस"
असे विधान केल्याबद्दल आपला त्रिवार निषेध द्वेषामुळे आपली "वैचारिक पातळी" किती खाली घसरली आहे ते समजून येते आहे.

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 03:18
विकास केल्याचाही कोणताही ठोस पुरावा नसताना शांघाय व कोलंबियाचे फोटो गुजरातचे म्हणून व्हॉट्सॅपवर पसरवून सत्ता मिळवली ना? २६/११ चा हल्ला सुरु असताना मुंबईत येऊन गोंधळ घातलाच ना? त्या शौर्याचाही काही ठोस पुरावा नाही. स्वतः नेतेमंडळी प्रचाराला लागलीसुद्धा आणि लोकांनी कशाला मौन बाळगायचे? पण सगळे भाजपातले महत्त्वाचे नेते सोडून अगदी गडकरी व यशवंत सिन्हांसारखे विद्वान व कार्यक्षम लोक सोडून लोक मोदी मोदी का करायला लागण्यामागे काय भावना आहे सगळ्यांना कळते आणि अशा गोष्टी कागदोपत्री कधी सिद्ध होत नसतात. आणि हो तुमच्या द्वेषाच्या राजकारणाला उत्तर द्यायला इतकी वैचारिक पातळी सोडून खाली यावेच लागते. इत्यलम्.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Mon, 02/18/2019 - 09:08
वैचारिक पातळी सोडून खाली यावेच लागते. हे बरोबर आपले वाक्य "संपादित" करावे लागले याचा अर्थ स्पष्ट आहे. पराकोटीचा द्वेष कसा असतो ते दाखवलेत. अन तुम्ही तुमची पातळी दाखवून दिलीत हे बरे केलेत.

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Sun, 02/24/2019 - 13:33
पराकोटीचा द्वेष कोण करतंय ते दिसतंच आहे. परधर्मीयांनाच नव्हे तर ह्या फॅसिस्ट राजवटीला प्रश्न विचारणाऱया कोणालाही देशद्रोही ठरवणारे द्वेषाचे राजकारण करणारे नाकाने कांदे सोलत आहेत. ज्यावर कोणी सरकारी अधिकारी सही करायला तयार झाला नाही अशी खोटी माहिती न्यायालयाला पुरवणारे पुराव्याच्या गप्पा करताहेत. न्यायालयाच्या अवमानाबद्दल ज्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱयाला न्यायालायात शाळकरी पोरासारखं कोपऱयात बसावं लागलं व ज्यांच्या उद्योजक मित्राला चार आठवड्यात पैसे भरले नाही तर तुरुंगात टाकू अशी न्यायालायाची तंबी मिळाली ते तोंडावर पडले तरी टांग वर करून फिरताहेत. तुमच्याइतका द्वेष करणे खरंच शक्य नाही. हरलो मी.

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Sun, 02/24/2019 - 13:36
स्वत:चा प्रतिसादसुद्धा संपादित झाला ते सोयीस्करपणे विसरून दुसऱयाला त्यावरून बोलण्याचा निगरगट्टपणा करणे फक्त तुम्हालाच शक्य आहे.

In reply to by नगरीनिरंजन

सुबोध खरे Mon, 02/25/2019 - 10:04
माझ्या प्रतिसादातील आपलेच वाक्य फक्त संपादित झालंय का आता संतापामुळे समोर असलेली गोष्ट पण दिसेनाशी झाली आहे? शान्त व्हा!

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन Wed, 02/27/2019 - 02:57
त्यात काहीही अर्वाच्य नव्हते. पण सद्यपरिस्थितीत सत्य बोलण्याची मुभा नसल्याने ते वगळले. त्यात पुराव्याचाही काही संबंध नव्ह्ता कारण कोणी ते केलं त्यावर काहीही भाष्य नव्हते. फक्त फायदा कोणाला झाला ते लिहीलं होतं. संपादकांनी ते का वगळले ते त्यांनाच माहित.

In reply to by नगरीनिरंजन

महेश हतोळकर Wed, 02/27/2019 - 09:36
डॉक्टरांचा प्रतिसाद संपादित झाला तर त्यांना लाज वाटली पाहिजे पण ते वाक्य तुमचच होतं हे समोर आल्यावर संपादक मंडळाचा पक्षपातीपणा. जन्मतःच दुटप्पी आहात की काही कोर्स वगैरे केलाय?

In reply to by महेश हतोळकर

सुबोध खरे Wed, 02/27/2019 - 10:44
अति संतापामुळे स्वतःचा सर्वनाश कसा होतो याबद्दल एक पंचतंत्रातील गोष्ट आठवते. एकदा एका सापाच्या डोक्यावर गांधीलमाशी बसली. आपल्या डोक्यावर माशी बसली यामुळे सापाचा अहं दुखावला गेला आणि त्याने हरप्रकारे माशीला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. साप रागाने अगदी वेडापिसा झाला आणि रागाच्या भरात त्याने येणाऱ्या बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके घातले. माशी तर उडून गेली पण सापाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अति राग किंवा अतिद्वेष हा असा वाईट असतो.

In reply to by सुबोध खरे

नगरीनिरंजन गुरुवार, 02/28/2019 - 07:29
=)) मस्त गोष्ट! स्वत:चा द्वेष उघडा पडतोय त्याचं काहीच नाही; पण दुसऱयाचं वाकून पाहायचं. द्वेष करणाऱया व द्वेष पसरवणार्‍या माणसाचा मी द्वेष करतो यात मला काही लाज नाही; उलट अभिमान आहे. तुमची तडफडही मी समजू शकतो.

In reply to by महेश हतोळकर

नगरीनिरंजन गुरुवार, 02/28/2019 - 08:06
मराठी वाचता येतं ना? प्रतिसाद संपादित झाल्याबद्दल लाज वाटली पाहिजे हे मी कुठं लिहिलंय? डॉक्टरसाहेबांनी मला त्यावरुन टोमणा मारला म्हणजे ती गोष्ट वाईट आहे असं त्यांनाच वाटतंय बहुतेक. आणि माझे मत संपादकांच्या मताहून वेगळे आहे. त्यांनी का ते वाक्य वगळले ते त्यांनाच माहित असे म्हणणे म्हणजे पक्षपाताचा आरोप होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे नाक खुपसायचे कारण नाही. माझा प्रतिसाद संपादित होण्याची ही पहिली वेळ नाहीय. प्रतिसाद उअडवतील ह्या भीतीने खरं ते बोलणं टाळणार्‍यांतला मी नाही. जे केलं ते केलं असं छातीठोकपणे म्हणण्याची ज्यांची छाती होत नाही ते छप्पन्न इंची वेगळे. =))

