Skip to main content

मिसळ पाव : एक दुथडी भरून अखंड वाहणारी, मराठी भाषेची नदी , एक मराठी भाषेचं ज्वलंत व्यासपीठ .. तिला मानाचा मुजरा

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 27/02/2018 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचक मंडळी ... आज मराठी भाषेच्या दिनानिमित्ताने सर्व वाचक बंधू आणि भगिनींना , प्रियजनांना , गुरुजनांना आणि साहित्य संपादक मंडळातील आजी आणि माजी सभासदांना लाख लाख शुभेच्छा .... सर्व प्रथम आभार त्यांचे मानतो ,, ज्यांनी हे ज्वलंत व्यासपीठ निर्माण केले .. मनापासून आभार ... आज या प्राणप्रिय भाषादिनानिमित्ताने , मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत ... मी दुखी असताना ज्याप्रमाणे मला माझ्या मुलांनी त्या दुःखातून बाहेर काढलं तसाच काहीसा हातभार तेव्हा या व्यासपीठानेही दिला .. मी माफीनामा जाहीर केला आणि तुम्हा सर्वांचे अभिप्राय वाचून काहीसा हलका झालो ...

२०१९ - लोकसभा निवडणूक

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 27/02/2018 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
.डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत.

मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 27/02/2018 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
'आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा.' आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.

प्रिय मायमराठी

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 27/02/2018 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

काळ्या पिशवीत पिशवीत

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 26/02/2018 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या पिशवीत पिशवीत (श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून) काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते बॉटल हालते बॉटल हालते बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला तरतरी मना येते मती न्हाती धूती होते रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया तिथे उधार चालेना नगद लागते अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन तिथ डोलकर हालती जनू करती भजन जवा रंगीत पान्यात स
काव्यरस

पुस्तक परिचय - द मराठाज्

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 26/02/2018 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक अतिशय वेगळ्या विषयावरील चांगले पुस्तक वाचले. डाॅ. स्टुअर्ट गाॅर्डन लिखित आणि र.कृ.

॥ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही ॥

लेखक खिलजि यांनी सोमवार, 26/02/2018 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही मस्त आलिशान घर होतं दिमतीला गाडी न नोकर होते अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥ लग्नही असंच पळून केलं पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं जिथे चूल होती तिथेच मोरी होती आपल्याच घरात मुतायची चोरी होती चहा झाला कि हात लांब करून दिला जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥ जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर घर पार भरून जायचं प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ?
काव्यरस

बॉलीवूडची 'चांदणी' निखळली!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 26/02/2018 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडची 'चांदणी' निखळली! जीवनातलं अटळ वास्तव म्हणजे मृत्यू! देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला या वास्तवाला कधी ना कधी सामोरं जावंच लागतं. मात्र, हे वास्तव स्वीकारताना मनात एक नीरव शांतता निर्माण होते. वयाच्या कोणत्याही टप्प्यात मृत्यू हा शब्द अंगाचा थरकाप उडवून देतो. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा..'या गदिमांच्या ओळीप्रमाणे माणसाचे सर्व तर्क एकाजागी स्तंबीत होऊन जातात. मानला वेगळीच रुखरुख लागून जाते. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळींचा अर्थ आपसूकच डोळ्यासमोर तरळू लागतो. जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू आहेच; पण तो अवेळी आला की कुठलाही संवेदनशील माणूस काही क्षण हळहळल्याशिवाय राहत नाही.

वलय (कादंबरी) - प्रकरण १५

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 26/02/2018 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १४ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42059 प्रकरण 15 त्या दिवशी सुप्रिया सोबत “कॅपलर्स कॅफे” मध्ये बोलणे झाल्यावर राजेश रूमवर गेला, त्याने तयारी केली आणि स्टेशन वर आला. मुंबईहून “स्वागतपुरी” गावाला जायला सात ते आठ तास लागतात. राजेश ट्रेनमधून गावातल्या स्टेशनवर उतरला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. मग रिक्षा करून तो घरी पोहोचला. त्याचे एक छोटेसे वडिलोपार्जीत दुमजली घर होते.. त्याचे वडील लहानपणीच वारले होते.

पुरस्काचे खारमुरे

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 26/02/2018 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज?