Skip to main content

मराठी दिन २०१८: चला मालनाक! (मालवणी)

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 02/03/2018 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला मालनाक सुस्वागतम. आपल्या मालनाक आपले स्वागत आसां. हुमयसून राष्ट्रीय महामार्ग १७ ने मालनाक येऊचा झालां की पयलो पळस्पा फाट्याक उजवीकडे बळूचा. मगे वडखळ नाक्याऽऽर डाव्यां वळाण घेतलां की आपलो कोकणचो रस्तो लागतां; होच आपलो राष्ट्रीय महामार्ग १७. महाड, खेडचो भरणो नाको, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा, राजापूर, तळेरे, नांदगांव, कणकवली करान आपण कसालाक इलों की उजवो फाटो सरळ मालनाक. तसो कणकवल्येवरसून आचरामार्गे पण एक रस्तो आसां. पण अंतर पाचधा किमी. कमी असलां तरी रस्तो आवळ (अरुंद) आणि खड्ड्यान भरल्यालो. मगे कसालावरसून येणारो हायवे रस्तोच बरो.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 01/03/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २ भाग १ संस्कृत सुभाषितांच्या क्षेत्रात निश्चित उगम सांगता येईल असे थोडेच आहे. बहुतेक नीतिपर, व्यवहारज्ञान सांगणारे आणि बोलणार्‍यांच्या मुखामध्ये प्रत्यही असणारे असे श्लोक कोणातरी (आता अज्ञात) कवीची रचना असते. एकदा ती सर्वमान्य झाली की ती सुभाषितांच्या एका संग्रहातून दुसर्‍यात अशी फिरू लागते. ह्यातल्या बहुतेक संग्रहांचे पौर्वापर्य ठरविणे दुस्तर असते आणि मूळचा कोण आणि नक्कल कोणती हेहि ठरवता येत नाही. एक वचन लोकप्रिय झाले की ते वापरून दुसरा कोणी कवि त्याच्याभोवती नवा श्लोक निर्माण करतो.

मुलांची हरवत चाललेली आई

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 01/03/2018 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई पण माझी तू फक्त आई आहेस मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस हवं नको ते सारं बघायचीस मी कर्तासवरता झालो नि तू दूर दूर गेलीस इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही मी ओरडतो, घशाला कोरड पडते बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई " तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस तो आहे कि नाही?
काव्यरस

भाषा अहिराणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा ही अहिराणी भाषा आहे. पूर्वी घरात, मित्रांत, नातेवाईकांत, बाजारात, दुकानात, दैनंदिन व्यवहारात, शेती व्यवहारात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जायची. घरात पूर्णपणे अहिराणीत संभाषण होत असे. कारण खानदेशातली अहिराणी ही लोकभाषा आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची प्रमाणभाषा अहिराणी आहे. त्या काळातला प्राथमिक शाळेतला शिक्षक असो की माध्यमिक शाळेतला. शाळेतून शिक्षक बाहेर पडले की ते घरी-दारी अहिराणी भाषा बोलायचे. शाळेत विद्यार्थ्यांनाही आपसात अहिराणी बोलायला अलिखित परवानगी होती.

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 01/03/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

झेब्र्याचा जन्म

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 01/03/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाघ शिकारीस निघाला शोधत शोधत शिकार तो कुराणाशी गेला डौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडे गाढवांचा कळप तेथे चरण्यासी आला हेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्याने असेल फर्लागभर अंतरावर घेऊन पावित्रा मारणार उडी इतक्यात नजरभेट झाली त्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडी अन शिकारी खुद्द शिकार झाला तारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याची घेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्या यथेच्छ जोड्याने चरण्याच्या मंगला समयी लग्न लागले सोहळ्यास सारे जंगल लोटले सर्व सुखांत ते तृणभक्षक आता भय नसे कुणाचे वाघच आपला रक्षक मंगलाष्टक म्हंटली गेली कालांतराने गाढवीण व्यायली द
काव्यरस

वलय (कादंबरी) - प्रकरण १९ ते २३

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 01/03/2018 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १७ आणि १८ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42104 --- (आज पाच प्रकरणे १९ ते २३ एकदम टाकतो आहे. मग २४ वे प्रकरण ६ मार्चला प्रसिद्ध होईल!) प्रकरण 19 बस ड्राइवरने अचानक जोरात ब्रेक दाबल्याने राजेशची तंद्री भंग पावली. बसमध्ये बाजूच्या सीटवरचा रा. म. मालवणकर यांचे “जीवनाचे शिल्पवृक्ष” हे पुस्तक वाचणारा आधीच्या स्टँडवर केव्हाच उतरून गेला होता. धर्मापूरला जाऊन तो जे करणार होता त्याद्वारे त्याच्या प्रतिशोधाच्या शोधार्थ एक पाऊल तो टाकणार होता. धर्मापूरच्या “धर्म वार्ता" या वृत्तपत्र कार्यालयात तो पोहोचला.

मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
अहिराणी भाषेचा गोडवा लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे.

मराठी दिन २०१८: टापा (मावळी)

लेखक भीडस्त यांनी गुरुवार, 01/03/2018 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
टापा सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा.

प्रेमळ दूध

लेखक खिलजि यांनी बुधवार, 28/02/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते मस्त पैकी उतू जात होते आनंदाची साय जाऊन जाऊन भांडण एवढे वाढते कि त्याचे घट्ट दही होते विचारांची पकड सैल होतं जाते रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते हेवेदावे मांडले जातात , वादावर वाद घातले जातात भावना घुसळून घुसळून वर येतात " शिल्लक राहिलेल्या आठवणी " प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी असंच काही काळ साठवलं जातं "मी कशाला जाऊ ?
काव्यरस