In reply to by नगरीनिरंजन

महेश हतोळकर गुरुवार, 02/28/2019 - 09:21
निगरगट्टपणा आणि निर्लज्जपणा हे माझ्या अल्पज्ञानानुसार (मराठीच्या) समानार्थी शब्द आहेत. प्रतिसाद संपादित होऊनही डॉक्टरांनी निगरगट्टपणा म्हणजेच निर्लज्जपणा दाखवला. अर्थात त्यांना लाज वाटली नाही. संपादित वाक्य तुमचे होते. मग त्यांना का लाज वाटावी? दुसरं म्हणजे तुमचं वाक्य संपादित झाल्यावर "त्यांनी का ते वाक्य वगळले ते त्यांनाच माहित" ही आदळआपट केली पण डॉक्टरांचा प्रतिसाद झाल्यावर त्यांना उपदेशाचे डोस पाजताहात. यालाच दुटप्पीपणा म्हणतात (मराठीत).
माझा प्रतिसाद संपादित होण्याची ही पहिली वेळ नाहीय. प्रतिसाद उडवतील ह्या भीतीने खरं ते बोलणं टाळणार्‍यांतला मी नाही.
उगाच फालतू victim card खेळू नका. मी इथे १२ वर्षांपासून वावरतोय, कधीही कोणालाही सभ्य भाषेत कोणताही विचार मांडला म्हणून संपादक मंडळाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे नाक खुपसायचे कारण नाही.
हे सार्वजनिक संस्थळ आहे. मला वाटलं मी बोललो. तुम्हाला दुर्लक्ष करण्याचा अधिकार आहे. जसं तुम्ही अर्थव्यवस्थेवर पिंक टाकताना केलं.

In reply to by महेश हतोळकर

नगरीनिरंजन Fri, 03/01/2019 - 11:54
झाली का मग तुमची पिंक टाकून? कोणतं वाक्य संपादित झालं हे तुम्हाला माहित आहे का? ते वाक्य संपादित होण्याचे कोणतेही कारण दिले गेले नाही. त्यात ना कोणावर वैयक्तिक आरोप होते ना इथल्या कोणावर पातळी सोडून टिप्पणी होती. त्यात फक्त कोणत्यातरी गोष्टीचा कोणालातरी फायदा झाला इतकेच लिहीले होते. ते वाक्य संपादित करण्याची वेळ आली यावरुन या देशात कसे वातावरण आहे हेच सिद्ध होते. शिवाय नंतर वाचणार्‍यांना ते वाक्य दिसणार नाही या गोष्टीचा फायदा घेऊन डॉ. साहेबांनी त्यावरुन टोमणा मारला; म्हणजे जो कोणी नंतर ही चर्चा वाचेल त्याला वाटेल की मी शिविगाळ केली. म्हणूनच मी खुलासा व्हावा म्हणून नंतरचा प्रतिसाद लिहीला. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे कारण मला अजूनही कळले नाहीय. पण असो. तुम्हाला अधिकार आहेच इथे लिहायचा; पण मी आधीपासूनच दुटप्पी आहे का वगैरे मूर्खासारखे प्रश्न मला थेट विचारु नका. तुम्हाला काय समजायचंय ते समजा. माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्‍या व्यक्तीची बाजू घेऊन वर दुसर्‍याला द्वेष करतो असे म्हणणारे खरे दुटप्पी. दुसरं म्हणजे मी काही व्हिक्टीम नाही. सार्वजनिक रित्या रडण्या-गागण्याची नाटकं करायला मी काही कोणाचा प्रिय नेता नाही. शिवाय मिपावर कोणी चरितार्थासाठी लिहीत नाही त्यामुळे व्हिक्टीमकार्ड वापरण्याचा प्रश्नच येत नाही. उलट हे नुकसान सार्वजनिक आहे. (*पुरावा मागणार म्हणूनः:https://www.thehindu.com/news/national/decision-to-bring-godhra-victims-bodies-taken-at-top-level/article2876244.ece)

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 02/18/2019 - 09:33
विकास केल्याचाही कोणताही ठोस पुरावा नसताना शांघाय व कोलंबियाचे फोटो गुजरातचे म्हणून व्हॉट्सॅपवर पसरवून सत्ता मिळवली ना? हे म्हणताय त्याचा काही पुरावा? तुम्ही स्वतः गुजराथला गेलात का? शांघाय आणि कोलंबियाचे फोटो कोणी व्हाट्सअप वर पसरवले? जर मोदींनी चांगले काम केले नव्हते तर गुजराथच्या लोकांनी त्यांना सलग ३ वेळा मुख्यमंत्री म्हणून कसं काय निवडून दिलं? २६/११ चा हल्ला सुरु असताना मुंबईत येऊन गोंधळ घातलाच ना? कोणी कसला गोंधळ घातला? जरा संदर्भ पुरावे आणि उदाहरणे देऊन आपले मत मांडावे. पण सगळे भाजपातले महत्त्वाचे नेते सोडून अगदी गडकरी व यशवंत सिन्हांसारखे विद्वान व कार्यक्षम लोक सोडून लोक मोदी मोदी का करायला लागण्यामागे काय भावना आहे सगळ्यांना कळते आणि अशा गोष्टी कागदोपत्री कधी सिद्ध होत नसतात. कोणाला किती महत्व द्यायचे हा भाजपचा अंतर्गत मामला आहे ना? २०१४ च्या निवडणूक सुद्धा मोदीना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करूनच लढल्या गेल्या. असे असूनही लोकांनी बहुमताने निवडून दिले. आता तुम्ही निवडणुकीवर आणि पर्यायाने लोकांच्या मतदानावरच प्रश्न उभा करताय. तरी बरं काँग्रेसमध्ये जसे गांधी आडनावामुळे पप्पुलाही पंप्र म्हणून प्रोजेक्ट केले जाते तसे भाजपात होत नाहीये. उद्या मोदी नाही चालले तर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील. पण काँग्रेसमध्ये मात्र पप्पू नंतर आता प्रियांका आली. काय तर म्हणे तिचं नाक आजीसारखं आहे. बाकी द्वेष वगैरे म्हणताय तर मोदींचे मुसलमानांप्रती द्वेष जाहीर करणारे भाषण दाखवा बघू. ओवैसी जसे १५ मिनिटांसाठी पोलीस काढा आणि आम्ही सगळे हिंदू कापून काढू म्हणाला तसे किंवा काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद म्हणतात किंवा भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे असे डिस्क्रिमिनेशन करणारे वक्तव्य करतात तसे मोदींनी काय काय म्हणले आहे याची यादी इथेच या धाग्यावर पुराव्यांसहित द्या. स्वीकारताय हे आव्हान?

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे Mon, 02/18/2019 - 09:37
ते असं कोणतंही आव्हान स्वीकारणार नाहीत. त्यांचे बहुसंख्य प्रतिसाद हे मोदीद्वेष आणि हिंदुद्वेषातून आलेले आहेत त्यामुळे त्यांना पुरोगामी लोकांसारखे पुरावे देण्याची गरज पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

ट्रेड मार्क Tue, 02/19/2019 - 00:04
त्यांना मुद्देसूद प्रतिसाद देता येत नाहीत हे माहित आहेच. पण प्रयत्न तरी करतात का हे बघू. आपण कितीही समजावून सांगितलं तरी किती कळेल हा पण अजून एक प्रश्न आहे. पण प्रतिसाद केवळ तेच वाचत नसून इतरही वाचतील म्हणून हा प्रतिसादप्रपंच करायचा.

In reply to by ट्रेड मार्क

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 13:21
काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद म्हणतात किंवा भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे असे डिस्क्रिमिनेशन करणारे वक्तव्य करतात {{ हे शब्द जसेच्या तसे म्हटले आहेत किंवा म्हणत आहेत त्याचा एखादा अधिकृत पुरावा देता येईल का?

In reply to by अर्वाच्य

गब्रिएल Wed, 02/20/2019 - 13:35
हायला, जगझाईर आसल्येल्या गोश्टी आनी ममोसयेबांचं ग्र्येट बोलन्याबद्दल सुदीक लोकं पुरावे मांगून र्‍हायल्येत! आत्ता, ह्येला अडानीपन म्हनावं की येडपट चालाकी कर्न्याचा प्रेत्न्य ? ईनोदीपनात तुमी तुमच्या मालक राऊलला माग्ये टाकलंय म्हनावं की काय म्हनावं? हीहीही

In reply to by अर्वाच्य

प्रसाद_१९८२ Wed, 02/20/2019 - 13:45
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा भारताने आम्हाला द्यावा. आम्ही लगेच त्यावर कारवाई करतो असे काल पाकड्यांचा पंतप्रधान म्हणत होता. तुमचे म्हणणे देखिल तसेच आहे.

In reply to by महेश हतोळकर

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 14:12
वरच्या प्रतिसादात ठळक केलेल्या वाक्याबद्दल पुरावा विचारला आहे. हिंदू दहशतवाद बद्द्ल नाहि. - भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे

In reply to by अर्वाच्य

महेश हतोळकर Wed, 02/20/2019 - 14:03
२० जानेवारी २०१३, स्थळ जयपूर, प्रसंग कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. https://youtu.be/RqqcFsha6ZE देशाचे गृहमंत्री कॉंग्रेसचे वरिष्ठ(?) नेते समस्त कार्यकारिणी समोर जाहीर विधान करताहेत. हे वैयक्तिक मत असूच शकत नाही.

In reply to by अर्वाच्य

महेश हतोळकर Wed, 02/20/2019 - 14:04
२० जानेवारी २०१३, स्थळ जयपूर, प्रसंग कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. https://youtu.be/RqqcFsha6ZE देशाचे गृहमंत्री कॉंग्रेसचे वरिष्ठ(?) नेते समस्त कार्यकारिणी समोर जाहीर विधान करताहेत. हे वैयक्तिक मत असूच शकत नाही.

In reply to by अर्वाच्य

महेश हतोळकर Wed, 02/20/2019 - 14:04
२० जानेवारी २०१३, स्थळ जयपूर, प्रसंग कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. https://youtu.be/RqqcFsha6ZE देशाचे गृहमंत्री कॉंग्रेसचे वरिष्ठ(?) नेते समस्त कार्यकारिणी समोर जाहीर विधान करताहेत. हे वैयक्तिक मत असूच शकत नाही.

In reply to by अर्वाच्य

ट्रेड मार्क Wed, 02/20/2019 - 21:17
हे सुशीलकुमार शिंदेंचं भाषण, ही बातमी आणि नंतर ही सारवासारव माफी मागितली. मनमोहन सिंगांचं राष्ट्रीय संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे हा व्हिडीओ तुम्हीच दिला आहे.

ट्रम्प Sat, 02/16/2019 - 10:05
त्या शुर सैनिकांच्या मृत्यु बद्दल थोड़ेदिवस राजकारण करायचे नाही आमच्या सूजन मिपाकरांना समजतय , पण राष्ट्रवादी , स पा , आणि तृण मूल ने मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचे दुःख वाढव न्याचे काम सुरु केले आहे . सपा ( अखिलेश ) - हे मोदी सरकार चे अपयश आहे . राष्ट्रवादी कॉ ( अव्हाड़ ) - मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप सरकार काम करत आहे ,म्हणून हा हल्ला झाला . तृण मूल ( ममता ) - हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे . सुरजेवाला ने गरळ ओकुन घाण केली होती नंतर च्या प्रतिक्रिया मध्ये रागा ने ' सवाल पूछने का ये टाईम नही , हम दुःखद परिजनों के साथ है ' असे बोलून सुरजेवाला ची चूक सावरून वाढलेला प्रगल्भपणा दाखविला . महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष रा कॉ चा उठवळ प्रवक्ता बेलगाम वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणतोय आणि हल्ल्या ला दोन दिवस झालेत तरी साहेबांच्या भावना अजुन बाहेर आल्या नाहीत . त्याच प्रमाणे मुलायमसिंह वर शाब्दिक कोटि करणाऱ्या ताई सुद्धा शांतच आहेत .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sat, 02/16/2019 - 10:55
तात्या हुंदका आवरा. आपल्या मोदिना कोणी कितीही जब विचारला तरी थोडीच ते बधणार आहेत. याच्यात पण ते कमळच फुलवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार. आज येणार आहेत 'खान'देशात उद्घाटनं करायला.

In reply to by ट्रम्प

विशुमित Sat, 02/16/2019 - 12:50
तुमच्या पहिल्याच प्रतिसादात मी तुमचा हुंदका ओळखला होता. जवानांपेक्षा तुम्हाला तुमच्या अजेंडा आणि ज्यांची तुम्ही (अंध)भक्ती करता त्या आवताराची जास्त काळजी वाटत होती. म्हणून म्हटलं दुख आवरा.!! भारतीयांमधे सलोखा कसा राहील यासाठी प्रयत्नशील रहा.

In reply to by विशुमित

lakhu risbud Sat, 02/16/2019 - 14:07
त्यांची ती अंध भक्ती, विचारपूर्वक समर्थन ते तुमचेच. एकदा निर्धार वगैरे पूर्वक लोकसभा लढवणार नाही हे सांगून..... तरीही देशाची "गरज" ओळखून यु टर्न या कल्पनेला लाज वाटावी एवढे महान कर्तृत्व असणाऱ्या. . . . . . . . त्यासाठी विरक्तीचा मोह त्याग करून पुन्हा एकदा निकालांपर्यंत विंगेत सर्वोच्च नेतृत्व बनण्याचे कष्ट उपासणाऱ्या महान नेत्याची तुलना दुसऱ्या कोणाशी होणे हा त्या व्यक्तिमत्वाचा किती मोठा अपमान आहे ! तुमच्या वशिला लावला तर IT Cell मनाची बाळगून माझी लायकी काढणार नाही हि अपेक्षा.

In reply to by lakhu risbud

विशुमित Sat, 02/16/2019 - 14:56
लख्मिचंद साहेब, त्यांची अंधभक्ती आहे हे त्यानी अधीच डिक्लर केले आहे. तुम्ही का लुडबुड करताय?? बाकी नालायक लोकांना ना जनाची ना मनाची. काळवः काळवेळ न पाहता कुठे ही काशी करतात.

In reply to by lakhu risbud

विशुमित Sat, 02/16/2019 - 15:05
लख्मिचंद साहेब, त्यांची अंधभक्ती आहे हे त्यानी अधीच डिक्लर केले आहे. तुम्ही का लुडबुड करताय?? बाकी नालायक लोकांना ना जनाची ना मनाची. काळवः काळवेळ न पाहता कुठे ही काशी करतात.

In reply to by विशुमित

ट्रम्प Sat, 02/16/2019 - 17:46
पण आम्ही आजपर्यंत तुमच्या घराणेशाही, गुलामगिरि , चाटूगिरी , गुटखागिरी चा उल्लेख केला आहे का ? तर नाही केला !!! आम्हाला मिपाची काळजी आहे . पण तुमच्यासारखे संयम सोड़णारे मात्र या धाग्याचा दर्जा कोसळल्याचा आव आणतात .

