मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.

वाचने 310745 वाचनखूण प्रतिक्रिया 1112

In reply to by सस्नेह

डॉ सुहास म्हात्रे 14/11/2016 - 22:50
http://www.misalpav.com/comment/898363#comment-898363 आता, परत परत चिपची कहाणी ऐकून रागावलेल्या एका कायप्पाकराची तुमच्यावर "मेहेरनजर" झाली तर तो / ती तुम्हाला नोटेवरच्या मंगळयानातून सफर घडवून आणेल ! ;) =)) =))
अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. काळ्या पैशावर अंकुश लावणे आणि बनावट चलन रोखणे असे दोन हेतू साध्य होतील असे वाटते. अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल. माझे दोन प्रश्न आहेत कृपया जाणकारांनी उत्तर द्यावे: १. जरी 500 आणि 1000 च्या सध्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी घातली असली तरी 1 जानेवारीपासून 2000 आणि 500 च्या नव्या नोटा चलनात येतील असे ऐकले. मोठ्या denomination च्या नोटा म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. तेव्हा परत काळा पैसा असणाऱ्यांच्या हे पथ्यावरच पडेल. जरी ट्रेड मार्क म्हणतात त्याप्रमाणे ट्रॅकर असेल तर अतिउत्तम परन्तु त्यापेक्षा 100 च्या नोटांची अधिक मोठ्या प्रमाणात छपाई करून चलनाचा प्रश्न सोडवता आला नसता का? २. सध्या जे काळा पैसा बाळगून आहेत ते बँकांतून त्यांच्याजवळच्या बँकेतून आहेत तेवढ्या नोटा बदलून आणू शकणार नाहीत का? बँकांना अशा प्रकारे मोठी रक्कम बदलण्याकरिता आणणाऱ्यांबद्दल काही निर्देश मिळाले असतील का? प्राप्तिकर खाते बेनामी सम्पत्ती असणाऱ्यांना कसे ट्रॅक करू शकेल?

In reply to by पुंबा

नोटा कोणीही बदलून आणू शकेल. फक्त बदलताना आयडी प्रूफ लागणार. आणि तेही दिवसाला ४०००रु इतकेच मिळणार. (२ आठवड्यानंतर बहुधा रोज १००००)

In reply to by अनुप ढेरे

विनोद१८ 08/11/2016 - 23:11
.... त्या सगळ्या नोटबदलूंची सरकारात नोंद राहणार आहे, म्हणजे कोणत्या व्यक्ती व कुटुंबे वा व्यावसायिक मोठ्याप्रमाणात नोटा बदलत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाउ शकते हे तर फारच महत्वाचे आहे. या सरकारचे जे म्हणणे आहे की काळ्या पैशाची निर्मितीच थांबवीर्मितीच, तसे ते करुन दाख्वीत आहेत. छानच लगाम लावलाय श्री. मोदींनी.

In reply to by पुंबा

प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम असेल तर स्पेशल सोय रिझर्व बँकेत केलीय. तिथे झाडा झडती होईल. लालू टाईप लोक्स पिलावळ घेऊन गेले तरी एखादा कोटी पांढरा होईल.

In reply to by खेडूत

अहाहा.. हे वाचून दिल गार्डन गार्डन झाला.. असे असेल तर मात्र हि एकच योजना 2019 ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यास मदत करेल..

In reply to by पुंबा

मला वाटतं याचा संबंध नोटेच्या छपाई करीता लागणार्या खर्चाशी असावा. १०० ची एक नोट छापायला जेवढा खर्च येतो (१०० * २०) त्यामानाने २००० ची नोट छापण्यात जास्त फायदा असावा. अर्थात हा फक्त एक अंदाज..

