मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरस्काचे खारमुरे

परशुराम सोंडगे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कथा अाणि व्यथा -------------------------अ पुरस्काराचे खारमुरे *************** अाज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात अामचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.ते अावाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं अापल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला." "चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला." "त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज." "आज काही विशेष?" "विशेषच अाहे.पेपर नाही वाचले काआज? " "नाय बुवा." "व्हाॅट्स अप तरी पाहीलं का?" "नाय बुवा." "फेसबुक तरी." "नाय बुवा.टायमच नाय भेटला." "मग कसं कळेल." "असं काय झालं की ते मला कळलचं पायजे" "झालं काहीच नाही.पुरस्कार भेटलाय ." "अाता कसला भेटलाय?" "समाजभुषण...?" "कुणाला?" "मलाच .दुसरं कुणाला? हा साधा नाही. राज्यस्तरीय पुरस्कार." "राज्यस्तरीय! " मला आश्चर्याचा धक्काच बसला. एवढा महान माणुस अपल्या जवळ असताना अापल्याला त्याचं हे कर्तत्त्व माहित ही नाही. त्याचा एवढा आनंद बघून मलाच गलबलून आलं.आता एवढी मोठी बातमी तो सांगतोय आणि मी गप कसा राहू शकत होतो.मला त्याचं अभिनंदन करण्याची अतीव इच्छा झाली,"वा. !!काॅंगरेच्युलेशन मित्रा,मला तुझा सार्थ अभिमान अाहे." असं एक नेहमीच गुळगुळीत वाक्य मी फेकून दिलं आणि त्याला कडकडून मिठ्ठी मारली.चेह-यावर फारच आनंद झाला असल्याचे भाव अाणले. माझा असा जबरदस्त शो चालू असतानाच तो वरमला.इतका इमोशनल वगैरे मी होईल असं त्याला अंदाज नसावा बहुतेक. तो जरा संकोचत म्हणाला,"तसं नाही काही एवढं.भेटलाय आपला" . "असं कसं? मित्रा तू समाजभुषण ..!तू आमच्या शेजारी राहतोस. तुझ्या कार्याची दखल राज्यस्तरावरून घेतली गेली हे कमी नाही.अाम्हाला सार्थ अभिमान अाहे तुझा." "चल,घरी. चहा तर घेऊ." कमालीचा आनंद ही माणसाला शब्द सूचून देत नसेल. तो गप होता नि मला तोंड सुटलं होतं.अाम्ही दोघ त्यांच्या घरी गेलोत.त्यांची स्तुती करावी म्हणून मला काहीतरी गौरव पर बोलणं क्रमप्राप्तच होतं.उग गप कसं बसावं? "मित्रा,तू इतकं मोठ काम करतोस अाणि कधी सांगितलं नाहीस." "अाता त्यात काय सांगण्यासारखं." "सांगाया पायजे.तसं कसं माहित होईल."त्यानं पेपर पुढ टाकले.मी ते अधाशापणे वाचत राहिलो. त्यांच्या समाजाच्या संघटनेचा हा पुरस्कार होता.(ही कथा काल्पनिक नसल्यामुळे समाजाचा उल्लेख व संघटनेचं नाव मुद्दाम टाकलेले नाही.हल्ली सा-याच समाजाच्या भावना अतिशय नाजूक झाल्या असल्यामुळे त्या नुसत्या दु:खूच नाहीतर त्या तुटू पण शकतात. त्यामुळे सर्व समाज भावनाची कदर करून नामोल्लेख टाळलेले अाहेत.) बातमी वाचल्यामुळे बरचसं मला कळालं होते. "ग्रेट यार. ..या गल्लीला तुझा गर्व पाहिजे " 'ग्रेट ... 'वगैर माझे शब्द त्याला झेपत नव्हते.तो गुदमरल्यासारखा करायचा.स्तुती माणसाला अंहकाराचे पंख देते.त्यानं हुरळून जाणं अपेक्षित होत पण तस न होता.त्याला ती स्तुती झेपत नव्हती.अशात अापण कुणाची ही स्तुती करण्यात कसूर करत नाही. बोलाचाच भात बोलाचिच कढी. त्यात कशाला कसूर? "मी कसला ग्रेट?" "मग कोण ग्रेट?" "ते अामचं पाव्हणं.