In reply to by ट्रम्प

विशुमित Sat, 02/16/2019 - 20:00
ग्रेट..!! तुम्ही गुलामगिरीची व्याख्या सांगणार होतात. काय झाले?? === आम्ही कुठे ही सयंम सोडला नाही. उलट संपादक मंडळाने आमच्या विनंतीला मान देऊन सलोखा राखायचं अवाहान केले. त्यानंतर ही मैत्रीच्या नात्याने तुम्हाला शांत करायचा प्रयत्न केला. तुमच्या भक्तीच्या मी कधी ही आड आलो नाही. तरी ही तुम्हाला तुमचा अजेंडा रेटायचा होता. आपल्या देवाला कोणी बोट दाखवले नाही पाहिजे. लगेच डीजस्टार मैनेजमेंट चालू केले. मिपाच्या बाहेर पडुन बघा लोक काय काय म्हणतात भक्तांबद्दल! === आणि लख्मीचंदने तर कडीच केली. त्याना जळी स्थळी पवारच दिसत आहेत. मागे इतके सांगून पण माझ्या प्रतिसादा खाली आलेच लुड्बुड करत. निर्लज्जपणा चा कळस आहे. === खेदाने सांगू पुन्हा सांगू इच्छितो की तुम्हाला काहीही सोयरे सुतक नाही फक्त आपला अजेंडा कसा रेटाला जाईल आणि आपला देव कसा शाबूत राहील, एवढंच हवे आहे. जाऊ ध्या. कोणाला सांगतोय मी हे सगळं!! सुधारणार थोडीच आहात!!!!

In reply to by विशुमित

lakhu risbud Sat, 02/16/2019 - 23:00
आणि लख्मीचंदने तर कडीच केली. त्याना जळी स्थळी पवारच दिसत आहेत. मागे इतके सांगून पण माझ्या प्रतिसादा खाली आलेच लुड्बुड करत. निर्लज्जपणा चा कळस आहे. बा विशुमिता, हे पवारांना उद्देशून आहे हे तूच ओरडतोस म्हणून बरे आहे. निर्लज्जपणा मी करतो हा तुझा समज. याचा न्यायाने तुला कोणी गुलाम म्हणाले तर असहिष्णुता,परिस्थितीचे गांभीर्य वगैरे च्या नावाने शिमगा करायला तूच पुढे येणार. एवढेच लागते आहे तर, यू टर्न नाही आहे, आणि जे काही चालू आहे ते भल्यासाठीच आहे हे उलगडून सांगितले तर तुलाही गुलाम म्हणायची संधी न देता तोंड बंद करू शकतोस मित्रा ! कोणी निर्लज्जपणा करत आहे का नाही हे सांगण्याची एजेन्सी मिळाली असेल तर तसे जाहीर करावे.

In reply to by lakhu risbud

विशुमित Sun, 02/17/2019 - 11:01
1.एवढेच लागते आहे तर, यू टर्न नाही आहे, आणि जे काही चालू आहे ते भल्यासाठीच आहे हे उलगडून सांगितले तर तुलाही गुलाम म्हणायची संधी न देता तोंड बंद करू शकतोस मित्रा ! ==)) मी का समजून सांगू. विषय काय तुमचं चाललय काय. 2. कोणी निर्लज्जपणा करत आहे का नाही हे सांगण्याची एजेन्सी मिळाली असेल तर तसे जाहीर करावे. ==)) दोन-तीन कस्टमरसाठी थोडीच कोणी एजन्सी खोलत असते वय! त्यांना ठोक देऊन दिले की झाले.

In reply to by विशुमित

lakhu risbud Sat, 02/16/2019 - 23:16
फक्त आपला अजेंडा कसा रेटला जाईल आणि आपला देव कसा शाबूत राहील, एवढंच हवे आहे. तुमच्या दुखण्याचे कारण तुम्हीच सांगितले हे बरे केलेत. कधी मधी अशा प्रकारे मनातल्या भावना मोकळे पणाने व्यक्त केल्या तर तुमच्या शिरावर आंतरजालीय जबाबदारीचे जे ओझे आहे ते तरी कमी होईल. आम्हाला आनंद वाटेल त्यात. जाऊ ध्या. कोणाला सांगतोय मी हे सगळं!! सुधारणार थोडीच आहात!!!! असं कसं ? असं कसं ? तुमच्या प्रकृतीची काळजी आम्हाला सगळ्यांनाच आहे. सगळेच एकाच नावाचे प्रवासी आहोत.वरच्या सारखे मधून मधून मोकळे होत चला, शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या कामाला येणार ! ऐकायला कां आणि डोके टेकवायला खांदा......... सगळळं सगळळं इथे मिळेल. तुम्ही हक्काने व्यक्त होत चला.

In reply to by lakhu risbud

ट्रम्प Sat, 02/16/2019 - 18:22
पुतन्यावर पूतना मावशी सारखे प्रेम कारण पुत्री चा राजमार्ग ब्लॉक झाला नाही पाहिजे !!!!! त्यामुळे गुलामा नां यक्षप्रश्न पडला आहे उत्तराधिकारी कोण ? आयुष्यभर कोलांटउडया मारणाऱ्याला पूजावे की उग्रट भाषा ज्ञानि ला ? सांगण्या सारखे काहीच नसल्या मुळे गुलाम नैराश्य ने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून इतरांचे मोजमाप घेत सुटले आहेत !!!!

In reply to by ट्रम्प

विशुमित Sun, 02/17/2019 - 13:15
तुम्ही गुलामिची व्याख्या सांगणार होतात! लवकर सांगा,म्हणजे आम्ही त्यात फिट बसतोय का ते बघून घेतो. मग योग्य ती सुधारणा करयला, आम्ही मोकळे.

उपेक्षित Sat, 02/16/2019 - 13:00
लाज वाटत आहे आज ह्या धाग्याची. आपल्या मिसळपाव ला किती खालच्या पातळीवर नेत आहेत हे अथी-महारथी. संदीप खरे यांची माफी मागून.... आज पुन्हा मेणबत्तीवाल्यांचा धंदा तेजीत येणार. २/४ फोटो आपणही शेयर करून देशप्रेम आहे हे दाखवून देणार. षंढासारखे आपण राजकारण्यांना शिव्या घालून ५/५० टाळ्या मिळवणार. म्हराटी/ दाक्षिणात्य/ उत्तर भारतीय माणूस शहीद झालेले सैनिक आमच्या प्रदेशातील होते सांगून कॉलर ताठ करणार. मग हिंदू-मुस्लीम तेढ कसे आणि किती वाढवता येईल याची गणिते बांधली जाणार. या गुंत्यात गरीब अजून पिचला जाणार, मध्यमवर्गीय आपण या गावचेच नाहीयोत असे समजून वागणार आणि श्रीमंत पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थेला भिकार ठरवून परदेशातील सुट्ट्यांचे प्लानिंग करणार. आणि आपण ? आपण मात्र रात्री जेवताना बायकोवर आणि आईवर डाफरून त्याच त्याच रटाळ मालिके ऐवजी न्यूज च्यानेल वरची फुकाची चर्चा ऐकत बसणार. उपेक्षित...