In reply to by पुंबा

अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल.
हे वाक्य चुकीचे आहे हे अधिक वाचनाने समजले. लोकांकडील पैसा कमी झाल्याने महागाई काहीशी कमी होऊ शकते, मात्र आजच्याघडीला रोख चलन मिळवण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागल्याने मध्यम फळीतील विक्रेत्यांनी किमती कमी केलेल्या नाहीत. बँकांकडील तरलता वाढल्याने कर्ज अधिक स्वस्त होतील असा अंदाज आहे. मी मोदींनी जे पाऊल उचलले आहे त्याचा समर्थक आहे मात्र, खात्यात पैसा असूनही ATM बंद असल्याने जो प्रचंड त्रास मला होतो आहे त्यावरून लोक फार काळ हे मुकाट्याने सहन करतील असे वाटत नाही. अक्षरशः 2 दिवसांपासून मी उधार उसनवारी करून व्यवहार करतो आहे सकाळपासून 8 ATM वर गेलो कोठेच कॅश नव्हती. उद्या तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा आहे.
अ‍ॅब्सोल्यूट ब्रिलियन्स ! हे आधीच मागणीवर होतं, मायजीओव्ही वर वर वगैरे वाचलेलं आहे. शिवाय नागपूरच्या एका अर्थतज्ञाने म्हणे यावरचं एक संशोधन मांडलं होतं. देशांचं सरासरी दरडोई उत्पन्न आणि त्यांचं महत्तम चलन याच्या गुणोत्तरावर आधारलेल्या या अभ्यासाबद्दल वाचलं होतं आधी. पण हे प्रत्यक्षात होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे ज्यांना वाटलं नव्हतं त्यांची वाट्ट लागलीय आता. ब्रावो मोदी !

माईसाहेब कुरसूंदीकर 08/11/2016 - 22:27
प्रशंसनीय निर्णय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

llपुण्याचे पेशवेll 09/11/2016 - 09:35
काय माई, यवढंच. तुमचे हे काही म्हटले नाहीत वाटतं. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नाखु 09/11/2016 - 10:05
नोटा बदलायला गेलेत.(येतील्च इतक्यात)

In reply to by पैसा

देवळांतील दानपेटीत असणाऱ्या 500 1000 च्या नोटांचे काय होईल काय माहित. तसेही ते करमुक्त उत्पन्न असल्याने 300000 ची मर्यादा नसेल त्यामुळे बँकांना नोटा बदलून द्याव्याच लागतील. काळा पैसा पळून असणारे देवळात सेटिंग करून, काही कमिशन देऊन काळा पैसा त्यांच्या माध्यमातून पांढरा करून घेतील अशी भीती वाटते.

In reply to by पुंबा

शाम भागवत 08/11/2016 - 22:50
हो पूर्वी अस झाल आहे. कोर्टात केसेसही झाल्या आहेत. निकाल देवळांच्या बाजूने लागला होता. तरी एकूण काळ्या पैशाचे प्रमाण पाहता दर्यामें खसखस.

In reply to by शाम भागवत

तिरुपती संस्थानाने 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारत असल्याचे सांगितले आहे. बँकांकडून हे चलन तिरुपती संस्थान बदलून घेऊ शकेल काय? असे झाले तर या योजनेचा सम्पूर्ण उद्देशच फोल ठरत नाही काय?

In reply to by पैसा

सही रे सई 10/11/2016 - 23:17
आज अमृतसरच्या सुवर्नामान्दिराने ५०० व १००० च्या नोटा सिवाकारल्या जाणार नाहीत असे सांगितले. बालाजी मंदिराने क्रेडीट कार्ड चेक द्वारे दान स्वीकारले जाईल असे सांगून तशी सोय केली आहे.