मेव्हणं.हिचा भाव खरा ग्रेट माणूस.तुला म्हणून सांगतो. लय्यीच पाऊर गडयाचा " "त्यांचा पाऊर....? पुरस्कार तुम्हाला कसा?" "ते बाॅडीवर आहेत संघटनेच्या.धरली बाजू लावून.तेव्हं निल्या पायतोंडयांचा लय टचून होता. त्याची नाय डाळ शिजली. पाहुण्यांनी लय टाइट फिल्डिंग लावली होती." "पुरस्कारसाठी ही टाइट फिल्डीग? मला नाय समजलं?" "असं.कस...?लय्य टसली लागत्यात.नुसत्या या पुरस्कारासाठी शंभरच्यावरअर्ज होते. त्यात एकच पुरस्कार दयायचा.स्पर्धा तर राहणारचं" "काय ?तुमच्या समाजात इतकी माणसं चांगली अाहेत . "हे एका पुरस्कराचं झालं.असे दहा पुरस्कार दिले जाणारअाहेत.शिक्षणरत्न,साहित्यरत्न,जीवनगौरव...वैगरे" "असे प्रत्येक समाजातून असंख्य पुरस्कार दिले जातात. या वरून जगात प्रचंड संख्येने चांगली माणसं राहतात हे सिध्दच होत की.उगच सज्जनाचा तुटवडा असे बोंबलत असतो आपण." 'असं निगेटीव्ह नका घेऊ.सरकारी पुरस्कराला मर्यादारेषा असतात.त्यात वशिलेबाजीअाली.अधिका-याच्या व पुढा-यांचे चमचे अाले.त्यांचे लाॅबिंग आलं. तेच ते पुरस्कर बळकावतात.चांगली माणसं उपेक्षित राहतात." असं कसं? सरकारी पुरस्काराची निकष असतात. त्यांची निवड प्रक्रिया असते. एक खास पारदर्शक पध्दत असते." "अासते ना? सारे म‌ॅनेज होतात.सारे फिक्सींग असते.नुसते शो असतात.तेवढेच नाही राजकारण असते. कमालीचा जातीवाद असतो. हे फार गंभीर अरोप झाले. एका शाळेत सा-यांच शिक्षकाना अादर्श पुरस्कार आहेत.या वर्षी ती शाळा बंद होते आहे. का? सारे पोरं इंग्रजी शाळेत. असं कसं ? तसचं हे? पुरस्कार प्राप्त शिक्षक सारे फिरतेत मग पालक कशाला कुणाचं ऐकतेन?" आता लयचं झालं बुवा? जातीवाद असतो.याचे पुरावेतआपल्याकडं .सलग दहा वर्ष झालं एकाच जातीत आदर्श पुरस्कारेत दिले जातेत.कसं शक्य? चांगुलपणा काय जातीवर अवलंबून असतो काय?" असं कसं? हे नाही पटत बुवा पटो न पटो .त्यात राजकारण अासत. त्यात पुन्हा जातीवाद आलाच.काही लोकांची दखल घेतलीच जात नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो.त्यामुळे आमच्या संघटनेने हे काम सुरू केले अाहे." "छान उपक्रम....चांग्ल्या माणसाच्या पाठीवर थाप हवी पण इतर जातीच्या चांगल्या पण उपेक्षित लोकांना पुरस्कार देते का तुमची संघटना." "नाय?.आमची काय सेवा संस्था नाही.ही जाती साठी काम करते. सेवा संस्थाचे असतात धंदे पुरस्कार देण्याचे ." "आता कसले आले धंदे यात. उलट ते पदर सन्मान करतात लोकांचा" "विकतात पुरस्कर साले ते. भडवे."लांडग्याची मशिन गरम झाली होती.अनेकदा अर्ज आणि प्रयत्न करून ही त्याला पुरस्कार मिळत नव्हता.या त्याच्या खाजगी प्रश्नावर त्यांन उत्तर शोधले होते.मेव्हुण्याच्या माध्यमातून तो पुरस्कार पटकावला होता.त्याचं मोठ सिश्रेब्रेशन करायचा मुड होता.त्याला कटाव म्हणून मी उठत म्हणालो, "बरं ते जाऊ दया.तुम्हाला तर मिळाला अाहे ना." "मिळाला कशाचा? मिळावा लागतो.सहजा सहजी इथं काहीच मिळत नाही.काही गोष्टी कराव्या लागतात. इच्छा नसली तरी ही. !" त्याच्या प्रमाणिकपणाचं मला कौतुकच नाही तर गर्व वाटू लागला. "पाव्हण्यांनी त्यांच काम केलं.आता आपली जबाबदारी वाढली." "ती कशी?" "पुरस्कार मिळालाय पण कार्यक्रमाला माणसं भी पायजेत ना? पाव्हण्याचा भी वठ वाढयला पायजे संघटनेत." "मग?" "तेच चार पाच. जिपा न्यावा लागत्याल.