Blackcat Sat, 02/16/2019 - 15:23
https://m.maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/fake-alert-rahul-gandhis-photo-with-pulwama-suicide-bomber/articleshow/68021878.cms खरा फोटो शेअर करताना जे कॅप्शन लिहिलंय त्यानुसार, हा फोटो २८ जानेवारी २०१४ चा आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील हाजी वारिस अली शाह यांच्या दर्ग्यात काढलेला हा फोटो आहे. काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांच्या फोटोच्या चेहऱ्याला आत्मघाती हल्लेखोराचा फोटो लावण्यात आला आहे.

डँबिस००७ Sat, 02/16/2019 - 23:30
नवज्योत सिंग सिद्धुला कपिल शर्मा शो मधुन डच्चु दिलेला आहे !! पाकिस्तानचा " मोस्ट फेवर्ड नेशन " स्टेटस काढुन घेतलेला आहे !! आता पाकिस्तान मधुन येणार्या मालावर २०० % कस्टम ड्युटी पडेल ! पुलवामा झालेल्या दिवशी टाईम्स ऑफ ईंडिया च्या पेपर मध्ये मथळा होता "INDIA BLAMES PAK, LOCAL YOUTH RAMS CAR ON CRPF BUS !! " किती निरागस ? काश्मिर मधला लोकल युवकाने आपली गाडी CRPFच्या बस वर धडकवली ! आणी ह्यासाठी भारत सरकार पाकिस्तानला जवाबदार ठरवत आहे !! कमाल आहे !! महान काळ्या-मांजरी प्रमाणे ह्याला देश द्रोही प्रचार म्हणता येंणार नाही कारण ही तर एका मामुली पेपर मधली बातमी आहे , ती काय लोकांच्या नजरेत वैगेरे पडत नाही ! काँग्रेसच्या दृष्टीने प्रचार कश्याला म्हणायचा ? तर कोणी तरी मॉर्फ्ड फोटो बनवतो व वॉट्स अ‍ॅप वर पाठवतो !

In reply to by डँबिस००७

ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 07:18
पाकिस्तानचा " मोस्ट फेवर्ड नेशन " स्टेटस काढुन घेतल्यामुळे आता पाकिस्तानबरोबर आयात निर्यात करणाऱ्या उद्योगधंद्यांना त्रास होणार. म्हणजे काही दिवसांनी या उद्योगधंद्यांची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची कशी वाट लागलीये अश्या बातम्या येतील. याला मोदीच कसे जबाबदार आहेत यावर डिबेट्स होतील. एवढंच नव्हे तर मोदींनी निवडणुकांमध्ये फायदा मिळावा म्हणून हा हल्ला भाजप/ संघ व मोदींनी प्लॅन केला असे पण म्हणायला कमी करणार नाहीत. किंवा असेही म्हणतील आता या घटनेचा फायदा उठवून मोदी निवडणुकाच टाळतील. आत्ता पाकिस्तानवर हल्ला करा म्हणून म्हणणारे काही लोक युद्धजन्य परिस्थितीमुळे होणाऱ्या परिणामांना मोदींना जबाबदार ठरवतील. इंधन, धान्य ई च्या किमती वाढल्या म्हणून रस्त्यांवर उतरतील.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Sun, 02/17/2019 - 07:03
स्पष्ट म्हणलंय - "Parliamentary elections in India increase the possibility of communal violence if BJP stresses nationalist themes," म्हणजे राष्ट्रीयत्वाबद्दल बोलले तर कम्युनल टेन्शन होते? कोणाला राष्ट्राच्या संकल्पनेमुळे त्रास होतो बरं? पुढे यात असं लिहिलं आहे - "BJP policies during Modi’s first term have deepened communal tensions in some BJP-governed states, and Hindu nationalist state leaders might view a Hindu-nationalist campaign as a signal to incite low-level violence to animate their supporters," कुठल्या भाजप सरकार असलेल्या राज्यात असे कम्युनल टेन्शन किंवा दंगे झालेत? ज्या गुजराथ मध्ये मोदी १२ वर्ष मुख्यमंत्री होते तिथे २००२ नंतर किती दंगे झाले? गुजराथमधील किती मुस्लिम राज्य सोडून पळून गेले? याउलट प. बंगाल, आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये मध्ये काय चाललंय हे माहित असेलच.

In reply to by ट्रेड मार्क

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 08:03
अहो हा रिपोर्ट त्यांनी त्यांच्या सरकारला दिलाय. ते त्यांच्या सरकारशी खोटं बोलत असतील तर तुम्हाला काय त्रास? असला तरी सीआयएशी वाद घाला.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रम्प Sun, 02/17/2019 - 09:37
उद्या आई ए एस च्या रिपोर्ट ला पण महत्व द्याल का ? मीडिया प्रमाणेच कुंथीत विचार असणारी , स्वतःला पुरोगामी लेबल लावून घेणारी , मुस्लिम विरोधी दंगलीला फक्त जातीय दंगल समजणारी टोळकी भारतात खुप आहेत आणि त्यांच्या पक्षपाती विचारा मुळेच भाजप ने 2014 जिंकले आणि 2019 ला पुनरावृत्ति होण्याची शक्यता आहे . मुस्लिम वर अन्यायाची एखादी घटना घडली की भारतातील तमाम कळवळा वाले एकत्र एवून झापड़ लावून हिंदू समाजाला झोड़पत बसतात ( इथे मिपावर सुद्धा ' जातीयवादी ' म्हणून हीनवणारे गूढ़गे मेंदु वाले त्यातलेच ) आणि बंगाल मधील बहुसंख्य मुस्लिम असलेल्या गावा मध्ये हिंदू च्या वस्त्या जाळल्या गेल्या , त्या वेळी सगळे पुरोगामी , पुरस्कार वापसी , बॉलीवुड मधील खान गैंग थोबाड़ाला कुलुप लावून बसतात . एका हाताने टाळी वाजवन्याची कला असणारे पूरोगामे दोन्ही हाताने टाळ्या वाजवत , टोळ्या बनवून गांवभर फिरायला सुरवात करतात . भारतातील जातीयवाद वाढवन्यासाठी कारणीभूत पुरोगामीच आहेत ( मिपावर सुद्धा ) , पुरोगम्या नी निष्पक्ष भूमिका घेतली तर जातीयवाद नष्ट करण्यात मोलाची साथ जातीयवादच देतील .

In reply to by ट्रम्प

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 12:19
मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, धर्मांध आहेतच; पण हिंदू सहिष्णु होते ना? हे हिंदुत्ववादी हिंदू काही तसे वाटत नाहीत बुवा. बर्‍याच हिंदूंनी “आमच्या नावावर नको“ म्हणून लाथाडलंय या हिंदुत्ववादाला.