डॉ सुहास म्हात्रे 08/11/2016 - 22:49
काळा पैसा व अतिरेकी कारवायात गुंतलेल्या पैश्याच्या मुळावर घाला घालणारे अत्यंत प्रशंसनिय पाऊल ! विशेष म्हणजे जाहीर केल्यापासून काही तासांत (आणि तेही नॉन-वर्किंग तासांत) हा नियम अमलात (आज रात्री १२ वाजता) येणार आहे, हा खरा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे, भूतकाळात नोटा रद्द केल्यावर दिली गेली तशी काळा पैसा पांढर्‍यात बदलायला मुदत मिळणार नाही.
अर्थशास्त्राप्रमाणे पैसा म्हणजे नुसती रोख रक्कमच नाही तर देवाणघेवाण facilitate करायची क्षमता असलेली प्रत्येक गोष्ट ही पैसा आहे. आतापर्यंत ५०० आणि १००० च्या नोटांना पैसा असे का म्हटले जात होते? मी समजा एखादी गोष्ट दुकानातून विकत घेतली आणि त्यासाठी ५००/१००० च्या नोटा दिल्या तर दुकानदार त्या नोटा माझ्याकडून का घेत होता? याचे कारण त्याच नोटा वापरून अन्य कोणती वस्तू विकत घेता येईल अशी त्या दुकानदाराला खात्री वाटत होती. म्हणजेच त्या नोटांमध्ये देवाणघेवाण facilitate करायची क्षमता होती.ती क्षमता एका क्षणात काढून घेतली गेली आहे.त्यामुळे या नोटांचा 'पैसेपणा' हरवला आहे :) पी.के चित्रपटात दाखविल्याप्रमाणे नायकाला गांधीजींचे चित्र असलेले कागद (नोटा) देऊन वस्तू घेता येतात हे समजले त्यानंतर तो गांधीजींचे चित्र असलेले कोणतेही कागद देऊन नोटा घ्यायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला लोक 'पीके हो क्या' असा प्रश्न विचारू लागले. म्हणजेच वस्तू कशामुळे विकत घेता येत होत्या? तर त्या गांधीजींच्या चित्रामुळे नव्हे तर ते चित्र असलेले कागद पुढील देवाणघेवाणीचे व्यवहार facilitate करू शकतील या सर्वांना असलेल्या विश्वासामुळे. सरकारच्या या एका निर्णयामुळे अर्थशास्त्रातील एक महत्वाचा धडा सगळ्यांना कळेल. असो.जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा.

In reply to by गॅरी ट्रुमन

mayu4u 09/11/2016 - 10:11
जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा. +१

In reply to by गॅरी ट्रुमन

ह्या एका झटक्याने लाखो लोक paytm कडे वळले आहेत. सम्पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस होण्याच्या दिशेने छोटे का होईना एक पाऊल पडले याचा आनंद आहे.

In reply to by पुंबा

सतिश गावडे 12/11/2016 - 20:04
पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे आहे त्यामुळे लोक स्पेसिफिकली पेटीयमकडे वळण्याचे कारण काय असू शकेल? एक ऑफर प्रकार वगळता जी सुविधा पेटीयम देते ती सुविधा थेट उपलब्ध असते.

In reply to by जयंत कुलकर्णी

अन्नू 12/11/2016 - 20:37
हेच म्हणतो. चायनाच्या अलिबाबा कंपनीने यात (इफ आय एम नॉट मिस्टेकन) ४०% गुंतवणुक केलेली आहे.

संदीप डांगे 08/11/2016 - 23:06
सगळ्यात जास्त मजा भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची येणार आहे... जाहिरात: आमच्याकडे कला पैसे पांढरा करून मिळेल, कमिशन 50 टक्के!!!

विकास 08/11/2016 - 23:08
निर्णय स्वागतार्हच आहे. पण यात अजून एक मजेशीर प्रकार होणार आहे... आधी जणूकाही आपण साधे आहोत असे वागत सर्जिकल स्ट्राईक, मग एनडीटिव्हीवर बंदी, बंदी उठाव वगैरे बाता चालत असताना फिस्कल सर्जिकल स्ट्राईक... हे सरकार उद्या काय करेल याचा विचार करत, आता विरोधकांच्या झोपा उडणार आहेत.