थोडीपार गर्दी झाली पायजे ना?" तेवढयात आमच्या वहिनीची एंट्री झाली.फक्कडं चहा आणला होता.ती एका पुरस्कार विजेत्या ची पत्नी होती.त्यांच्या पण चेह-यावर अानंद मावत नव्हता. "चार पाच काय म्हणता? जेवढे निघतील तेवढे निघू दया.नुसतं अभिनंदन नका करु, भाऊजी. त्यांच्या नाकावर टिच्चून पुरस्कार दिलाय.मित्राला. हा गौरव सोहळा पाहयाला यावच लागेल." इति.वहिनी. "नुसतं तूच नाही सारे गल्लॊतले मित्र पण काढावे लागतील ती जबाबदारी तुझी." त्यांनी दिलेला चहा अक्षरश: मला कडू लागू लागला होता. आता वहिनीसमोर त्याला काही बोलता येईना.बायकोसमोर कुणीकुणाचा अपमान करू नये असा सुविचार आहे .माझी उडालेली भांबेरी त्यांनी हेरली तस टेन्शन घेऊ नका.ओल सूक...सारचं देऊ. देऊ नाही हाॅटेलच बूक करू.लेडीजसाठी एक. नि जंटसाठी सेपरेट. होऊ दया खर्च ." वहिनींनी मन मोठ केलं. बसल्या जाग्यावर माझ्याकडून त्यांनी शब्दच घेतला. कार्यक्रमाला माणसं काढण्याची हमी घॆतल्या नंतर माझी सुटका करणयात आली. मी त्या पुरस्कार देणा-याच संघटनेचे अभार मानले.एक साधा पुरस्कार इंन्सान को कितना बदल देता है। अाता निल्या काळतोंडे काही लांबचा नाही.तो अामचा मित्रचं.आमच्याच गल्लीत राहतो.त्याच्या नाकावर टिच्चून संघटनेने असे पुरस्कार का दयावेत?चिमूटभर संघटना नाही ती नि राज्यस्तरीय पुरस्कार देते.आपल्याच जातीच्या माणसाचा सत्कार करावा यासाठी संस्था काम करतात.चागले काम,उत्कृष्ट कामापेक्षा त्या माणसाची जात महत्वाची तेच पाहयचे.अापल्या जातीची माणसं शोधायची.त्यांना डोक्यावर घ्यायचं. दुस-याच्या नाकावर टिच्चून ते पुरस्कार दयाचे. समानतेच्या गप्पा मारत जातीवाद पोसायचा.असा हा कार्यकम. हे तर काहिच नाही ज्या संस्थचे अाॅफिस आमच्या मागच्या गल्लीत आहे. ती संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार देते.तीची ख्याती गल्लीच्या पलीकड अदयाप पोहचली नाहीतअसे पुरस्कार !उदंड झाले आहेत. कुणी कुणाला पुरस्कर्ते देते आहे.महापुरूषांच्या नावाने पुरस्कार दिले जात अाहेत.ते योग्य व्यक्तीला दिले जावेत. नाहीतर पुरस्काराचे बाजार बंद कसे होणार? रस्त्यावर जाताना विकत घेतले खारमुरे दयावेत अगदी सहज तसे हे पुरस्कार देऊन कसे जमेल? नाहीतर पुरस्कारच बोलेल खालील कवितेप्रमाणे... ग्रेटभेट. मी पुरस्कारांस एकदा विचारले "तू,आदर्शालाच का लेट भेटतो ?" ते थोड वरमलं. किंचीत हासलं सुध्दा...नि म्हणालं, "यात काय राजकारण बिजकारण नसतं पण हल्ली आदर्शच कुठं उरलीत? जे आहेत ते पार सांदीत पडलेत.... शोधता शोधत नाहीत होतो उशीर .... अंधाराच्या गर्तेतून शेंदूनच काढावे लागतात. एक एक.... एकदमच नाही असं नाही होतो कधी माझा भी निलाव कधी गटातटात..कधी जात धर्माच्या चिकट लगदाळीत अडकवतात मला. बांधतात कधी नालायकांच्या भी गळयात पण सोनं ते सोन असतं, भाऊ चकाकतचं . नि होते ग्रेट भेट .... जी माझं अस्तिवचं शिल्लक ठेवते या भंयकर लोकशाही राज्यात ..." . . . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा ९५२७४६०३५८

वाचने 1417 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चांदणे संदीप 26/02/2018 - 09:22
आवडला. मला आधी वाटलं पाककृतीच आहे. :) Sandy