In reply to by नगरीनिरंजन

ट्रेड मार्क Mon, 02/18/2019 - 05:15
मला त्रास हा आहे की तो रिपोर्ट तुम्ही इकडे दाखवून तुम्हाला हवे ते अर्थ काढताय. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा रिपोर्ट तुम्ही दाखवण्यामागचा उद्देश काय आहे? स्पष्टच सांगा ना, उगाच आडूनआडून कशाला... मुसलमान तर बहुसंख्येने अडाणी, धर्मांध आहेतच; पण हिंदू सहिष्णु होते ना? हे हिंदुत्ववादी हिंदू काही तसे वाटत नाहीत बुवा. बर्‍याच हिंदूंनी “आमच्या नावावर नको“ म्हणून लाथाडलंय या हिंदुत्ववादाला. या सहिष्णुतेच्या पाखंडापायीच तर हे अडाणी, धर्मांध आपल्या डोक्यावर बसलेत. किती सहिष्णू असावे याला पण काही मर्यादा असली पाहिजेच. तुमच्या घरात तुम्ही एखाद्याला गरज आहे म्हणून आश्रय दिलात आणि मग तो तुमचे उपकार न मानता ही एक संधी समजून तुमच्या घरावर कब्जा करू लागला तर तुम्ही अशीच सहिष्णुता दाखवणार का? जसे हिंदूंनी लाथाडले तसेच किती मुसलमानांनी लाथाडलंय हा प्रश्न एकदा विचारून बघा. हे "बरेच" हिंदू जे म्हणताय तेच आता जागे होत आहेत, उरलेले काही जे सेक्युलर असण्याचे भूत मानगुटीवर बसलेले आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

डँबिस००७ Sun, 02/17/2019 - 09:53
अहो हा रिपोर्ट त्यांनी त्यांच्या सरकारला दिलाय ..... असला तरी सीआयएशी वाद घाला. तो रिपोर्ट अमेरिकंस लोकांचा ईंटर्नल आहे, तो खरा का खोटा तुम्हाला माहिती नाही !! तरी सुद्धा त्यांच्या सरकारला दिलेला रिपोर्ट तुम्हाला ईथे देण्यात काय ईंटरेस्ट ?

In reply to by डँबिस००७

नगरीनिरंजन Sun, 02/17/2019 - 12:14
लोकांनी वाचून ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे बोध घ्यावा म्हणून. बा़की काही खासगी इंटरेस्ट नाही.

Blackcat Sun, 02/17/2019 - 08:50
काँग्रेसने मसूदला पकडले , भाजपेयींने सोडले, भाजपेयींने अफजलला पकडले, काँग्रेसने फाशी दिली. काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.

डँबिस००७ Sun, 02/17/2019 - 10:01
काँग्रेसनेच पाकिस्तान बनवला ! काँग्रेसनेच पाकिस्ताला बनवल !! काँग्रेसनेच पाकिस्तानला काश्मिर दिला नाही !!! काँग्रेसनेच पाकिस्तानला अर्धा काश्मिर घेऊ दिला पण काही कारवाई केली नाही !!! काँग्रेसनेच पाकिस्तानशी चार वेळेला युद्ध केले पण एकदाही निर्णायक पराभव केला नाही, पाकिस्तानला निशस्र केले नाही !!!! काश्मिर मधला आतंकवाद हा कॉंग्रेसची देन आहे !! भारतावरचे आतंकी हल्ले हे कॉंग्रेसमुळेच व कॉंग्रेसच्या काळातच झालेले आहे !!

विशुमित Sun, 02/17/2019 - 13:37
लोकसत्ता ऑनलाइन Pulwama Terror attack: जम्मूकाश्मीरमधील फूटीरतावादी नेत्यांना दणका पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या फुटीरतावादी नेत्यांना जम्मू-काश्मीर सरकारने जोरदार दणका दिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मीरवाइज उमर फारूक, शब्बीर शाह, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि अब्दुल गनी बट यांचा यात समावेश आहे. या फुटीरतावाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी संरक्षण दिले होते. जम्मू काश्मीरमधील आधिकाऱ्याने सांगितले की, मीरवाइज उमर फारूक आणि अन्य चार नेत्यासह इतर फुटीरतावादी नेत्यांना यापुढे कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत === हे भाट खरे जबाबदार आहेत कश्मिर प्रश्न वाढवायला.

In reply to by विशुमित

ट्रम्प Sun, 02/17/2019 - 15:42
उठसुठ पाकिस्तानी नेत्यां बरोबर चर्चा करणारे फुटिर पुलवामा हल्ल्या बद्दल मात्र असे तोंडात गुळणी धरून बसले आहेत जसे भारतातील काही नेते पुलवामा बद्दल संवेदना प्रकट कराव्या तर मुस्लिम मतदार नाराज होण्याची भीती . त्यांची सुरक्षा काढली हे मस्त झाले .

ट्रम्प Sun, 02/17/2019 - 15:30
मटा पुणे आवृत्ति शेवटच्या पानावरील बातमी : - कराची मधील खासगी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय सिनेमातील गाण्यावर डांस चालला असताना पाठिमागील पडद्यावर भारतीय झेंडा दिसला आणि त्यामुळे पाकिस्तान चा अभिमान दुखवला म्हणून त्या शाळेची मान्यता रदद् करण्यात आली . आणि आमच्या भारतात मात्र तुकडे गैंग पाकिस्तान च्या समर्थनार्थ घोषणा देवून धींगाना घालतात कारण त्यांना माहित आहे त्यांच्या समर्थनार्थ रागा , ममता , केजरी , आव्हाड , कधी कधी उधोजी पण येणार . मुख्यता हाच फरक आहे पाकिस्तानी आणि भारतीयांच्या स्वाभिमानात .

In reply to by ट्रम्प

lakhu risbud गुरुवार, 02/21/2019 - 11:30
पाकिस्तान्यांना स्वतःच्या देशाचा स्वाभिमान आहे हा तुमचा गैरसमज आहे. तिथे ISI आणि सैन्य एवढे प्रबळ आहेत कि स्थानिक प्रशासनाने लगोलाग भीतीने ते काढायला लावले असणार.बळीचा बकरा हि ठरवलेला असणार. पाकिस्तानी तुंम्ही समजताय तेवढे स्वाभिमानी असते तर सगळीकडे एवढी छी-थू अनुक्रमे पाकिस्तान्यांची आणि पाकिस्तान या राष्ट्राची झाली नसती. खेळाडू,कलाकारांचे आणि सैन्यातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एकच स्वप्न असते संधी मिळाली तर इंग्लंड-अमेरिकेचा व्हिसा मिळवून तिथेच स्थाईक व्हायचे

In reply to by lakhu risbud

सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 11:55
पाकिस्तानच्या लोकांना देशाभिमान पेक्षा भारत द्वेष हा मोठा घटक आहे. खरं तर लष्कर आणि भारत द्वेष हे दोन प्रमुख घटक त्यांना विघटनापासून वाचवण्यात मोठा हातभार लावणारे आहेत. अन्यथा पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाण यांच्यात कोणताही बंधुभाव नसून त्यांच्यातून विस्तव जात नाही. धर्म हा सुद्धा त्यांना एकत्र बांधू शकलेला नाही हि वस्तुस्थिती आहे.

गामा पैलवान Sun, 02/17/2019 - 15:45
काळीमाऊ,
डोवालांचा मुलगा ब्रिटिश नागरिक आहे म्हणे , तुम्हाला भेटतो का कधी ?
ए माझ्या काळीकिच्च मनीमावड्ये, तू कित्तीकित्ती गोंडस ( = क्यूट) आहेस गं. तो पप्पू भारतात राहतो म्हणे. तुला चावलाय का गं कधी? तु.न., -गा.पै.