In reply to by विकास

ट्रेड मार्क 09/11/2016 - 00:41
हा निर्णय असा आहे की विरोधकांना ना याला विरोध करता येईल ना पूर्ण समर्थन देता येईल. कारण बहुतांशी जनतेला हा निर्णय होईल याची आशा खूप पूर्वीपासून होती. अर्थात रागा आणि केजरीचं काही सांगता येत नाही ते कधीही कशालाही समर्थन देऊ शकतात आणि कधीही विरोध करू शकतात. पण बरेच छोटे मोठे मासे, म्हणजे बिल्डर्स, सोनार, इस्टेट एजन्ट्स, राजकारणी, वेगवेगळ्या मार्गाने पैश्याची अफरातफर करणारे, मस्त गळाला लागणार नाहीतर भिकेला लागणार. एकूण झालेल्या घटना पाहता हे एक मोठठं जाळं विणायचं काम चालू होतं, अजूनही चालू आहे, ज्यात एक एक भक्ष्य स्वतःहून अडकत जात आहेत.

विकास 08/11/2016 - 23:09
मला वाटते या आधी जनता सरकारमधे मोरारजी देसाईंनी असाच तत्कालीन १००० रू ची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अधिक माहिती असल्यास येथे लिहावीत!
मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा...बाकीच्या गोष्टी तर आहेतच.. पण हा निर्णय अत्यंत गुप्त ठेवून बरोब्बर बुधवारी बँकांची बंद व्हायची वेळ पाहून त्या बंद झाल्यानंतरच हा निर्णय जाहीर केला गेला. वर परत त्याच दिवशी रात्रीपासून बंदी आणली. नन्तर २ दिवस बॅंका बंद ठेवल्या आणि तीनच दिवस जुन्या नोटा त्याही काही ठराविक ठिकाणीच चालतील असा निर्णय जाहीर केला.. तल्लखपणा असावा तर असा.

In reply to by सही रे सई

अगदी , अगदी ! खणखणीत षटकार ठोकलाय .. पार स्टेडियमच्या बाहेर ! खतरनाक माणुस आहे हा. एक एक ऐतिहासिक निर्णय छातीठोकपणे घेत सुटलंय हे सरकार. आतापर्यंतच्या त्रिशंकु लोकसभांचं रेकॉर्ड ब्रेक करत, त्यांना सर्वाधिकार देणार्‍या भारतीय लोकशाहीचं मनापासून कौतुक वाटतंय. आणि लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ पण ठरवतंय हे सरकार , निदान बर्‍याच अंशी. हे ही नसे थोडके. भारतीय लोकशाही प्रगल्भ झाल्याची सगळी लक्षणं आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो 08/11/2016 - 23:13
अजुन एक मुद्दा. ज्या काळोजीरामन लोकांनी काळा पैसा परकिय चलनामधे ठेवलाय त्याचं काय? त्यांना काय फरक पडेलसं वाटतं नाही. त्यावरही काहीतरी पाचर मारायाला हवी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

....मोदी काय करु शकतात याचा अनुभव आजवर येतोच आहे. असो, जे होते आहे ते देशहिताचे आहे हे नक्कीच.

In reply to by विनोद१८

विकास 08/11/2016 - 23:55
ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच... आम्हाला हवे तेंव्हा आणि आम्हाला हवे तसे शत्रूंवर हल्ले केले जातील असे पर्रीकर आणि इतरही मंत्री म्हणाले होतेच. तेच या संदर्भात पण लागू होते. दाऊद च्या संदर्भात वाचल्याचे आठवते की त्याचे ४०कोटी रुपये अचानक गहाळ झाले आणि त्याच्या माणसानेच चोरले असा आरोप होता. पण नंतर समजले की रियाध का अशाच कुठल्यातरी मध्यपुर्वेतील देशामधल्या बँकांच्या (परीणामी त्या राज्यकर्त्यांच्या) सहकार्याने ती गुप्त कारवाई होती.

अनिरुद्ध.वैद्य 08/11/2016 - 23:19
एका चर्चेत ऐकलं की जर उत्पन्नाचा सोर्स सांगता नाही आला तर ती रक्कम सरकार ताब्यात घेऊ शकते, असा कायदा आलाय म्हणे.

In reply to by पिलीयन रायडर

डॉ सुहास म्हात्रे 08/11/2016 - 23:33
=)) =)) =)) बहुतेक भारतिय अमेरिकन विळक्षण विसरून एकतर मोदींची विलक्षण स्तुती करताहेत, तर काहीजण नोटांच्या रद्दीचा बरा भाव येईल की त्या थंडीतल्या शेकोटीसाठी बर्‍या पडतील याचा हिशेब लावत बसलेत ! ;)
मागच्या सर्व घटनांवर विचार केला तर अतिशय नियोजन बद्ध रीतीने ही खेळी खेळली आहे. पहिले २ वेळा काळा पैसा वाल्यांना तो पैसा जाहीर करायची संधी देणे , मग संसदेत काळा पैसा विरोधी कायदा संमत करून घेणे ज्यात उत्पन्नाचा स्त्रोत जाहीर नसेल तर तो सरकार ताब्यात घेऊ शकेल हे कलम असणे, जास्तीत जास्त जाणते कडे बँक अकौंट असावे या साठी जनधन योजना काढणे आणि ती यशस्वीरीत्या राबवणे, आणि मगच आजचे हे धाडसी पाउल उचलणे. जेव्हा अजून २०० वर्षांनी इतिहास लिहिला जाईल तेव्हा मला वाटत भारतीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/11/2016 - 23:43
पंतप्रधान मोदीजी देशाला काय संबोधित करणार, असं वाटलं. (कधी कधी त्यांच्या भाषणाचा कंटालाही येतो, आजही तसंच काही असेल असं वाटलं) पण त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं कौतुक वाटलं. पंतप्रधान काही निर्णय घेऊ शकतो सालं आपण ते विसरून गेलो होतो.काळा पैसा बाहेर यावा, ज्यांनी गुंतवणूक करून ठेवली ते वाचतील असे वाटते. बाकी, काय काय होईल ते बघुया. धाड़सी सरकार, धाड़सी पंतप्रधान. शुभेच्छा. आम्ही तुमच्या निर्णयाबरोबर आहोत. अभिनंदन...! -दिलीप बिरुटे

रामपुरी 09/11/2016 - 00:00
आता जो याला विरोध करेल त्याला "चोर की दाढी मे तिनका" न्याय लागू होइल - आणखी एक बूच मस्त... मान गये मोदीजी

वरुण मोहिते 09/11/2016 - 00:02
अनेक वर्ष हा निर्णय पेंडिंग होता. आणि हो मोरारजी आणि इंदिरा गांधीजींने पण हा निर्णय घेतला होता पण त्यावेळी कोण हजार च्या नोटा ठेवणार खिशात तो त्यामुळे त्यावेळी कालबाह्य ठरला . बाकी उद्या यु. एस निकाल आणि आज हा निर्णय हा पण खचित योगायोग नाही. मत नंतर नोंदवता येईल . पण सध्यातरी निर्णयाचं स्वागत आहे

In reply to by संदीप डांगे

ट्रेड मार्क 09/11/2016 - 00:30
मला ऑफिसमध्ये व्हिडीओ दिसत नाही. पण डांगेअण्णा विषयाला सोडून काही टाकतील असं वाटत नाही त्यामुळे चालेल.