गामा पैलवान Sun, 02/17/2019 - 15:51
नगरीनिरंजन,
शिवाय मुंबईत सनातनच्या कार्यकर्त्यांकडे व भाजपच्या नगरसेवकाकडे शस्त्रे सापडली आहेत.
सनातनच्या कोणत्याही साधकाकडे कसलंही शस्त्रं सापडलेलं नाहीये. आणि सापडलं तरी त्याचा सनातन संस्थेशी कसलाही संबंध नाही. नरेंद्र दाभोलकर फ्रॉड असून स्वत:च्या कर्माने मेला आहे. सनातन संस्थेचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांशी फुटक्या कवडीइतकाही संबंध नाही. सनातनच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसृत करणारे खऱ्या धोक्यांपासनं लोकांचं लक्ष विचलित करताहेत. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान Sun, 02/17/2019 - 15:57
नगरीनिरंजन,
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.
हा शुद्ध अपप्रचार आहे. हे दावे पुराव्याने सिद्ध झालेले नाहीत. एकीकडे बारा बलुतेदार म्हणून गळे काढायचे आणि त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मणांनी शिक्षण नाकारलं म्हणून वृथा आरोप करायचे. पोटभरू व्यावसायिक शिक्षण बहुजनांना नाकारलं असतं तर बलुतं कुठून निर्माण झाली असती? बकवास सगळा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन Sun, 02/24/2019 - 13:57
=)) इंग्रज यायच्या आधीच्या भिक्षुक वैदिक शिक्षणाला कुत्रंही विचारत नव्हतं हे खरं आणि भविष्यातही विचारणार नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. बलुतेदारांनी जी काही कौशल्ये विकसित केली ती स्वतः केली. त्यांना कधीही राजाश्रय किंवा संस्थात्मक आधार मिळाला नाही. इंग्रजांसकट येईल त्या राज्यकर्त्यांची भाटगिरी करणार्‍यांनी कौशल्यविकास व संशोधकवृत्तीला कधीही निरपेक्ष व संस्थात्मक आधार मिळू दिला नाहीय ह्या देशात. ज्या देशांनी हे केलं ते आज महासत्ता झालेत आणि भाटमंडळी समुद्र ओलांडण्याचे आपलेच जुने नियम सोयीस्करपणे गुंडाळून त्यांच्या आश्रयाला गेलेत.

ट्रम्प Sun, 02/17/2019 - 18:15
जवानावर दारू पिल्याचा आरोप पोलिसांनी केला असता ' माझी वैद्यकीय तपासणी करा ' जवानाने सांगून सुद्धा त्याला सात तास चौकित डांबन्यात आले . आपले फड़नवीस साहेब यात जातिने लक्ष घालतील अशी अशा आहे . पूर्ण देशात ही न्यूज स्प्रेड होवून महाराष्ट्र पोलिसांचे म्हणजेच मुख्यमंत्री चे नाक कापले जाण्याची शक्यता वाटते . MT: Baramati: सीआरपीएफच्या जवानाला बारामती पोलिसांची बेदम मारहाण http://mtonline.in/5yRWPY/dga via @mataonline: http://app.mtmobile.in

डँबिस००७ Sun, 02/17/2019 - 20:49
पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या पंजाब मधल्या अंत्ययात्रेला हजर रहायला काँग्रेसच्या आमदार नवज्योत सींगला वेळा मिळाला नाही ! पंजाबचे मुख्य मंत्री अमरेंद्र सींग यांनी अंत्ययात्रेला हजर सुचना नवज्योत सींगला दिलेली असताना ह्या सुचनेचे पालन नवज्योत सींग यांनी केले नाही !

Blackcat Sun, 02/17/2019 - 21:10
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का एक वीडियो सोशल मीडिया पर ख़ूब चर्चा में है. इस वीडियो क्लिप में नरेंद्र मोदी कह रहे हैं, "सेना में जवान जितना साहस करने की ताक़त रखता है उससे ज़्यादा साहस करने की ताक़त व्यापारी रखता है." इस वीडियो को ख़ूब शेयर किया जा रहा है कि इसके सामने आने के बाद विवाद खड़ा हो गया है. हालाँकि ये स्पष्ट नहीं है कि उन्होंने इससे पहले और बाद में क्या कहा और ये वीडियो कब का है. वीडियो को लेकर सोशल मीडिया पर भी हज़ारों टिप्पणियां आई हैं. https://www.bbc.com/hindi/india/2016/03/160307_controversy_over_modi_trader_soldier_video_dil

ट्रम्प Mon, 02/18/2019 - 06:59
चार वर्षा पूर्वी शमीमा बेगम नावाची मुलगी मोठ्या बहिणीच्या पासपोर्ट वर यू के मधून बाहेर पळाली आणि सीरिया मधील ई सी स जॉइन केले . ज्या वेळी ती पळाली त्या वेळी 15 वर्षाची होती आता तिला लहान मूल आहे व तिला पुन्हा युकेत यायचे आहे , पण आता जनमत तिच्या विरोधात असताना तेथील पुरोगम्या मुळे ती परत येवू शकते . https://twitter.com/TwitterMoments/status/1096006591688646656?s=09

Blackcat Mon, 02/18/2019 - 22:30
सरकारला २८ हजार कोटी रूपयांची अंतरिम शिलकीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी आरबीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली हे या बैठकीस उपस्थित होते.. सलग दुसऱ्या वर्षी आरबीआय सरकारला अंतरिम शिल्लक हस्तांतरित करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर चर्चा सुरू होती. याच मुद्यावरून सरकारबरोबर मतभेद झाल्याने आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