In reply to by संदीप डांगे

शब्दबम्बाळ 09/11/2016 - 04:33
RBI चे अधिकृत स्पष्टीकरण मला व्हिडिओ शेअर कसा करायचा माहित नाही त्यामुळे लिंक देतोय. काही ठळक मुद्दे: 1. सामान्य नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता कोणालाही आपले पैसे बँकेतून बदलून घ्यायला देऊ नयेत. पैसे बदलून घ्यायला येणाऱ्या प्रत्येक माणसाची ओळख पटवून मगच पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे काळा पैसे असेल तर पकडला जाऊ शकतो. पण अधिकृत रक्कम असेल तर मात्र काळजी करायचे कारण नाही. 2. बँकेमध्ये कॅमेऱ्याने सगळी प्रोसेस पहिली जाणार आहे त्यामुळे गैर प्रकार करणारे लोक पकडले जातील. 3. 24 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 4000 रुपये आणि आठवड्यात जास्तीत जास्त 20,000 रुपये बदलून घेऊ शकता. या तारखे नंतर RBI परिस्थितीचा अंदाज घेऊन मग पुढचे धोरण ठरवेल. 4. पण तुम्ही "कितीही रकमेच्या 500 किंवा 1000 च्या नोटा तुमच्या अकाउंट मध्ये भरू (deposit ) करू शकता. त्यावर कोणतेही बंधन नाही!" परंतु एका ठराविक रकमेच्या वरचे व्यवहार FIU (Financial Intelligence Unit ) किंवा इनकम टॅक्स विभागाशी शेअर केले जातील आणि ते यावर लक्ष ठेवतील. त्यामुळे जास्ती रकमेचे व्यवहार करताना बँकदेखील काळजीपूर्वकच करतील. 5. RBI ने नोटा छापताना 2000 च्या जास्त नोटा छापल्या आहे जेणे करून 500 आणि 1000 च्या नोटा बदलून देण्यासाठी होणाऱ्या रकमेसाठी 2000 रुपयाच्या कमी नोटा लागतील. त्यामुळे छपाईचा खर्च वाचेल. 6. सध्या बाजारात 500 च्या -- 16.5 बिलियन नोटा आहेत (नंबर ऑफ पिसेस) 1000 च्या -- 6.7 बिलियन नोटा आहेत (नंबर ऑफ पिसेस) 7. या नवीन नोटा "महात्मा गांधी न्यू सिरीज" या नावाने पब्लिश केल्या आहेत. तसेच ब्रेल लिपीमध्ये नोटेचे मूल्य नोटेवर नोंदलेले आहे. 8. सिक्युरिटी फीचर्स मात्र सांगायचे शिताफीने टाळण्यात आले त्यामुळे GPS चा प्रश्न अर्धवट राहिला. तसेच काही दिवसांपूर्वी 2000 रुपयाच्या नोटेचा फोटो फेसबुक वगैरे वर फिरत होता त्यामुळे काही लोकांना आजच्या घटनेची आधीच माहिती मिळाली असेल का? या प्रश्नाचे जास्त समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. (चौकशी करण्यात येईल यापलीकडे )

In reply to by शब्दबम्बाळ

निल्या१ 09/11/2016 - 21:32
बिलियन आता ही गणन पद्धति मान्य झाली का भारतात? मरठीत लिहिता वाचणारे मराठी विषय रुपयांचा मग गणन बिलियन मध्ये कशाला?

ट्रेड मार्क 09/11/2016 - 00:53
अनिवासी भारतीयांकडे बहुतांशी थोड्याफार ५०० आणि १००० च्या नोटा असतात. ज्या भारतात गेल्यावर लगेच लागणाऱ्या गोष्टींसाठी, म्हणजे विमानतळावरून बाहेर पडल्यावर टॅक्सी वगैरेसाठी ठेवलेल्या असतात. तर अश्या नोटांचे काय करणार? प्रत्येकाकडे असे पैसे फारतर ४०००-५००० च्या आसपास असू शकतात. पण अनिवासी भारतीयांची संख्या बघता एकूण बरीच रक्कम असेल. हा काळा पैसा नाहीये पण त्या नोटा भारताबाहेर बदलून कश्या मिळणार? IATA च्या वेबसाईटवर लिहिलंय की भारतीय चलन बाहेरून येताना भारतात आणता येत नाही. याबद्दल कोणाला काही अधिक माहिती आहे का? काही उपाय आहे का?