"घेतला कळफलक आणि बडवला बेजबाबदारपणे" याचे अजून एक उत्तम उदाहरण ! Blackcat, वैचारिक अंधत्वामुळे, तुमच्या लेखनाच्या विश्वासार्हतेची पातळी दिवसेदिवस... तळ नसलेल्या डक्यात पडावी तशी... रसातळाला जात आहे. =)) =)) =)) आरबीआयने सरकारला नुकतीच दिलेली रक्कम, आरबीआयला झालेल्या फायद्यांपैकी, सरकारला दिलेला लाभांश (डिव्हीडंड) होता. Reserve Bank of India Act of 1934 अन्वये आरबीआय स्थापन केली गेली आहे. त्या कायद्याच्या Chapter 4, section 47 of the Act अन्वये, असा अंतरिम आणि/अथवा अखेरचा डिव्हिडंड (लाभांश) आरबीआय सरकारला दरवर्षी देते. गुंतवणूकदाराला कोणतीही संस्था लाभांश देते, तसाच हा सर्वसाधारण प्रकार आहे. आरबीआयने सरकारला पहिला लाभांश १९३६ साली दिला आहे. (The RBI was founded in 1934 and has been operating according to the Reserve Bank of India Act of 1934. Chapter 4, section 47 of the Act, titled “Allocation of Surplus funds” mandates for any profits made by the RBI from its operations to be sent to the Centre.) काही दिवसांपूर्वी माध्यमांत चर्चिला गेलेला मुद्दा या लाभांशाबद्दल नसून, आरबीआयकडे असलेल्या देशाच्या गंगाजळीच्या, देशोपयोगी विकासकामाच्या उपयोगाबद्दलचा, होता. ही गंगाजळ रु२८,००० कोटी इतकी टुक्कार नसून, ३० जून २०१८ रोजी जाहीर झालेल्या आकड्यांप्रमाणे, तिचे आकारमान, खालीलप्रमाणे आहे... (अ) चलन आणि सोन्याच्या स्वरूपातली गंगाजळी : रु६,९१,००० (सहा लाख, एक्याण्णव हजार) कोटी आणि (आ) आकस्मिक कारणांसाठी आरक्षित चलन (contingency reserve) : रु२,३२,००० (दोन लाख, बत्तीस हजार) कोटी म्हणजे, एकूण रू९,२३,००० (नऊ लाख, तेवीस हजार) कोटी इतकी मोठी आहे. यामधील काही रक्कम विकासकामांसाठी किंवा आकस्मिक कारणांसाठी वापरायचा वैध हक्क सरकारला आहे आणि त्यावेळेसही, ती रक्कम वापरण्याबद्दल मतभेद नव्हते, तर त्यापैकी किती रक्कम वापरावी, याबद्दल होते. एखाद्या गंभीर मुद्द्यावर लिहिण्यापूर्वी, त्याचा थोडातरी अभ्यास करून मग कळफलक बडवावा, आणि ते जमले नाही तर गप्प बसावे, इतके मूलभूत ज्ञान वापरले असते, तर परत एकदा तोंडावर पडायला झाले नसते =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 00:44
डॉ साहेब , ज्या माणसाला २००% कस्टम्स डयुटी पडल्याने वस्तुची किंमत किती वाढु शकते हे साधारण गणित जमत नाही त्याच्या कडुन RBI च्या लाखो कोटीच्या रकमांच गणित कस उगडाव ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Tue, 02/19/2019 - 10:21
नई दिल्ली वित्त मंत्रालय ने कैलकुलेशन करके बताया था कि आरबीआई ने रिस्क और रिजर्व के नाम पर वित्त वर्ष 2017 और 2018 में 27,380 करोड़ रुपये अपने पास रखे थे। मंत्रालय चाहता है कि वह इस रकम को भी ट्रांसफर करे। आरबीआई ने सोमवार को अपने बयान में कहा, 'यह लगातार दूसरा साल है, जब रिजर्व बैंक इंटरिम सरप्लस ट्रांसफर कर रहा है।' पिछले वित्त वर्ष में आरबीआई ने मार्च में 10 करोड़ रुपये का अंतरिम लाभांश सरकार को दिया था। इसके साथ वित्त वर्ष 2018 में डिविडेंड की कुल रकम 40,659 करोड़ रुपये पहुंच गई थी। https://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/centre-wants-surplus-money-of-last-two-years/articleshow/68058054.cms जी एस टी त थोबाड फुटले , त्याची प्लॅस्टिक सर्जरी करायला पैसे पाहिजे आहेत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Tue, 02/19/2019 - 13:43
रेल्वे स्टेशन वरचे फुकट वाय फाय वापरणाऱ्या नीं कोटयावधि च्या गप्पा मारू नये , काँग्रेस च्या काळात ओवरड्राफ्ट कित्तेक वेळा काढला !! सरकारी कर्मचाऱ्याचें पगार सोने विकुन करत होते !! आठवा ते बुरे दिन !!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

(आरबीआयला तिच्या कामांमुळे मिळालेले उत्पन्न - तिचा खर्च) = शिल्लक = फायदा = लाभ (नेट प्रॉफिट). लाभाचा गुंतवणुकदारांना वाटला जाणारा अंश = लाभांश (डिव्हिडंड). गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणूकीच्या प्रमाणात लाभ विभागला (डिव्हाईड केला) जातो... म्हणून गुंतवणूकदाराला मिळणार्‍या लाभांशाला, 'डिव्हिडंड', म्हणतात. वर्ष पूर्ण होण्याअगोदर, अंतरिम (इंटेरिम) ताळेबंदाच्या आधारे, गुंतवणूकदारांना दिलेला लाभाचा भाग/अंश = अंतरिम लाभांश (इंटेरिम डिव्हिडंड). पूर्ण वर्षाचा ताळेबंद तयार झाल्यावर गुंतवणूकदारांना दिलेला लाभाचा भाग/अंश = अंतिम लाभांश (फायनल डिव्हिडंड). असे अंतरिम व अंतिम लाभांश गुंतवणूकदारास देणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे, हे आर्थिक क्षेत्राचे "निम्न स्तराचे" ज्ञान असलेल्या व्यक्तिला माहित असते... तसे ज्ञान नसलेल्या, मुद्दाम डोळे घट्ट बंद करून घेतलेल्या अथवा नाठाळपणे विपर्यास करणार्‍या व्यक्तीला हे लागू होत नाही, हेवेसांन. ज्याने त्याने यापैकी आपला प्रकार निवडावा आणि वाचकांनी लेखकाचा प्रकार ठरवावा. =)) =)) =))

Blackcat Tue, 02/19/2019 - 21:55
ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: February 19, 2019 12:59 PM | Updated: February 19, 2019 01:01 PM statue of shivaji maharaj in kothrud without any decoration ; Congress and NCP invaders | ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक ठळक मुद्दे निधी उपलब्ध नसल्याचे महापौरांकडून कारण पुणे: संपूर्ण देशभरात शिवजयंती जल्लोषात साजरी होत असताना मात्र, कोथरूडमध्येछत्रपती शिवाजी महाराज पुतळ््याला कोेणत्याही प्रकारची सजावट करण्यात आली नाही. हा एकप्रकारे महाराजांचा अपमान आहे. आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही अशी भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महापालिकेच्या या कृतीविरोधात आंदोेलन छेडले. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच आंदोलकांकडून यावेळी महापौरांना लक्ष्य देखील करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध करत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महापौैर मुक्ता टिळक विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्त्तर देताना म्हणाल्या, न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेच्या कररुपी पैशांची उधळपट्टी थांबविण्यात आली आहे. निधी उपलब्ध नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले http://m.lokmat.com/pune/statue-shivaji-maharaj-kothrud-without-any-decoration-congress-and-ncp-invaders/

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 13:53
What Manmohan Singh said "We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably the fruits of development. These must have the first claim on resources" Equitably : “in a fair and impartial manner.” [2] These : “devise innovative plans” not “Muslims or minority”. (If latter was the case he would have used “They” instead of “these”) What he meant "We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share in a fair and impartial manner the fruits of development. These plans must have the first claim on Central Government resources" https://www.ndtv.com/video/news/news/pmo-dismisses-row-over-manmohan-s-remarks-9819 https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/minorities-must-have-first-claim-on-resources-pm/articleshow/754218.cms?from=mdr

In reply to by महेश हतोळकर

अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 15:06
These (इनोवेटीव प्लान्स) must have the first claim on resources. तुम्हाला उलगडून सत्य सांगितले तर तुम्ही समजून आपले मत बदलणार ह्या आशेवर खुलासा करुन दिलाय. यापुढे तुमची मर्जी