In reply to by शब्दबम्बाळ

ट्रेड मार्क 09/11/2016 - 01:09
बाहेरून भारतात येताना भारतीय चलन आणणे कायद्याच्या विरुद्ध आहे. खाली वाचा Currency rules Currency Import regulations: Foreign currencies : unlimited. However, amounts exceeding USD 5,000.- (or equivalent) in cash, or USD 10,000.- (or equivalent) in traveler's cheques must be declared; Local currency (Indian Rupee-INR): Import of INR is prohibited, except for residents of India importing up to INR 7,500.-. Foreign currencies include currency notes, traveler's cheques, cheques, drafts etc. (Re)exchange only through banks and authorized money exchange points.

In reply to by ट्रेड मार्क

शब्दबम्बाळ 09/11/2016 - 03:21
पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे, बाहेरच्या देशात प्रवासाला जाणाऱ्यांसाठी किंवा बाहेरच्या देशात असणाऱ्या भारतीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5000 रुपयांपर्यंतच्या नोट बदलून नवीन नोट मिळण्याची सोया करून देण्यात येणार आहे. पण लिमिट 5000 रुपये इतकेच आहे...

In reply to by साहना

शब्दबम्बाळ 09/11/2016 - 03:32
5000 रुपयांपेक्षा जास्त भारतीय चलन भारताबाहेर घेऊन जायला कायदेशीर परवानगी नाहीये. त्यामुळे हा निर्णय त्या नियमानुसार योग्यच आहे...

In reply to by साहना

डॉ सुहास म्हात्रे 09/11/2016 - 22:39
आजकाल लाखभर डॉलर्स वैध मार्गांनी सहज मिळत असताना रु७५०० पेक्षा जास्त भारतिय चलन बाहेर न्यायची गरजच काय ? याशिवाय, चलनाची तस्करी रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये चलन आत-बाहेर नेण्यावर अश्या प्रकारची बंधने आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

मंदारपुरोहित 09/11/2016 - 02:58
NRI could deposit indian currency in local SBI at their country supporting with passport copy (or) can be changed at RBI with declaration as tourist. Or can change at airports. Timelimit till 31 Mar 2017

आनंदी गोपाळ 09/11/2016 - 00:56
याचा यू टर्न कधी येणारे? मार्केटात कानोसा घेतल्यावर फारसं पॅनिक ऐकू आलं नाही. सीए, बँकवाले कूल होते. बँकांना कोणतेही निर्देश अजूनही नाहियेत. उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे. :)

In reply to by शब्दबम्बाळ

आनंदी गोपाळ 09/11/2016 - 01:03
शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच करीन. मी वैद्यकातून उपजीवीका करतो. उद्या पोस्ट केलेले "इमर्जन्सी" नाहीत.

In reply to by आनंदी गोपाळ

असंका 10/11/2016 - 10:37
=))

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ 09/11/2016 - 01:38
यावरून आठवलं... शक्यतो ज्यांचा छोटा दवाखाना असतो असे डॉक्टर कधी तपासायला गेल्यावर बिल देत नाहीत. त्यांचे 100 रुपये वगैरे चार्जेस असतात आणि मग ते गोळ्या लिहून देतात तेव्हढा एकच कागद मिळतो. मग हे पैसे कुठे मॉनिटर होतात? आणि मग अशा डॉक्टरांकडे देखील सरकारी हिशोबात न आलेले पैसे असू शकतात का? अर्थात ते हुशार असल्या कारणाने गुंतवत असतील म्हणा कुठेतरी, पण असाच प्रश्न पडला...